Monday 8 March 2021

नारी



आदर्श नारी की परिभाषा गढ़ते
समाज के ठेकेदारों से ,
बेटों को महिमामंडित करते
व्रतों और त्योहारों से ,
प्रतिभा को कुंठित करने वाले
बंद समाजों से,
दहेज़ ,भ्रूण -हत्या जैसे
सड़े-गले रीति -रिवाजों से,
नारी को नारीत्व प्रदान करते
ब्यूटी-प्रोडक्ट्स" से,
बेटियों को घर में बंद करने वाले
कोड ऑफ़ कंडक्ट"से,
बिंदिया से ,काजल से
पायल से ,करधन से ,
चूड़ी की खन-खन से,
बाजूबंद और कंगन से,
झूठी सज-धज से ,बनावटी बनठन से,
चाहिए मुक्ति
अनुशासन से नहीं
बंधन से .


प्रज्ञा,,

स्त्री




'स्त्री नाही दासी,स्त्री नाही देवी
स्त्री नाही वस्तू उपभोगाची
स्त्री आहे माणूस। स्त्री आहे माणूस।'
हे समाजात ठाम पणे सांगणाऱ्या लेखिका-ज्योती म्हापसेकर ह्यांच्या 'मुलगी झाली हो' चे ७०-८०च्या वर प्रयोग केले होते. ज्योती म्हापसेकरांच्या स्त्रीमुक्ति संघटने साठी निधि गोळा केला होता.
कल्याण येथील त्यावेळच्या मान्यवर नागरिकांच्या संस्थेमध्ये जाऊन स्त्रियांचे विविध प्रश्न मांडून त्यांची दखल घ्यायला लावली होती
आज अनुभवाच्या गुरू कडून एकच शिकले
की-
हक्कांसाठी झगडावं लागतं
आणि सन्मान हा कमवावा लागतो

©रसिका काकातकर

Smile



Someone said to me yesterday,
My smile reminds her of the sun,
just rising and shining
but just ten times brilliant,
I thanked her, smiled and said,
Why not?
I derive my energy to smile,
to care and to love
from that mighty sun,
My smile may light up
someone's dark life,
and that is all I want,
to make a small difference
in someone else's life.


Mrunalini Dabke

International Women's Day

 Today we celebrate International Women's Day. While we can be proud of the significant progress already made, this day also reminds us work lies ahead to achieve true gender equality. Women's day celebration doesn't mean just dressing up and going out. It doesn't mean only having programmes, parties and celebration. It is much beyond all this. We should pursue justice and inclusion. Every government and organization working for Women's empowerment and gender equality should be applaused.  We should try to reach out the women who are deprived of many things and who really need all this.

True celebration of Women's day will be in understanding Feminism in the right sense and working for it.
Basically, women should develop the right attitude towards feminism. Feminism doesn't mean not cooking or going against men or freedom from everything. It means Choice. The change should come from women themselves. Why should women consider maternity, motherhood and household work as a burden? That is our privilege, a source of power as the next generation is in our domain. We must know how to convert this into a source of power. Women should know how to work democratically. Women are  better conservators and better perseverers and a better future. They are the hope of the future. They should be proud of it and should make positive use of it. But we must admit that men do accept our success. We need to honour men who have feminism within them. Without their full support we cannot make a better world.
In the rural areas, women are paid less than men and often lag behind in access to education, training, technologies and mobility. They also work longer days than men taking both paid and unpaid work into consideration. They face gender -related constraints that limit their access to decent work as well as their productivity. Here is where feminism is needed.

No enduring solution to the major changes of our day from climate change to political and economic instability can be solved without the full empowerment and participation of the worlds women. Women's full empowerment and participation in the political and economic arena is fundamental to democracy and justices which people are demanding. Women are an important indicator of the development of a nation and global well-being - so in a way Feminism is beneficial to men too.
True celebration of Women's day will be in recognizing the qualities of a woman and saluting her virtues. A woman many a times sacrifices her self-respect, dignity, ambitions and life purpose for her loved ones. In some cases she also tolerates disrespectful and abusive behaviour to maintain peace in the family. A woman is kind, humble, honest, generous, loyal, modest, obedient, patient diligent, has love, prudence, self confidence and practices self control and forgiveness. A woman has amazing inner strength and can carry the weight of the world and inspite of that she is gentle to comfort. She can keep going when everyone else gives up and takes care of her family through sickness and fatigue without complaining. She has the sensitivity to live in all circumstances, even if she is hurt badly. Wherever you go, through out the world, women are connected well. Their dreams and aspirations connect them as much as their reality and situation. The instinct of a homemaker and mother traverses political and cultural boundaries. From this Women's day let us salute all these virtues of women.
So also much of the work of women goes unrecognized because it is not remunerated and confined to the domestic sphere. That has to be saluted. Women and their contribution is to be valued. This should be the purpose of Women's day celebration.

Adv Ashwini Deshpande



~ शेवंती ~

 

मराठी भाषा दिनाच्या अनेक शुभेच्छा!

 मराठी भाषा दिनाच्या अनेक शुभेच्छा!

मातृभाषा म्हणजे जणू आईचं ममत्व,
आपल्या अस्तित्व, संस्कृती आणि अस्मितेचं ती करते शब्दरूपी प्रातिनिधीत्व,
सान्निध्यात तिच्या, म्हणूनच वाटतं आश्वस्त,
परी, स्वभाषेचा सार्थ स्वाभिमान राखताना, परभाषेच्याही सन्मानाचे पाळावे तत्व!
मराठी असे आपली मायबोली,
किती एक सारस्वतांनी आपल्या लेखणीतून जिची पालखी वाहिली गौरवशाली!,
कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, साजरा केला जातो, मराठी भाषा दिन!
माता आणि पुत्र, दोघांनी परस्परांना गौरवान्वित करावे, यापरिस काय तो सुदिन?!

आकांक्षा

दानाचा संकल्प करु या!

 दानाचा संकल्प करु या!

पहाता पहाता  हे वर्ष संपत आले. नव्या वर्षासाठी काय योजायचे याचा विचार सुरु झालाय नॽ पाहू या का हे जमते का तेॽ 

‘जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोऽधिकम्।’ याचा सरळ सरळ अर्थ ‘जीवनामध्ये आपण जे कमावतो, त्याहून अधिक दान आपण दिले पाहिजे.’ 

संस्कृत भाषेत आपल्याला विचार करायला प्रवृत्त करणारी असंख्य वचने आहेत. खरे तर सगळ्याच भाषेत अशी वचने असतील पण आपल्या गीर्वाण वाणीतली वचने अल्पाक्षरी म्हणजे अत्यंत कमी शब्दात भरपूर अर्थ सांगणारी, सहजतया संस्कार करणारी आहेत हे नक्की. 

जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक जीवच जगण्यासाठी काही न काही कमवत असतोच. मग प्राण्यांच्या बाबतीत ती शिकार असेल, वनस्पतींच्या बाबतीत ते जीवनग्रहण असेल. मनुष्याला तर अनेकांचे सहाय्य होतच असते. आपणही इतरांना साह्य करतो. पण हे साह्य नेहमी समजून केले जाते असे नाही. प्राणी अथवा वनस्पती निसर्गातून त्यांना आवश्यक असेल तेवढेच घेतात. माणसाच्या बाबतीत मात्र हे बरेचदा विपरितही दिसते. म्हणजे माणूस जेवढे घेतो ते सगळे आवश्यकच असते असे नाही. त्यामुळे मग मानवाचेच नव्हे तर सगळ्या जीवसृष्टीचे निसर्गचक्रही बिघडते. सध्या तर आपण अशा भयावह वाटणाऱ्या परिस्थितीतून जात आहोत. अशावेळी वरील वचनाचा अर्थ आपण सर्वांनीच समजून घ्यावयास हवा आहे. 

आपण जन्मल्यापासून आई, वडिल, गुरुजन, समाज आणि निसर्ग या सर्व घटकांपासून काही न काही प्राप्त करत असतोच. आता या प्राप्तीपेक्षा आपल्याला त्यांना अधिक दिले पाहिजे असे म्हटले आहे. आई, वडिल, गुरुजन यांचेविषयीची कृतज्ञता आपणांस सहजपणे समजते. पण नीट विचार केला तर आपल्याला दैनंदिन जीवनात सुलभतेने जगण्यासाठी अनेकांचे सहाय्य आपणास होत असते. अशांचे ऋण फेडण्यासाठी दानाची संकल्पना आपल्याकडे रूढ आहे. दान हे तेव्हाच होते ज्यावेळी त्याबदल्यात आपल्याला कोणतीही आपली अपेक्षापूर्ती करुन घ्यावयाची नसते. 

आता हे दान आपण कोणकोणत्या प्रकाराने देऊ शकतो त्याचा विचार करु या. आपल्याला सहाय्यभूत जे होत असतील त्यांचेप्रती सद्भाव असणे, त्यांना उचित मान देणे हेही एक प्रकारचे दानच असते. हे दान केवळ धन, पैसा, वस्तू या स्वरुपातच असावे असे अपेक्षित नाही. भावनिक आधार देणे, वेळ देणे, सहवास देणे, आपणांस ज्ञात असेल ते इतरांपर्यंत पोहोचवणे हे ही दान आपण देऊ शकतो. तेही मोलाचेच असते. धनादि संपत्तीने जशी समृद्धता येते तशीच या गोष्टींनी समाजात सौहार्दता नांदते. एकोपा वृद्धिंगत होतो. वेळप्रसंगी समाजात आवश्यक धाक निर्माण करण्याचे कामही या अशा उपक्रमातून साध्य होते. 

सुदृढ असणाऱ्यांनी केलेले रक्त्तदानही फार महत्त्वाचेच. नेत्रदान, देहदान, अवयव दान हे आपल्या मृत्यूपश्चात होणार असले तरी आपण त्याचा संकल्प हयातीतच करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या दानांचाही विचार करायला हरकत नाही. 

विद्यादान हे तर देता घेता दोघांनाही समृद्ध करणारे ठरते. म्हणूनच ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ असे वचन भगवंत सहजपणे सांगतात.   

कोणत्याही वयाची, परिस्थितीची बंधने घालून न घेता आपण विं. दा. करंदीकरांच्या एका कवितेतील ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे। घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्यावेत॥’ म्हणजे आपण स्वतः घेता घेता देता व्हावे याचे अनुसरण करु या. 


Padma Dabke 


An Inspiring Tea Seller

 An Inspiring Tea Seller


                                       

Recently I came across a very inspiring story of a Delhi based tea seller. I was moved so much by reading his story couldn't stop myself in penning it here. A 67-year-old Laxman Rao, award-winning chai-wala. He is a writer and tea seller. The author of over 25 novels, plays and political essays. Born in 1952 in Maharashtra's Amravati city, Laxman Rao identified his interest in reading books when he was in class 8. After a few years, he travelled to Delhi to publish his book in 1975.

Soon he understood that it is not an easy task for an ordinary person to publish a book at big publishing houses. For years he worked as a cleaner and laboured it out in Delhi. A few years later, he realised that to take care of his family he would have to sell tea, paan at the streets. But he was so much determined in fulfilling his dream of publishing his books. With a lot of hardship and struggle, he opened "Bhartiya Sahitya Kala Prakashan" and published his first book with his earnings. Till date, he has published 25 Novels in his own publishing house.

At the age of 50, he completed his graduation and at 63, he completed his post-graduation. Mr Laxman cycles to different places in the city to sell his books. A whopping 30,000 copies of his books were sold by him till date. Laxman Rao also earns around 8,000 by selling his books at his tea stall. This tea seller has also received many awards from leaders, including prime minister Indira Gandhi and former president, Pratibha Patil.

Rao says that his books are based on ideas he gets while interacting with his customers and his writings revolve around their struggles. Reviewers have said that his books ''exude a rare sense of honesty and humility". And that his writings are woven around ground realities of life. Rao is also known in Europe, where articles are written about him, e.g. in Germany. Mr Laxman now wishes to pursue his Ph, D and also wants to learn other languages. And his Dream is to become Indian Shakespeare.

Mr Rao acknowledges his humble beginnings that it was his tea shop which gave him a good life. So he will strive to sell tea till whatever age he can. Life always teaches us small things in small places, if we are determined enough to fulfil our dreams. Mr Rao story also tells us there is no age for learning. As I too believe in keep learning and keep trying.  

Tejaswini Sikka


दुर्गे दुर्घट भारी

 दुर्गे दुर्घट भारी

- सुजाता महाजन

   

सकाळच्या वेळी चंद्रीला खूप काम असायचं. वर गच्चीपासून जिने झाडत खाली यायचं. ‘बी’ विंगला तिची पाठची बहीण ‘गोदू’, ‘सी’ विंगला तिच्याहून धाकटी ‘भीमी’, ‘डी’ विंगला ‘यमी’ आणि ‘ई’ विंगला त्यांचा बापू. बापू रस्तेपण झाडायचा. चौघी बहिणी केराची एकेक मोठी टोपली घेऊन खाली यायच्या. काही घरांच्या बाहेर मोठमोठी खोकी ठेवलेली असायची. ती खोकी, थर्माकोल वगैरे वरूनच खाली टाकून द्यायचं. काहींच्या केरात दारुच्या बाटल्या असायच्या त्या काचेच्या असल्यामुळे वेगळ्या ठेवायच्या.

खाली सर्वांचा केर एकत्र आणल्यानंतर ब-याचशा चांगल्या चांगल्या वस्तू केरातून काढून घ्यायच्या. खोकी सरळ करून त्यांचे गठ्ठे बांधायचे. प्लॅस्टिक, लोखंडी वस्तू, काचेच्या बाटल्या वेगळ्या काढायच्या.

हे काम चालू असताना बापू एका बाजूला उभा राहून सतत एकामागून एक विड्या ओढत असायचा. बापू खूच उंच, लुकडा, काळासावळा, दाट भिवयांचा, उग्र चेह-याचा मनुष्य होता. पण चारी मुलींचं त्याच्यावर फार प्रेम होतं.

मुलींना आई नव्हती. म्हणजे त्यांची आई स्टोव्हचा भडका उडून जळून मेली होती. ती खूपच सालस बाई होती. त्या मानाने बापू भडक डोक्याचा होता. आई तशी मेली तेव्हा मुली खूपच लहान होत्या. फक्त चंद्रीला थोडंफार कळत होतं. बापूबद्दल लोक काहीबाही बोलताना तिच्या कानावर आलं होतं. बापूनेच आईला मारलं असं लोक म्हणायचे. पण तिला कधीच ते पटलं नाही. गरिबाबद्दल काय, कुणी काहीही बोलावं. तिला खूप राग यायचा बापूबद्दल भलतंसलतं बोलणा-या लोकांचा.

आई गेल्यावर महिनाभरातच बापूने दुसरं लग्न केलं. दुसरी आई त्यांच्या नात्यातलीच होती. चंद्रीहून सात-आठ वर्षांनी मोठी असेल. तरुण आणि सुंदर होती. तरीही चंद्रीला असं वाटलं नाही, की या बाईंसाठी बापूने असं काही केलं असेल.

नवी आई त्यांच्याशी कधी वाईट वागली नाही. उलट ती मुलींमधली एक बनून राहायची. चारी मुली बापूबरोबर कामाला येत असल्या तरी अजून धाकटे दोघे भाऊ होते. नवी आई त्यांना सांभाळायची. एखाद दिवशी ती पण त्या दोघांना बरोबर घेऊन एक बोटाला, एक कडेवर शिवाय एक पोटात अशी कामाला यायची. एवढ्या मोठ्या कॉलनीतल्या मध्यभागी असलेल्या बागेत मुलांना बसवायची आणि जवळपासच झाडत रहायची. कोप-यावरच्या दुकानातनं ५० पै. च्या गोळ्या त्यांना घेऊन दिल्या की ते एकामागून एक चघळत बसायचे. कधी कधी भांडणं, मारामा-या करायचे. ‘आये’, ‘बापू’ करून ओरडायचे. चार मुली, आई, बापू जो कुणी ऐकेल तो पटकन धावून यायचा.

पण मुलांना सांभाळावं म्हणून आई घरीच थांबायची.

पावसाळ्याच्या दिवसात गच्चीवरुन खूप पाणी जिन्यांवर यायचं तेव्हा जिन्यावरचं पाणी केरासह लोटत लोटत खाली न्यावं लागयचं. हात भरून यायचे.

कधी कधी लोकांशी कटकटी व्हायच्या. काही लोक दररोज कटकट करणारे होते. केराची बादली ठेवली, की ‘नीट झाडत जा ग जिना’

‘केराची पिशवी नको काढून नेऊस. रोज रोज नवी पिशवी कुठून आणायची?’’

‘बादलीला केर राहिला बघ. नीट पुसून घे.’

कुठल्याही वेळेला आलं तरी ‘भलत्या वेळेला काय येते गं?’

कुणी म्हणायचं, ‘मुलांच्या डब्याच्या घाईत येत जाऊ नकोस.’

कुणी म्हणायचं, ‘सकाळी पटकन्‌ येऊन स्वच्छ करून जावं तर किती उशीरा येतेस.’

काही काही लोक बादली बाहेर ठेवून द्यायचे. मग कुत्री जाऊन सगळं उचकून बाहेर काढणार उघडं परब्रह्म. अंड्यांची टरफलं, भाज्यांचे देठ, चहाच्या गाळासकट चहाचे थेंब, फळांची सालं, कंडोम...

त्यामुळे कुत्री म्हणजे बापूच्या पूर्ण कुटुंबाचीच शत्रू. खाली केर आणून ठेवला की कुत्री धावत येणार, बापूचं लक्ष नाही पाहून टोपलीत तोंड घालणार. पिशव्या बाहेर उपसणार. मग बापूने एक सणसणीत शिवी घालून जोरात एखादा दगड फेकला, की कुत्री क्यॅ क्यॅ करत पळून जाणार.

मग सगळा केर एकत्र करायचा. चंद्री त्या टोपलीत उभी राहून पायाने केर दाबून दाबून बसवायची मग बापू एम-८० घेऊन यायचा. चंद्री त्याच्यामागे टोपली घेऊन बसायची. मग ते कोप-यावरच्या कचराकुंडीत केर ओतून यायचे.

एवढं सगळं काम करता करता पोरींचा जीव थकून जायचा. पण बापूला आपण मदत करतोय ही भावनाच त्यांना पुरेशी होती. बापूच्या थकलेल्या चेह-यावर आनंदाचं हसू दिसलं की त्यांचा थकवा पळून जायचा.

एकेक विंग एकटीने झाडताना, येणा-या प्रत्येक गोष्टीला तोंड देताना, शेवटच्या पायरीपर्यंत आलं, की गड जिंकल्यासारखं वाटायचं. पाठमोरा बापू झाडताना दिसला की मायेची ऊब पसरल्यासारखं वाटायचं. एकत्र काम करण्याचा आनंद एवढा मोठा होता, की कामांचे कष्ट काहीच जाणवायचे नाहीत.

कधी थंडीच्या दिवसात पार्किंगच्या जागेत एखाद्या मोडक्या खुर्चीत बापू बसलेला असायचा. चंद्री त्याच्या डोक्यातल्या उवा काढून द्यायची. ती कामाला गेली की भीमी यायची, मग गोदी, मग यमी. सगळ्या मिळून बापूचं डोकं साफ करून टाकायच्या. बापू खुर्चीत गुंगी झाल्यासारखा मुटकुळं करून पडून रहायचा.

कधी कधी केरात कुणी टाकून दिलेल्या काही चांगल्या वस्तू अनपेक्षितपणे मिळून जायच्या. एकदा असाच एका माणसाने जुना सोफासेट बापूला घेऊन जायला सांगितलं. तो दिवस अविस्मरणीय होता. बापूने चार माणसं मदतीला आणून सोफासेट घरी नेला होता. तो थोडासा फाटलेला होता. फाटक्या जागेतून स्पंज बाहेर आलेला होता.

पोरांनी सोफ्यावर खूप उड्या मारल्या. सगळ्यांनी एकाचवेळी सोफ्यावर बसून कसं वाटतं ते बघितलं. कुणी झोपून पाहिलं. त्याच्यावरनं बरीचशी भांडाभांडी झाली. पण तो दिवस वेगळाच होता. शेजारीपाजारी दिवसभर सोफा पहायला येत होते. गप्पा चालल्या होत्या.

गेले काही दिवस बापू ज्या कॉलनीत काम करायचा तिथे नवाच प्रॉब्लेम झाला होता, तो परदेशी नागरिकांचा, विशेषतः आफ्रिकन. त्यांच्याशी कुठलाच डायलॉग शक्य नसायचा. ही मंडळी उपद्रवी होती. रात्रभर ये जा करणे, त्यापायी लिफ्ट सतत चालू, पाण्याचा नळ उघडा ठेवून जाणे, कोप-यावरच्या दुकानापाशी मोठा घोळका करून सिगरेटी फुंकणे, बडबड करणे, अर्धनग्न पोरींना घेऊन बेताल वागणे, रात्री उशिरापर्यंत गाणी लावून समूहनृत्य, अशासारखे त्यांचे त्रास असायचे. घरमालकाकडे तक्रार केली तर ते दुर्लक्ष करायचे. याचं कारण ज्या ज्या फ्लॅटधारकांचे हे भाडेकरू होते तेच सोसायटी चालवणारे होते, तक्रार कोणाकडे करणार? आपल्याकडच्या लोकशाहीचं हेच स्वरूप आहे हे प्रत्येकालाच माहीत असल्याने कुणी काही करूशकत नव्हतं.

बापूची एकदोनदा या आफ्रिकन लोकांशी बाचाबाची झाली. बाचाबाची म्हणजे बापू हिंदीत बोलत होता ते लोक त्याला इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत होते. दोघांनाही एकमेकांची भाषा, देहबोली काहीच कळत नव्हतं.

हे लोक उशिरा झोपत असल्याने सकाळी बापूने दार वाजवलं की, ते दार उघडायचे नाहीत. नंतर सगळं साफ करून बापू गेला की केराची टोपली बाहेर ठेवून द्यायचे. कुत्री सगळा केर रस्ताभर करायची.

बापूने तडातडा हिंदीत बडबड करायचा. वेगळ्या लोकांशी बोलायचं तर मराठीत बोलायचं नसतं एवढं बापूला माहीत होतं. मराठीत बोलायचं नाही म्हणून तो हिंदीत बोलायचा. लोक त्याच्या तोंडाकडे पहात राह्यचे.

शेवटी बापूने एकाला पकडून आणून आपलं म्हणणं ट्रान्सलेट करून त्यांच्यापर्यंत पोचवलं.

तरीही प्रॉब्लेम झालाच.

त्या दिवशी बापू जोरात ओरडत जिन्यावरून खाली आला, ‘‘मारलं मारलं’ करत.

लगेच बघे जमले. बापूचे केस विस्कटले होते, शर्ट फाटला होता, गाल काळपट तांबडा झाला होता. तो संपाप आणि दुःखाने रडत होता. लोकांना सांगत होता, ‘त्यांनी रूममध्ये इथे एवढा कचरा करुन ठेवलावता. मला म्हणाले, आत येऊन सगळं झाडून कचरा घेऊन जा. म्हंजे खुनांनी सांगत व्हते. मी म्हटलं, मी इथे काम नाही करत. तुमी केर ठेवला की मी तो घेऊन जानार. मी न्हाई म्हनलो तर माजा शर्ट धरून ओढला. येकाने लाथ घातली. येकानं थोबाडीत दिली.’
बापू पुन्हा रडायला लागला. त्याला लागलं होतं त्याच्या वेदनांपेक्षा आकस्मिक घडलेल्या घटनेचा शॉक जास्त बसला होता आणि भयंकर अपमान वाटत होता.
‘ए’ विंगमध्ये चंद्री झाडत होती. खालून भीमीच्या जोरात हाका आणि अर्धवट रडणं ऐकू आलं. चंद्रीच्या छातीत धस्स झालं. काय झालं?

ती धावत खाली आली. खाली भीमी रडत उभी होती. ती म्हणाली, ‘बापूला मारलं’

चंद्री बेभान होऊन तिच्यामागे धावायला लागली. ‘ई’ विंगपाशी खुर्चीवर बापू बसला होता. केस विस्कटलेले, शर्ट फाटलेला. रडत होता. लोक त्याची समजूत काढत होते. कुणीतरी त्याला पाणी आणून दिलं होतं. पाण्याचा ग्लास हातात तसाच ठेवून तो रडत होता.

लोक आपापात बोलत होते, ‘फारच त्रास वाढलाय या मेल्यांचा. कुणी यांना काही कसं बोलत नाही.’

‘कोण काय बोलणार’ इकडे तिकडे पहात हळूच, ‘त्यांना पाठीशी घालणारे आहेत ना!’

‘पण काहीतरी करायला हवं. अहो, दुकानापाशी उभं राहून सिगरेट ओढू नका. आमच्या घरात सारखा धूर कोंडतो किती वेळा सांगितलं तरी ऐकत नाहीत.’

‘कधी कधी वाटतं, कुठून आलो या सोसायटीत पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, शिवाय गुंडगिरी आणि दादागिरी. आपण कुठे कुणाशी भांडण, मारामा-या करत बसणार न! आणि केली तरी कायम थोडी करु शकणार!’

‘मला तर कधी कधी वाटतं, कुठून आलो या शहरात. चंद्रावर नसतील इतके खड्डे या शहरात आहेत. वाहन चालवताना कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी शिवाय ट्रॅफिक ज्यॅमची कटकट, बस कधी वेळेवर मिळणार नाही. इतक्या इतक्या वेळाने बस येते की पूर्ण भरून खाली लोंबायला लागते माणसांनी. परवा नाही का ती बिचारी मुलगी गेली.’

‘अहो, नव्या गाड्यांसाठी पैसे मंजूर केलेले. आणल्या कुठे नव्या गाड्या? काही खरं नाही या शहराचं.’

‘जाऊन जाऊन कुठे जाणार तुम्ही. दुसरीकडे काय वेगळं असेल? आपला देशच असा आहे. सगळे साले नुस्ते पैसे खाणारे.’

‘अहो महाराज, आपण फार बरे. तिकडं बिहार, उत्तर प्रदेश, आसाम तिकडं बघा. म्हंजे आपण फार सुखात आहोत असं वाटेल तुम्हाला.’

‘आपल्याला शिकवतातच ना नाहीतरी. तुमच्याहून मोठं दुःख असलेले लोक पहा म्हंजे तुमचं दुःख कमी होईल.’

अशीच चर्चा भरकटत राहिली.

चंद्रीने लोकांकडून सगळी चर्चा शांतपणे ऐकली ती लगेच वळून चालायला लागली.

‘ई’ विंगमधल्या बारा नं. च्या फ्लॅटची बेल वाजली. जॉनने दार उघडलं.

दारात तेरा-चौदा वर्षांची एक काळीसावळी, उंच, लुकडी मुलगी उभी होती. तीक्ष्ण डोळ्यांनी जॉनकडं पहात होती.

जॉनने इंग्लिशमध्ये ‘कोण पाहिजे’ विचारलं. प्रश्न संपताच लुकड्या हातांची एक सणसणीत चपराक गालावर बसली. विलक्षण धक्का बसून त्याने तिच्याकडे पाहिलं. तेव्हा दुस-या गालावर दण्णकन चपराक बसली.

कुठल्याही कृतीचं सामर्थ्य नसलेल्या पराभूत मनोवृत्तीच्या लोकांमधून २/४ माणसं कशीबशी निवडून बापू त्यांना घेऊन वर आला तेव्हा त्याला हे अभूतपूर्व दृश्य पहायला मिळालं. काहीही न बोलता चंद्री शांतपणे मागे वळली तेव्हा लोक थक्क होऊन आपल्याकडे बघताना तिला दिसले.

दारात बधीर होऊन थांबलेल्या जॉनला एका क्षणात ही पोरगी कोण आणि तिने आपल्याला का मारलं याचा उलगडा झाला.

एकदा समूह झाला की तो काहीही करू शकतो याचं उपजत ज्ञान त्याच्यात जागृत झालं. सगळ्यांसमोर तो बापूला हात जोडून ‘सॉरी, सॉरी’ म्हणाला मग चंद्रीकडे वळून तिला ‘सॉरी, सॉरी’ म्हणाला.

आता बोलण्यासारखं काही नव्हतं.

सगळे खाली उतरले तेव्हा चंद्रीची चपराक आपल्यालाच बसली असावी असं ओशाळेपण, नीट न घासलेल्या भांड्याला खरकटं राहून जावं तसं प्रत्येकाच्या मनाला चिकटून राहिलं होतं.


***

Different Strokes

 Different Strokes


Those tender eyes,

Full of hopes and dreams,

Seem to tell a tale,

A tale of life they live.


We are different, they say,

Different from you and me.

It needn’t be physical always,

As we are different other ways.


Some of us like to read,

Some like to paint.

Some need to be cuddled,

And some can’t sit tight.


Words look dangerous,

Numbers too scare us.

We try to maintain a distance,

As sometimes people seem a menace.


Take time to understand us,

Give us time to adjust.

Don’t hasten to tag us,

As, the tags, forever exist.


Kirti V