Monday 30 September 2019

गणपती बाप्पा मोरया

गणू बाळ म्हणे, "उंदरोबा
हे जरी खरं की, मी आईचा लाडोबा!
पण तरीही दरवर्षी ती विसरत नाही मला बजावायला!
म्हणते कशी, "गणू, नेहमीप्रमाणे माझ्या आधी जातोयस माझ्या माहेराला
सगळे लाड पुरवून घे, पण जरा जप हो, आपल्या पोटाला!"
आणि म्हणून त्या माउलीने स्वतः खपून एवढा मोठा मोदक आहे बनवला

या दहा दिवसांच्या प्रवासात, काही म्हणून काहीही, मला-तुला, नको बाधायला!

By

Akanksha Phadke

Jogeshwari, India

अनुभव

शनिवारी काही कामानिमित्त नाशिकला गेलो होतो. सकाळी 9 वाजता ठाण्याहून निघालो. कसारा घाटातून जेंव्हा प्रवास सुरू झाला तेंव्हा अहाहा असं वातावरण होतं. अप्रतिम सुंदर दिसत होता घाट...हिरवाईच्या वेगवेगळ्या छटा...धबधबे....मस्त वातावरण होतं. घाट संपल्यावर  मानस हाॕटेलच्या अगोदर साधारण रस्यावर धुकं पसरायला लागलं. मी विवेकला म्हटलं पण की अरे काय सही मुहुर्तावर आपण हा प्रवास सुरू केलाय....नंतर धुकं खूप दाट व्हायला लागलं. मग तर मला अजूनच भारी वाटायला लागलं. आपण वेगळ्याच जगातून प्रवास करतोय अशी काहीशी भावना....Heavenly feeling....धुक्याच्या दाट दुलईतून वास्तव जगात प्रवेश केल्याबरोबर traffic jam, खराब रस्ते असं सगळं regular routine सुरू झालं. नाशिकला पोचलो.  मला घरी सोडून थोड्यावेळाने विवेक त्याच्या कामासाठी निघून गेला. मी, आई आणि  माझी लहान बहीण आम्ही  मनसोक्त गप्पा मारल्या. मी एकदम refresh झाले. संध्याकाळी  5.30 च्या सुमारास परतीच्या वाटेला लागलो. नाशिकहून निघताना नेहेमीच मला चुटपुट लागते. तशीच थोडी लागली होती. घोटी ओलांडून पुढे आलो. धुक्याची हलकी चादर पसरायला लागली होती. का कुणास ठाऊक मनाला थोडी हुरहुर लागली होती. पुढे जाउ लागलो तसं धुकं अजूनच गडद, घट्ट होउ लागलं. पुढंचं काहीच दिसत नव्हत. Literally धुक्याला चिरत गाडी पुढे जात होती. सगळं वातावरणच विचित्र, स्तब्ध झालं होतं. जणू काही आम्ही गाडीसकट एका वेगळ्याच मितीत प्रवेश करत होतो. वेगळाच time zone...त्या क्षणी अनेक गोष्टी आठवल्या.... गायब झालेल्या माणसांच्या, गाड्यांच्या....ज्यांचा काही पुढे trace च लागत नाही. आता सगळं संपलं ही मनाची stage आली. लोकांशी निर्रथक घातलेले वाद, कोणावर काहीतरी कारणाने  असलेला राग सगळं आठवायला लागलं. आणि जाणवलं किती साध्या गोष्टींमधे आपण राग, लोभ बाळगतो....

सकाळी रमणीय वाटणारं दृष्य आता फार भयानक वाटायला लागलं. सकाळी जे heavenly वाटत होतं ते आता दुसऱ्या अर्थाने heavenly वाटू लागलं. धुकं किंचित ओसरू लागलं. घाट सुरू झालेला होता. सकाळी भारी वाटलेले धबधबे पुसटसे दिसत होते आणि भितीदायक वाटत होते. गाडीत आम्ही गप्पच होतोहोता, होता धुकं कमी होऊ लागलं. दूरवर लतीफवाडीचे दिवे दिसायला लागले आणि मी सुटकेचा श्वास टाकला....


ह्याला काय म्हणायचं? माझ्याच मनाने घेतलेले हे दोन अनुभव....एक सकाळी, एक संध्याकाळी ....आपलं एखाद्या गोष्टीचं perception वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं असतं का? आपल्या हातून कळत, नकळत झालेल्या चुकांची जाणीव तेंव्हाच का व्हावी? त्या आता यापुढे टाळूया असं मी ठरवलं....का हे स्मशानवैराग्य असेल? कुणास ठाऊक....

By 

Manjusha Datar

Thane, India

बाप्पा मोरया

बिल्डिंगच्या खाली चाललेल्या उत्साही गोंधळाचा आवाज बंद खिडकीतूनही कानावर आदळला आणि आप्पांना जाग आली. झोप कसली ग्लानीच होती ती. गेल्या कितीतरी दिवसांपासून आजारपणाने त्यांना घेरून टाकले होते. जागचे उठवतही नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांची मदत लागत होती. आत्ताही त्यांनी क्षीण आवाजात माईंना हाक मारण्याचा प्रयत्न केला. पण किती वेळ झाला तरी माई आल्याच नाहीत. मग त्यांनीच हळूहळू उठण्याचा प्रयत्न केला आणि बाजूच्या टेबलाला धक्का लागला. बरेच सामान खाली पडण्याचा, ग्लास फुटण्याचा खळकन आवाज आला. आणि माई धावत आत आल्या.

'काही हवे आहे का? ' आप्पांना आधार देत बसते करत माईंनी विचारले. ' कसला आवाज ग खालती?' आप्पांनी विचारले. 'दहीहंडी बांधलीय खाली बिल्डींगमधे. धमाल करता आहेत पोरे खाली. तेच बघत होते शेजारच्या खोलीच्या खिडकीतून.' माईंचे एकीकडे आवाराआवर करत उत्तर.

"दहीहांडी म्हंजे अष्टमी आली. बापरे म्हंजे गणपतीला जेमतेम दहा दिवस उरले. एव्हाना 'बाप्पा' ने रूप घेतले असते आपल्या नेहमी. वाळण्याची वाट बघत कोपऱ्यात बसलेला असतो बाप्पा. एकीकडे पोळ्यासाठी बैलजोडी, आणि हरितालिकेसाठी सखी पार्वतीच्या मुर्ती पण घडत असतात. गणपतीचे पितांबर, पोट, कान, सोंड ,हात, हातातली आयुधे, मोदक दागदागिने आणि उंदिरमामा सगळे एकएक करून रंगवले जातात. मग उरतात फक्त डोळे. ते रंगवायला आप्पा नेहमी सकाळीच घ्यायचे ते सुद्धा बाहेर पडवीत स्वच्छ उजेडात. खुप कौशल्याचे काम ते. नीट झाले की खरा जिवंतपणा येतो मुर्तीत." आप्पा स्वतःशी बोलत असल्यासारखे आठवणीत रमले.

" कुलकर्ण्यांचा गणपती आजवर कधी विकत आणला गेला नाही. पहिले दादा, आप्पांचे आजोबा घडवायचे तो. नंतर तात्या, आप्पांचे वडिल. आप्पा लहानपणापासून मदत करता करता कधी मुर्ती घडवायला लागले कळलही  नाही त्यांना. मुळची कलाकार वृत्ती. त्यांत मुंबईला आल्यावर समानपंथी सुहृदांची भर पडली आणि दरवेळी साच्यापेक्षा वेगळी मुर्ती घडू लागली. नवे प्रयोग, नवे रंग, नवी आरास. दहा दिवसांत आप्पांकडचे बाप्पांचे रूप आणि मुक्काम अगदी गाजायचा."

"शेजारपाजरचे आणि मित्रमंडळ अगदी मागे लागायचे आप्पांच्या यावेळचा आमचा बाप्पा तुम्हीच घडवा म्हणून. मग नोकरी सांभाळून एवढे सगळे गणपती करताना तारांबळ उडायची आप्पांची. एक वर्ष हत्तीवरच्या अंबारीत बसलेला गणपती केला होता तेव्हा तर दागदागिन्याचे नाजुक काम पुर्ण होईस्तोवर गौरी आगमनाचा दिवस उजाडला होता. एक वर्ष अष्टविनायक ते सुद्धा चक्राकार फिरणारे केले होते. त्यासाठी वेल्डिंग करुन घेताना डोळ्यात ही उडाले होते. पण आख्खा गाव लोटला होता तेव्हा दर्शनाला. एकेका वर्षाचे गणपती आणि आरास आप्पांच्या डोळ्यापुढे अगदी चित्रफितीसारखे फिरू लागले."

"गेल्या सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून असणारी कुलकर्ण्यांची परंपरा यावेळी मोडणार की काय? दहीहंडी आली तरी मुर्ती चा पत्ता नाही. त्यात प्रसाद आप्पांचा एकुलता एक मुलगा ही कामानिमित्ताने परदेशी गेलेला. तो असता तर घडवली असती मुर्ती त्याने. तसा फारसा रमत नाही तो त्यात लहानपणापासून, पण वेळेला हातभार नेहमीच लावतो. आत्ता घरात फक्त आप्पा, माई, प्रज्ञा म्हंजे प्रसादची बायको आणि 'सान्वी म्हंजे आप्पांची नऊ वर्षाची नात. तशी आप्पा गणपती घडवायचे तेव्हा सान्वी घुटमळायची मागे मागे. पण बरेचदा जेव्हा आप्पांना गणपती घडवायचा उत्साह असायचा तेव्हा बरेचदा शाळा आणि कसले कसले क्लास यांतच दिवस जायचा तिचा. तेव्हा यावेळी बाप्पांच्या मनात  कुलकर्ण्यांच्या हातून सेवा घडणे नाही या विचाराने आप्पांचे मन भरून आले."

विचार आणि ग्लानी च्या फेऱ्यात रात्र गेली. रविवारचा दिवस उजाडला. सकाळी सान्वी खोलीत येवून आज गंमत आणणार आहे आप्पा मी असे कानात सांगून गेली. 'काय ग' माईला खुणेने विचारले तर तीही काहीतरी निम्मित करून बाहेर सटकली.होता होता संध्याकाळ होत आली. आणि आप्पांना फारशी रुचत नसे अशी जोरात दोनदा बेल वाजली.

हॉलमधून उत्साही खिदळणे ऐकू येवू लागले आणि सान्वी आणि मित्रमंडळ आले हे आप्पांनी ताडले. सरप्राईज करत पोरे आप्पांच्या खोलीत घुसली. सान्वीच्या हातात तिने घडवलेला बाप्पा होता. होता छोटासाच पण तिने घडवलेला. त्यासाठी मागले चार रविवार कार्यशाळेत जात होती ती. अर्थात तिच्या ड्रॉईंग क्लासच्या ताई दादांची मदत होतीच. बाप्पाचे ते रूप बघून डोळे भरून आले आप्पांचे. हात जोडले गेले आणि मनात आले. "देवा गजानना तुलाच काळजी. तुझे रुप तु घडवून घेतलेस. परंपरा जपली गेली आणि वारसाही. शेवटी सगळ्याचा कर्ता करविता तुच" 

By

Prajakta Karve Joshi

Thane, India

Wings to Affection - Part 3

Since unknown to the location, his mind started sweating because he is not experienced to live without family. And to swipe his nervousness, he asks his pocket to pass him the handkerchief, delivery was taken by hands but witnessed that something is missing. His brains speedily started sweating now because of this missing report witnessed by hands. These happenings were covered by her eyes but were confused about his actions. Do you know what was missing from his pocket? Well, it’s a packet of drugs which he carried in his pocket which was last seen in the bus premises.

“Hello, Mr. Can I know what happened?” says Ishani tapping him from the back.

The boy went crazy and couldn’t control his anger + nervous packed feeling, in addition, her questions irritated him. Some seconds he managed to control but a tight slap on her face showed that he lost his control now. This incident shook her up so badly that she ran from the spot and tried to evade her tears which doesn’t seem possible. His fingers left red prints on her face and moreover she was not expecting this suddenly, finally, she stopped and made herself normal.

Breathlessness symbolized by her vanished after she raised her eyes up to view a magnificent beach which purified her soul. Beaches are the real stress relievers reviewed by many people in the world. The breeze, sand and the water gives you a mesmerizing feeling. She took a position to sit and started to cry again as she was hurt deeply. She took her bottle of energy drink out and started taking sips of it with belches. Let me reveal a secret about her, a real-time alcoholic girl only preferring Desi Daru. She drinks in high quantity when upset and projects her sad life and goes into deep sorrow.

In the middle of the alone road, Ronit was walking like a dead body with no energy and slipped over a wet area. After touching the ground, a packet exited from his pocket and with happiness got up to take his packet. He realized that he himself was wrong as he searched his drugs packet in the wrong pocket. The packet as per his need can only fulfill his one night. He is worried now about that.

By

Nidhi Mehta Poddar

Dombivli, India

Independence

Purnima, one of my friends, purchased a beautiful cage with a wonderful small bird clad in bright blue feathers.  I liked the bird.  Next, I visited her house to meet the bird and felt as if it was upset.  This blue piece of sky was imprisoned in a golden cage and had lost its independence? The bird is a symbol of freedom. 

I started thinking about myself, whether I would like such life, not only me but nobody would prefer this.
Independence can be experienced at multiple levels in life.  In family relations, in choosing one's academic career, economic activity, in social relations, in religion, in culture and so on. All these things also put a restriction on the personality and expression of an individual. So everybody has to find a compromising line between these two.
They say one gets the freedom he deserves.
With a choice or choicelessly one lives his life in the given frame.  He carries out his responsibilities’ and activities at home and outside the home.  Beyond this, every person has some spare time,  which I feel is a golden space. One can pursue his hobbies or favorite activities at this time.  One can sleep, chitchat, watch T.V. and so on.  I feel utilization of this space determines the quality of life and also molds personality of a person.  I think every person should have freedom or independent to utilize this golden space to bring fullness to his life.  One can learn more skills, can take up research work in what he is doing, can earn, can do free service [for humanity, etc.] 
I am fortunate to avail of this space and pursue my hobbies. This essay is also an outcome of my hobby of writing. 
Purnima and I set the tiny piece of sky free.
By
Bharati Garud

Bangalore, India

Heaven vs. Paradise



As a vivid reader, I often come across thoughts or insights that ignite my mind or at times I feel euphoric when I am able to make a deeper sense of learning from a book or being able to connect the dots between varied learnings. I love to discuss and debate my learnings with my pool of friends who are great readers themselves. Lately, this shared learning keeps me going in otherwise mundane life.

In this blog post, I am quite excited to pen down a thought that has resided in me since I have read a book by Devdutt Pattanaik called ‘Sita’. For people who haven’t read this book, this book is his version of famous Hindu mythology ‘Ramayana’. Please find below an episode from Ramayana, which has changed my outlook towards life.

Once when Ram, Laxman, and Sita were wandering deep in the forest during their exile, Laxman happens to talk about how lucky Indra, the king of gods was to live in heaven. He seeks Ram’s opinion on the same to which Ram replied that he didn’t agree that the place where Indra lived could be called as Heaven. He said it could at the best be called ‘Paradise’ and gave his reason for stating the same. Indra is surrounded by wealth, beauty and fame, but he is always insecure, fearful that another king or sage or demon may topple him anytime. On the other hand, there is Kailash of Shiva, where there is no threat; there is peace forever. Here everyone lives harmoniously without depending on each other. Ganesha’s mouse isn’t scared that it will fall prey to Lord Shiva’s snake, neither is the snake worried of being eaten up by Kartikeya’s peacock. There is no predator-prey relationship between the inhabitants as they have successfully overcome their basic needs.

In short, here time stills, there is no ebb and flow of things, no hunger hence no quest for satisfaction, no thirst hence no satiety. In the case of paradise, there is prosperity but no peace, while in Heaven there is peace but complete indifference to prosperity.

Have you ever noticed people who are quite below us in the socio-economic order, yet seem to be quite happy in their lives compared to us? As per me, Heaven or Paradise is a state of mind. A slum dweller can live happily in his own Heaven, while a millionaire remains unhappy in his Paradise. We often keep longing for things we don’t have rather than being satisfied with the things that we have. It entirely depends on us whether we chose to live in ‘Heaven’ or ‘Paradise’.

By

Tina Kataria,

Mulund, India


थेंब शांततेचे

 थेंब शांततेचे


खूप वेळापासूनकृष्णात्या दोघांकडे बघत होती. बोलताना त्यांच्या चेह-यावर जरा जास्तच हालचाल दिसत होती. त्यांचे हावभाव, मुद्रा जरा जास्तच होत होत्या.

    ते दोघे शाळेचे विद्यार्थी होते, हे त्यांच्या गणवेषावरून कळतच होतं. बसमध्ये एकाच सीटवर बसले होते आणि तरीसुद्धा इतक्या जोरजोरात तोंडं वेडीवाकडी करून बोलत होते.

    कृष्णा बसमध्ये उभी होती. त्या दोघांची सीट तिच्यापासून दूर होती. त्यामुळे त्यांचे आवाज तिच्यापर्यंत पोचत नव्हते. तरीही त्यांच्या बोलण्याचा ढंग तिला काहीतरी विचित्र वाटत होता. उभ्या प्रवाशांची रांग हळूहळू पुढे सरकत गेली तशी कृष्णापण थोडी पुढे सरकली. त्यांच्याजवळ आली. थोडा वेळ त्यांचं निरीक्षण केल्यानंतर तिच्या लक्षात आलं, ते दोघं मूकबधिर होते. म्हणूनच ते संपूर्ण चेह-याचा संप्रेषणासाठी माध्यम म्हणून वापर करून घेत होते, हातांच्या अतिजलद हालचाली करत होते. चिन्हांकित, शब्दहीन भाषेमुळे त्यांचे चेहरे, हावभाव अतितीव्रतेने अर्थ प्रकट करण्याचा प्रयत्न करत होते. 

मोठ्या कुतूहलाने कृष्णा त्यांना निरखत होती. तेवढ्यात, रांगेत त्यांच्या सीटशेजारी जो माणूस होता त्याने त्या दोघांपुढे हात केला आणि हातांच्या जलद हालचालींनी काहीतरी सांगितलं. दोन्ही मुलांच्या चेह-यावर तीव्र आश्चर्याचे भाव उमटले. एक हात स्वतःच्या छातीवर आणि दुसरा त्या माणसाकडे करून मुलाने चेहरा प्रश्नांकित केला. उत्तरादाखल रांगेत उभ्या असणा-या त्या माणसाने आपल्या शेजारी उभ्या असलेल्या दुस-या माणसाच्या गळ्यात हात टाकून त्याला स्वतःकडे ओढलं. अर्थ स्पष्ट होता. चौघेही मूकबधिर होते. सीटवर बसलेले शाळेचे विद्यार्थी होते, बहुधा मूकबधिर विद्यालयाचे. रांगेत त्यांच्या शेजारी उभे असलेले दोघे २०-२५ वयाचे तरुण होते. एकाच वेळी चार मूकबधिर व्यक्ती एकाच बसमध्ये एकमेकांशेजारी याव्यात ही किती योगायोगाची गोष्ट होती!

    कृष्णा दुरून चौघांना न्याहाळत होती. 

एका सरकारी कार्यालयात सरकारी योजना शब्दांकित करणं, त्यांचं योग्य, नेमक्या शब्दात स्पष्टीकरण देणं, दुस-या भाषांमध्ये त्यांचा अनुवाद करणं, वेळ पडल्यास संस्कृतच्या आधारे नवे शब्द तयार करणं हे काम कृष्णा करत होती. तिला संपूर्ण दिवसभर सहवास होता, तो शब्दांचाच. शब्दांशिवाय तिच्या जगण्याला काही अर्थ नव्हता. प्रत्येक क्षणी शब्द.. शब्द.. शब्द..

    कधी कधी तिला शब्दांची घृणा वाटायला लागायची. या पार्श्वभूमीवर आज त्या चौघांचा निःशब्द संवाद पाहून तिला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. 

थोड्या वेळाने रांगेतले अनेक लोक उतरून गेले. कृष्णा त्या चौघांच्या जवळ आली. त्या चौघांचे हावभाव पाहण्यात, त्यांचा अर्थ लावण्यात तिचा कितीतरी वेळ निघून गेला. एका हाताने वरची दांडी पकडलेली, खांद्यावर ओझं असताना कुणालाही असंच वाटेल की, या अवस्थेचं थोडा वेळ विस्मरण व्हावं. वेळ असा जावा की, कसा गेला कळूही नये. कृष्णालाही हेच हवं होतं. म्हणून ती मोठ्या कुतूहलाने त्या चौघांच्या संभाषणाचा एक भाग, एक श्रोता म्हणून बनली होती. फक्त पाहणारा, जाणणारा, साक्षी. 

थोड्या वेळानंतर मात्र हे संप्रेषण आवश्यकतेपेक्षा जास्तच होतंय असं तिला वाटायला लागलं. जे बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत त्यांना एवढं बोलताना पाहून तिला जणू शिसारी यायला लागली. माणसालादुसराएवढा का हवा असतो? का उघडी करायची असतात सगळी दारं? 

मध्यरात्री अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी कृष्णाला वाटलं, शब्द कीटक बनून आपल्या डोळ्यात जातायत. ती जोरजोराने डोळे चोळून शब्दांच्या कीटकांना बाहेर काढू लागली. ते कानात शिरले, नाकात शिरले, तोंडात छोटे, छोटे केसांचे तुकडे असावेत तसे दातात, जिभेवर येऊ लागले. थू.. थू.. करून कृष्णाने शब्दांना थुंकून टाकलं. ढेकूण बनून ते कपड्यात घुसून तिला चावू लागले. मुंग्या बनून पायावर चढू लागले. कृष्णा कपडे झटकून त्या ढेकूण, मुंग्या, कीटकांना आपल्या शरीरापासून दूर करू लागली. मग तिच्या असं लक्षात आलं की शब्द जळवेसारखे तिच्या शरीराला चिकटून बसलेत. तिचं रक्त शोषतायत्‌. तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली आणि त्या आवाजानेच ती जागी झाली. 

कृष्णा बाल्कनीत येऊन उभी राहिली. तिच्यासमोर आभाळाचा एक तुकडा होता. त्यावर एकच तारा संपूर्ण सामर्थ्यानिशी तळपत होता. झाडं झोपलेली होती. स्वतःत मिटलेली होती. इमारती अंधारात गुडूप झालेल्या. कुणीही, कुठेही, काहीही आवाज करत नव्हतं. त्या असीम शांतीमुळे कृष्णा व्याकुळ झाली. तिने तोंड उघडून त्या शांततेचे थेंब पिऊन टाकले. स्वतःच्या शरीरावर अलगद हात फिरवत तिने त्या शांततेच्या कणांना स्वतःच्या शरीरात मुरवून टाकलं. शांततेचे थेंब डोळ्यात पाणी बनून  हळूहळू पाझरू लागले. त्यांच्या पाझरण्याचा कुठलाही आवाज नव्हता. सगळं नीरव, चुपचाप.

By

Sujata Mahajan

USA