Thursday 30 April 2020

Quinoa budda bowl recipe


 1 cup quinoa 
1 cup red Lentils 
1 cup rice/ javar/wheat types( Dinkel, whole wheat....)
1)Soak it all 1-2 hrs 
Pressurised or normal cook in vessel 
2)In tadaka, add garlic-ginger paste, chopped onion, available veggies. Sauté for couple of minutes , add above cooked mixture.

Orange salad dressing:
Honey/Brown sugar-1 tsp
Italian mix herbs-1tsp
Orange juice-2tsp
Balsamic vinegar-1 tsp

Prachi Karekar-Stuttgart, Germany

Schokokuchen


 

 4 Eier
350 g Zucker
115 g Butter
240 ml Milch
270 g Mehl
1 Backpulver 1Vanillinzucker
30 g Kakao

 *Zubereitung*
Erst Eier mit Zucker schlagen und dann alle anderer Zutaten mischen.Paar min. schlagen.Den Teig auf geffetette Form geben und glatt streichen.
Backen auf 180 °C für 50'min(ober-unterhitze).

 *Sirup*
500 ml Milch
2 Essl.Kaffee
(löslicher)
4 Essl.Zucker
Warme Sirup über warme Kuchen verteilen.

 *CREME*
1 Mädchenmilch
2 Schlagsahne
Schlagsahne steif schlagen.Wenn Fest ist Mädchenmilch rühren.Über kalte Kuchen  verteilen.Mit Kakao bestreuen.

Ms. Woula Chatziioannidou - Stuttgart Germany




आज शांत वाटतय --कोरोनाला धन्यवाद!

भीतीने का होईना मी थांबवतेय स्वतःला !थोडे डोकावायला जमतय  स्वतःमधे ..थोडे घराकडे ..थोड स्वतःच्या आत आणि थोडे आजूबाजूला ..काहीच अजेंडा नसतानाही चालू शकत आयुष्य ..काही प्लॅन न करताही जगता येते ..वेळेच्या विळख्यातून स्व्तःच स्वताला सोडवता येते हे आता मान्य करावच लागणार. 

खर तर भिती मला नाहीच वाटत आजकाल खुप सुरक्षित वाटते कारण, आजकाल मला जमायला लागलय माणूस म्हणुन माझा कंट्रोल सोडून सर्प्राईझेस ना सामोरे जाणे !

ज्याला being a part of flow म्हणतात ना तसे जगणे ,मला जमू लागलय त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकणे.. कारण मला उमगलय की हा अनिवार्य अंक आहे माझ्या आयुष्यातल्या मीच रचलेल्या नाटकाचा. यातील पात्रही मीच निवडलेली आणि त्यातुन घ्यायचा संदेशही मीच आत्मसात करण्यासाठी निवडलेला !

सगळे ठरलेले ..मग मी हे बदलू पाहणारी कोण ?

हे सगळे बिल्कुल निगेटिव्ह नाही मी स्वतःला कटपुतळ्या  बाहुलीची उपमा नाही दिली तर या परिस्थितीमुळे मला कळाला सरेंडरिंग चा खरा अर्थ त्या अनादी अनंत शक्ती समोर नतमस्तक होणे म्हणजे काय याची उत्तम अनुभूती  या कोरोना प्रकरणामुळे मला आली . 

निसर्ग सांगतोय बाबा रे ..स्लो डाउन.. धाऊ नकोस नुसताच ..थोडे प्रेम कर स्वतःवर.. तुझ्या लोकांवर ..बस थोडा.. गप्पा मार ..आनंद शोध कारण "Less is More" 

निसर्ग सांगतोय गरजा कमी कर ,आनंदाची साधने बदल आणि मुख्य म्हणजे भिती सोड.. उद्याची चिंता सोड ..माहीत होते का ही भीती डोक्यावर टांगती तलवार तळपत ठेवणार आहे ..पण तरी सगळ्यांची सगळी व्यवस्था चोख असणार आहे.. मध्यवर्गीयांसठी अत्यावश्यक सेवा चालु आहेत गरीबांना मदत होत आहे. जे तयार नाहीत त्यांचे मरणाही लिहिलेले असेल पण सगळे पार  पडणार जसे पडायला हवे ना अगदी  तसेच ..यात ज्याना आयुष्य सांगतय ना वेग कमी करायची गरज आहे ते घरी आहेत ..ज्यांचा रोल इथेही To Serve aahe ते याही परिस्थितीत काम करत आहेत यातुन जो तो शिकतोय जे आत्ता ज्याला त्याला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे तेच... आपण फक्त ते आत झिरपु देणे फार महत्त्वाचे आहे.

मी शिकतेय माझी नाव वल्ह थोडे सोडून त्याच्यावर सोपवायला आणि मस्त वाटतय हे give up नाही. समर्पण आहे आणि हाच चिंतेच्या पल्याड जायचा मार्ग आहे ..ह्याही परिस्थितीत उत्तम काय तर माणुस खुप दिवसानी आपल्या सारख्या माणसाचा विचार करतोय ..त्याला ऐकतोय ..एकत्र बसतोय फक्त स्वतःसाठी नव्हे तर सगळ्या भारतासाठी साऱ्या जगासाठी प्रार्थना करतोय कारण आपला सोर्स एकच आहे केंद्रबिंदू एकच आहे म्हणून कोरोना ही सुरुवात ठरूदेत नवीन अंकुर रुजायची ..नवा माणूस यातुन घडू देत ..रोबोटिक माणसाचा अंत आणि मनाने ..हृदयाने जगणारा मनु तयार होवु देत..

वस्तू नाही ..एकमेकांना मनांत साठवणारा माणूस यातुन जन्माला यावा.

चिमणी कावळा करतात का अनावश्यक साठा ?घरट्यावर मालकी हक्कही नाही सांगत कारण त्यांचा विश्वास अभेद्य आहे नियंत्यावरचा त्याना ठावूक आहे मला आवश्यक ते अन्न आणि उबदार घरटे मिळणार आहे. झाडे कधीतरी फळे साठवून ठेवतात का या असुरक्षीततेने की न जाणो पुढच्यावेळी बहरच नाही आला तर उलट सगळेच देवुन टाकतात निरपेक्षपणे ..आणि दरवर्षी बहरतात आणि नाही आला  एखाद्या वर्षी बहर तरी तेही स्विकारतात तीतक्याच मोकळ्या मनानी.

कदाचीत हेच सरेंडरींग माणसाकडुन अपेक्षित आहे ..तु रहा तु उभारलेल्या घरात  हक्कही दाखव पण किमान कृतज्ञ रहा त्या पृथ्वी आईचा.. जीने कोणतीही अपेक्षा न ठेवता तुला इथे इतके सुरक्षित ठेवलय आणि फार काही नाही रोज निदान एकदा  तरी तिच्यावरील प्रेम व्यक्त कर माणसासारखे वागुन ..तीला स्वच्छ ठेवुन ..तिच्या निर्मिती चा आदर ठेवून.

थोडा थोडा कंट्रोल सोडुयात ..अभेद्य विश्वासाला जागवुयात मनामनात..भिती नव्हे भान आणुयात. समर्पण सोपे असते एखादे बाळ चेक करते का आपली आई पाडणार तर नाही ना आपल्याला असे.नाही ना मग आपणही बाळ आहोत की आपल्या नियंत्याचे ..आत्ताच्या परीस्थितीत त्याच्याशी असलेली नाळ तुटू देवुया नको.. माणूस होवुयात आत धडधडणाऱ्या त्या इवल्याश्या हृदयामुळे आपण वेगळे आहोत रोबोपेक्षा हेच लक्षात घेवुयात तेव्हाच आपला आतला आवाज ऐकू येइल् आपल्याला जो खुप आश्वस्त आहे सगळ्याच्या पल्याड नेणारा... या तिथे...वाट पहाते.

By

Prachi Nikhil Apte

A Soul Search

Life surely instills a calm in us when there is rush of activities and chaos. That's exactly these days have called for, yes amongst all this scare. But let's stop for a while and reboot ourselves.

Call it the need of an hour of necessity, life has challenged the good the bad, the rich the poor, the powerful and the weak. Vulnerable is each to this act of nature or science. Let us ponder in these times what did we lose what did we gain? How stressful the days been? Family attained a back seat what to do it’s the way we have to function to stay in the crowd, to accumulate whatever is possible for later in life.

But yes, we lost a lot!!!!

May the sunshine dawn upon us soon and we realize the essence of life is living in this moment acquiring a little of everything. These days would go but the gist of it would always stay in our hearts forever. It has destabilized as said earlier everyone including the powerful.

Right, are the words once said “What do we take when you leave this earth”.

Hurry to grab your moments of life, live it to the core and have patience this tide will also recede.

Saraswati sankaranarayanan


आजोळ

दर उन्हाळ्याच्या सुट्टीत,
मी तिच्याकडे जायचे,
काय काय करायचं,
ते आधीच ठरलेलं असायचं

कधी चौपाटी, कधी राणी ची बाग,
कधी मत्सालय, तर कधी म्हातारीचा बूट,
कधी सिनेमा, कधी डोसा पार्टी,
तर कधी असायची घरी खाऊ ची लयलूट

चाळीत असायची भलतीच गम्मत
भरपूर सवंगडी आणि खूप सण
गणपती, होळी, दिवाळी
असायची फारच रैलचैल आणि यायची खूप मौज

ती मला खूप गोष्टी सांगायची,
युरोप मधल्या तिच्या अनुभवांनी न्याऊ घालायची,
तिच्या जुन्या साड्यांची मस्त पांघरुणं घेऊन,
मला शांत झोप लागायची

आजी आता तू नाहीस,
आता तर मला आजोळ ही उरलं नाही,
प्रेमाने हाक मारणारे आणि कुशीत घेणारे,
असं कोणीच उरलं नाही

माझं लहानपण समृद्ध केलंस,
त्याबद्दल तुझे आभार कसे मानू?
देव प्रत्येकाला तुझ्यासारखी एक तरी आजी
नक्कीच देवो
नक्कीच देवो
     
 
By

Mrunalini Dabke

The Lockdown

It was just another day in my life as I stood staring out of the window at the children who were being hurried out by their working parents to school, some eating breakfast on the go, some running to catch their cabs to the office and some speeding in their two-wheelers to reach office on time. I call it “the crazy hour’ and can hardly relate to the generation I lived in. In my household, we all used to wake up as early as 5.30 a.m. Thanks to those times when smartphones were not invented, nor any social media handles like Facebook or Instagram were available. We had no mobile phones in our hands to keep tagging or scrolling or checking other people’s life updates all night long to fall asleep very late. Mornings had a very peaceful routine rather than a hurried one running around with breakfast stuffed in mouths. Life seemed simple.

My 10-year-old grandson is stressed that he is not able to win against his mate in a FIFA video game. As an octogenarian, it is hard for me to comprehend to whom he had lost the game to, as I see him toiling alone with a weird-looking device in his hands and a 55-inch monitor he is hooked onto. My 15-year-old granddaughter is continuously worried about her figure and keeps trying different fad diets every week, my son and daughter-in-law are busy all through with office work that never seems to end at 17.00.

Some of my friends often mention that I am lucky as I live with my son and have a family to take care of my needs, as most of them have their sons and daughters living abroad. I am glad that I get to see my grandchildren every day rather than on Skype or Facetime, but I secretly feel jealous because they can instantly connect to their children abroad and talk to them for several hours in a day. I live with my family, but my son and daughter-in-law are so busy throughout the day that they hardly can ask if I m ok before leaving to bed. That’s the only conversation I have with them, and my grandchildren barely acknowledge my presence in this house. Everybody seems so caught up with his or her life.


My loneliness has led me to create some hobbies, like reading books and terrace gardening.
It was a quiet afternoon as I was working in my terrace garden, laying a fresh raised bed of soil for organic onions and carrots when I heard a little commotion in the street outside. I peeped over the edge of the terrace wall to see what the confusion was about and overheard our neighbor saying that the Prime Minister of our country has announced a nationwide lockdown for 21 days to avoid the spread of a deadly virus Covid-19 which was declared a pandemic by the WHO. I had been listening to the news about the virus and knew it was deadly, but death wasn’t something that panicked me anymore. I was only worried about my rather young family members who stayed out for the most part of the day.

In the evening, everyone returned sooner than usual, and they had also purchased food stock and groceries that will last at least a fortnight. My grandchildren were at home early, and I heard them telling their parents that their school and tuition centers have been closed for 21 days.
Inspite of all the chaos, I was excited that the family was going to be at home for 21 days without going out. It has been years since anything like this has happened. It seemed like a miracle that God has thrown my way in the last phase of my life.

They all seemed extremely disappointed by this lockdown. In the first few days, I got to witness their sense of denial to accept the fact that they had to stay at home. My son and daughter-in-law were busy doing some environmental setup with cords and plugs to set up a home office. My daughter-in-law was extra stressed as the maid won’t come, and she has to manage office work, housework, and cooking. It’s been a while I cooked for the family as they live on bread, noodles, and Pasta, Pizzas, and restaurant take away orders. So I offered to help with cooking. She seemed a bit relieved when I offered to help.

My granddaughter was very furious that her mom has asked to take up the cleaning work every morning and was worried that she is going to put on weight as her gym was also closed for 21 days. My grandson was arguing with his dad on why he had chosen a poor speed internet choice, as he is not able to play his video games much as it was prolonged since the usage has increased in the house. The sense of resentment and denial lasted for a few more days.

On the next day, to my surprise, my grandson walked into my room. I could hardly recollect when he walked into my room to check on me in the last couple of years. The last time I honestly remember him coming into my room was when his granddad was around. He asked me, “gran, what’s up with you? What are you doing? I said, “nothing much. I am just reading a book”. Do you want something? He said, “Mama is busy in a meeting, but I’m hungry,” Is there something you can whip up for me?” I said, “with pleasure. Let us check what we have”. In the fridge, there were some dried up veggies, which my grandson did not seem to be interested in.

So I asked him to come with me to check if any of my terrace gardening vegetables were ready to harvest. I saw his face light up, and he asked me, "wow, do u have a terrace garden? How come I never knew it?"

I replied, “you’re always busy with your games sitting on the couch, how would you know?” He was excited to see there were some fresh tomatoes, cauliflower, and brinjals all ready for harvest. He picked them for me, and we spent most of the forenoon chatting and cooking in the kitchen. I made some Bhaigan Bhartha (brinjal gravy) and tomato rasam (a south Indian tamarind soup) and cauliflower fry. He went around announcing the menu to the rest of the family, and like hungry bears, they gathered around the dining table to explore the menu. I couldn’t recollect when was the last time the family had actually had lunch sitting together in the dining table. They cherished the food and said that it’s tastier than in the restaurants; they spoke to each other about their lives, shared their frustrations, and shared the food, and enjoyed themselves. The happiest part of this was that I was a part of it, and I felt like a centerpiece when they knew that the vegetables were from my terrace garden. My grandchildren wanted to make a YouTube series (whatever that is!!!) of my native dishes from homegrown vegetables.

My daughter-in-law was happy that she has some support while she is working hard to support my son for financial needs. Its been now 15 days since the lockdown, my family has grown close to me, I’m the first thing they check for in the morning. My grandchildren want to hear gran stories that I thought were going to die with me; they shoot videos about my cooking and terrace gardening. My daughter-in-law shows interest in learning traditional food and bonds with me more. My son secretly shares a smile with me since he knows that his mom is happy now.


These 21 days in my life are the moments that I will cherish forever as it has given me happiness beyond words and a sense of belonging. A family I felt was far apart though living under one roof always worried me and made me wonder if this was how the future families are going to live. But nature is beyond everything, and this, in a way, is definitely a fix for many things that humans were erring beyond repair.

By

Sarwari Venkata

काहूर


*काहूर*

दाटून आलेले ढग 
अन् 
मनात दाटलेला काहूर,
दूर दूर च्या क्षितिजावर 
आठवणींची चाहूल.
आता कोसळेल 
मग कोसळेल,
आधी मन 
कि आधी मेघ!
कातर सांजवेळ 
कोसळण्याच्या आशेवर,
चालू आहे नुसताच 
पाठशिवणीचा खेळ.
शेवटी तो कोसळला 
क्षितिजावर बरसला,
आठवणींचा बुरुज 
क्षणार्धात ढासळला!

         *सौ. सुगंधा पंकज रागळवार*
                    जर्मनी


Konkani Chicken Curry

Konkani Chicken Curry 
 
 
List of ingredients            serves: 5-6 ppl  
 
For Chicken Marinate 
Chicken ( preferably with bones) 1kg 
Ginger garlic paste 1 tsp 
Salt 
Turmeric powder ½ tsp 
Marinate the chicken and keep aside for at least 30 min.  
 
For Masala/Watan 
Roast together 
Peppercorns 6-7 nos 
Cloves 4-5 nos 
Cardamom 4-5 
Cinnamon stick 1 inch 
Sesame seeds 1 tsp 
Khus khus 1 tsp 
Fennel seeds 1 tbsp 
Coriander seeds 2 tbsp 
Dessicated coconut 5 tbsp 
Onions 1 whole sliced 
Grind the above to make smooth paste. 
 
For Curry/ Kalvan 
Onion 1 -2 chopped ( size large/medium) 
Tomato 1 chopped 
Ginger garlic paste 1 tsp 
Kanda masala ( substitute with garam masala if unavailable) 
Red chilly powder ( color) 
Oil ½ cup 
Green Coriander ( deco optional) 
Sliced green chilly (deco optional) 
 
Method: 
 
Take oil in a pan/ kadhaai/wok. This recipe demands more oil so do not shy away from the quantity 
Add chopped onions and fry until they turn golden brown 
Add ginger garlic paste and fry till the raw smell goes 
Add tomatoes and cook until well integrated and they start leaving oil from the sides of the pan.  
Add the watan and fry for a minute. 
Add the dry spices chili powder, kanda masala, garam masala. 
Add marinated chicken and fry till well coated and it changes color a little bit. 
Now add warm water according to the desired consistency.  
Close the lid and let it cook on low medium flame.  
Once the chicken is cooked garnish with coriander and sliced green chilly. (optional)

Jaee Palande- Stuttgart, Germany

"Rendezvous with Antarang" - Nihira Joshi Deshpande.

 Nihira Joshi Deshpande



About Nihira:

Hi, this is Nihira Joshi Deshpande. I am a professional musician, a singer and a composer. I have appeared on TV shows like Sareagamapa and Soor Nava Dhyas Nava. I have sung for films in Bollywood like Kill Dill, Salaam e ishq, Bunty aur Bubli. I had the priviledge of working with Shankar Ehsaan Loy in these films. I have also sung for a lot of Marathi films like Zenda, Irada Pakka, Whats up Lagna, Aamhi Saatpute for composers like Avadoot Gupte, Nilesh Moharir, Ashok Patki, Saleel Kulkarni, Jitendra Kulkarni. I am a Radio Mirchi Award and a State Award Nominee for my song in Whats up Lagna, Funkarichi Vaadale.
I also compose and sing my own songs. My two independent singles called Na Chedo Hamein and Nirmohiya are available on my youtube channel as well as several audio platforms. Nirmohiya was a part of the Apple Music Editors List . At the same time it has been nominated for the Independent Music Awards, in USA, as one of the top five songs in the Adult Contemporary Song category.
I am working on new original music and plan to release it as soon as the tracks are ready.

You tube link

Antarang Team has interviewed Nihira and here is the summary


1. What makes you smile the most?
     Latin music and a good salsa/bachata dance, a satisfying moment of creativity in music, a good walk.

2. What music makes you cry?
       Old memories at times, when I have expectations from wrong people. When I see honest people suffer.

3. What little thing makes you the most grateful to be alive? 
     To have a loving family, friends who would stretch their extents for me, to have the ability to express myself musically. 

4. On hard days, what motivates you to get up and start your day? 
     Sunrise and a cup of coffee. These two things can motivate me on any day.

5. How do you find strength when you are going through hardships?  
      A conversation with a loved one, music and dance. 

6.What family member do you call when you have good news to share?
My husband (if he is not around when I receive it) followed by my parents and in laws.

7. Who inspires you to live your best life?
Everyone around me who finds newer ways of making their lives happy, as well as others’.

8. When you have to confront someone do you choose to stand strong, or to not say anything at all?
Whatever yields the desired result. Depends upon the person.

9. What person made you believe in love?
My husband. He loves me and stands by me no matter what.

10. Do you believe in fate and that everything happens for a reason? 
Yes. Absolutely.

11. When you got your heartbroken for the first time, what got you through it?  
       My parents. They stood by me rock-solid.

12. What makes you most proud of yourself? 
       I do not leave the path I believe in.

13. When in a crisis, do you act calmly or do you automatically freak out?
If I am alone, I act calmly.If I am in the comfort zone of my family, I do take the liberty of panicking a little😊

14. What keeps you up at night?
If a melody is brewing in my mind.

15. If there was one charity you could donate to, which would you choose?
I would like to do something for upcoming independent artists, who are looking at following their path without bending to the market demands and success formulae. 

16. What is the one quality you need in a significant other?
Of being an empathic listener and not belittling or invalidating your feelings.

17. On your best days, who do you want standing next to you? 
       My family.

18. On your hardest days, who do you want standing next to you?
My family again.

19. What is the one word that perfectly explains who you are? 
      Romantic.

20. Where do you envision yourself in five years?
Basking in my favourite art forms, music and latin dancing, alongside my family and a few more loved friends.

21.What is your message to our Antarang women readers?
Be yourselves, make sure you find your joy in something other than your family and work. That will keep you young and fresh forever:)

माझे पक्षीगण, गाते मी त्यांचे गुण

पहाटेपासून ऐकू येतो, आर्त आर्जवी कोकीळस्वर,
जरा उजाडता, चिमुकल्या पर्पल रंप्ड सनबर्डचा नाजूक चिवचिवाट हमखास येतोच कानावर,
केबलच्या तारेवर किंवा एखाद्या डिश अँटेनावर बसून काळा-पांढरा मॅगपाय रॉबिन आळवतो मधुर धुन,
लाल बुडाचा आणि काळ्या तोंड-तुऱ्याचा करडा बुलबुल जणू म्हणतो, माझ्याही गोड गळ्याचे गा ना जरा गुण!
आपल्या तारस्वराने, निळ्या तपकिरी रंगकांतीने आणि लांबलचक चोचीने, किंगफिशर (खंड्या) लक्ष घेतो वेधून,
अन साधारण माकडासारखा हुप हुप आवाज घुमवणारा भारद्वाज, दर्शनही देतो अधून मधून,
चुक चुक आवाज करत, मधेच एखादी शीळमय लकेर गात, शेपटीचा पंखा फुलवत, नाचत राहतात नाचण,
इवलेसे असले तरी डोमकावळयासारख्या मोठाड, हिंस्त्र पक्षाला बिनधास्त देतात टशन!
कावळे आणि कबुतरांना तर मुंबई दिलेलीच आहे आंदण!
चिमण्यांची संख्या हळूहळू वाढत्येय, हे त्यातल्या त्यात बरं लक्षण!
काळ्या डोक्याचा हळद्या पक्षी दिसतो कधीतरी, अवचित,
पोवळ्याच्या रंगाची केशरट लाल चोच आणि रूज लावल्यागत गाल असलेला रेड चिक्ड फिंच भले दोनदाच पण अगदी जवळून बघता आणि टिपता आला, हे माझं पूर्वसंचित!
असाच धुमकेतूसारखा एकदाच उगवला, ससाणा प्रजातीतील शिकरा,
त्याची तीक्ष्ण, बाकदार चोच आणि भेदक मोठे डोळे पुरेसे होते  वाटण्यासाठी दरारा!
ज्या त्या केबलच्या तारेवर स्वतःचीच मक्तेदारी असल्यागत काळे कोतवाल (drongo) तिथेच जातीनं बसून देतात पहारा!
पोपट आणि उठावदार डोळ्यांच्या साळुंक्यांचा अधून मधून सुरूच असतो काहीसा कर्कश्श गोंगाट,
अन प्रजननासाठी चिंचेच्या झाडावर घरोबा करून बसलेल्या बगळ्यांचा, पिल्ले बाहेर येताच दुणावतो कलकलाट!
कर्कश्श आवाजात ओरडत, अथकपणे घारी घेतात घिरट्या गोल गोल,
क्वचित कुठे एखादी जरा विसावलीच, तर टपलेले कावळे तिला हुसकण्यासाठी लगेच करतात हल्लाबोल!
डोमकावळ्यांपुढे मात्र  ते शरणागती पत्करत, सुरक्षित अंतरावर बसून, अंग फुलवत जाहीर करतात जळफळाट,
त्यांनी कष्टाने साठवलेल्या घबाडावर आयतोबा डोमकावळे डल्ला मारताना पाहून त्यांचा होतो चडफडाट!
असे हे माझे 'सर्वपक्षीय' विवेचन आवडले वा नावडले तरी अभिप्राय नक्की द्या, पण बघायला लावू नका फार वाट!
आकांक्षा फडके

राहिले रे, दूर घर माझे.....!

घर !  एक पुण्याच, एक कल्याणच !  पुण्याला माझा जन्म झाला,  लग्नानंतर मी कल्याणला गेले. 

ज्याच्या नांवाने पुण्याची ओळख पटते त्या सदाशिव पेठेत माझ्या आजोबांनी १९३९ साली घर बांधले.  सदाशिव पेठेच्या वाडा संस्कृतीच्या मांदियाळीत आजोबांचे हे घर म्हणजेच दुमजली बंगला उठून दिसत असे.  घर जरी १९३९ साली बांधल तरी त्यात आजच्या जगातील सर्व सोयी-सुविधा होत्या.  पश्चिम महाराष्ट्रातील पुणे हे त्या काळातील मोठ शहर असल्यामुळे छोट्यामोठ्या कामांसाठी अनेक लोक पुण्यात येत असत.  त्यामुळे आमच्या घरीही पाहुण्यांचा राबता कायम असायचा.  आजोबा सिव्हिल सर्जन असल्यामुळे त्यांच्याकडे वैद्यकीय सल्ल्यासाठी अनेकजण येत असत.  या साऱ्याचा विचार करून आजोबांनी मोठ घर बांधल.  त्यांची तीन मुलं, एक मुलगी आणि स्वतःसाठी,  पाहुण्यांसाठी असे ते प्रशस्त घर होते.  कवडीच सुरेख डिझाईन केलेली एक मोठी गच्ची व एक छोटी गच्ची होती.  मोठा वऱ्हांडा होता.  पुढच्या गेटमधून आत आल्यावरही वऱ्हांडा होता.  वऱ्हांड्यात वर जाण्यासाठी जिना होता, हा खास पाहुण्यांसाठी !  त्याच्या बाजूला एक खोली होती तिथे सर्वजण चपला, बूट काढत असत म्हणून ती चप्पल खोली !  वऱ्हांड्यात आल्यावर उजव्या हॉलला प्रशस्त दिवाण व डाव्या हाताच्या खोलीत मोठा झोपाळा असल्याने ती झोपाळ्याची खोली !  मधल्या दारातून प्रशस्त व हवेशीर माजघरात प्रवेश होता. एका बाजूला जेवणाचे टेबल होते. डाव्या हाताला स्वयंपाकघर.  त्यामध्ये त्याकाळी आधुनिकतेची साक्ष देणारा उभ्याचा ओटा होता, त्याचबरोबर जुन्या काळाची आठवण देणारी ताक घुसळणी होती. कासंडीमध्ये मोठी रवी व तिला दोरी बांधलेली होती.  माझी काकू रोज एवढ मोठ ताक करायची ते बघताना अप्रूप वाटायचं.  माजघराच्या शेवटी उजव्या हाताला मोठी बाथरूम व जवळच्या दारातून मागच्या अंगणात जाता यायचं. तिथे आजोबांच्या गाडीसाठी गॅरेज होत. तसच घरगड्याची खोली व एक कोठीची खोली होती. त्याच्या शेजारी गोठा होता व त्यात आमची जर्सी गाय 'रूपी' होती. रोज जे ताक होत असे त्यातील लागणारं घरात ठेवून बाकीच आजूबाजूच्या कुटुंबांना दिले जात असे. अंगणात एक छोट गेट होत ते एका मोठ्या बागेत उघडत असे. बागेत अनेक तऱ्हेची फुलझाडे होती, माड होते. पण विविध प्रकारची गुलाबाची रोपं ही एक वेगळी खासियत होती. माझ्या मोठ्या काकूला गुलाबाच्या झाडांचा फार मोठा शौक होता आणि त्या काळात पुण्यात भरणाऱ्या गुलाबांच्या प्रदर्शनात तिला हमखास बक्षिस मिळत असे. 

माझे आजोबा पूर्ण थ्री-पीस सूटमध्ये दवाखान्यात जायचे.  येताना क्लबमध्ये १ तास ब्रिज खेळून यायचे. आमच्या माजघरात एक लंबकाच टोले देणार घड्याळ होतं. त्या घड्याळात ९ चा ठोका पडला कि आजोबांच्या गाडीच दार वाजायच. हा नियम कधीच चुकला नाही. सोवनी शिस्तीचे भोक्तेच ! आजोबा येण्याच्या आधी घरातील नातवंडे, सुना, घरातले नोकरचाकर यांचे जेवण झालेले असायचे, असा आजोबांचा दंडक होता ! आजोबां बरोबर आजी,  त्यांची तीन मुलं व आत्या जेवायला बसायचे. आजोबांचा असा एकप्रकारे दराराच होता. पण ते स्वतः जेवायच्या आधी घरातील सर्वांची जेवणे झालेली असावीत, हे त्यांच वागणं आजच्या काळात देखील पुढेच होत. 

आजीशी मात्र आमची गट्टी होती. आम्ही सर्वजण तिला नन्ना म्हणायचो. अत्यंत प्रेमळ, सुगरण.  सगळ्यांना जेऊ खाऊ घालायची हौस आणि सुनांच कौतुक करण हा तिचा विशेष होता. संध्याकाळी बाहेरच्या अंगणात सतरंजी टाकून आजी सर्व नातवंडांना गोष्टी सांगत असे. तिच्या त्या गोष्टी ऐकण हा आमचा आनंद होता ! आमची आजी उत्कृष्ट ब्रिज खेळायची. 

बाबा रुपारेलमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि आम्ही मुंबईस आलो. पण पुण्याच्या घराशी नाळ जोडलेलीच राहिली. दिवाळी, उन्हाळा अशा सुट्ट्यांमध्ये आम्ही पुण्याला जात राहिलो.  ऋणानुबंध कायमच राहिले. 

लग्नानंतर मी कल्याणला गेले. माहीमहून कल्याणला,  हे तस तर एक प्रकारच स्थित्यंतरचं होत. कल्याण जरी रेल्वेच जंक्शन होत, शिवाजीच्या काळापासून माहित असलेलं गाव होत, तरी परिस्थितीत फारच फरक होता. वारंवार वीज खंडीत होणं, डास, वाहतुकीसाठी टांगा अशा अनेक गोष्टी ! रेल्वेने जाण्यायेण्यात ३/४ तास हे ही ordeal च होत. पण ह्या गोष्टी दुर्लक्ष करून उमेद देणारं अस कल्याणच घर होत. छोटासा बंगला मागेपुढे अंगण. आमच्या घरात जरी नळ होते तरी पूर्वापार असलेली विहीर तशीच होती. हे घर स्वतंत्र होत. पुढ मागे अंगण, बाहेर बाग, उतरत छप्पर आणि घर ज्या गल्लीत होत त्याचा नंबर झीरो ! गम्मतच वाटायची मला.  त्याच्या अंगणात ३ आंब्याची झाड होती. दोन उंबर होते. शिवाय प्राजक्त, अनंत, कर्दळ, शंखासूर अशी अनेक झाड. मीही मग हौसेन तिथे निशिगंध, ग्लॅडी, पिवळी घंटी, जास्वंद यांची भर घालून माझी हौस पुरवून घेतली. आमच्या घरात एक बंब होता. वेगळाच होता. माझ्या सासूबाई पहाटे उठून त्यात बंबफोड घालून पेटवायच्या आणि मग बंब तापला कि त्याच्या बाजूच्या झडपेतून पाणी घालायच, ते लगेच खालून बाहेर यायच.  पण अस गरम कि बापरे ! युनिकच होता तो बंब ! त्याच घरात माझा संसार वाढला, फुलला.  माझी दोन्ही मुलं याच अंगणात क्रिकेट खेळत मोठी झाली. ते आणि त्यांचे मित्र खेळायचे आणि आमच्या बाहेरच्या खिडकीच्या काचा सतत फुटलेल्या असायच्या ! 

उन्हाळ्यात कैऱ्या काढायला माणूस यायचा. मुल आधीपासूनच दगड मारत असायची पण त्या रविवारी मुलांची खूप गर्दी गेटजवळ व्हायची. भरपूर कैर्‍या निघायच्या. मी तिथे असेपर्यंत देवासाठी फुल व कैर्‍या कधीच विकत आणल्या नाहीत. सगळ्यांना कैर्‍या वाटल्या जायच्या. सर्व मुलांना पण आणि आजूबाजूच्या घरातही ! 

माझ्या सासूबाई सुगरण होत्या. तऱ्हेतऱ्हेची लोणची, मुरांबे घालायच्या. एक अशी घडीची कॉट होती त्यावर वाळवणं घातली जायची. अंगणात कॉट टाकून साबुदाणा पापड्या, बटाट्याचा किस, गव्हाच्या चिकाच्या कुरडया सगळ ! त्या कुरडयांचा आंबूस मस्त वास घरभर दरवळायचा. 

पावसाळ्यात अंगणात पाणी जमायचं मग मुल त्यात होड्या सोडायची. घराच्या मागच्या दारात कडुलिंब होता आणि पिंपळही, त्यावर मधुमालतीचा वेलु गगनावरी गेला होता. पांढरट गुलाबी फुलांचे घोसच्या घोस लगडलेले अजून डोळ्यांसमोर येतात. 

पण कालाय तस्मै नमः! हळूहळू आजूबाजूची बैठी घर जाऊन उंच इमारती उभ्या राहिल्या. घरात अंधार येऊ लागला आणि घर विकण्याचा निर्णय झाला ! ह्या घरात मी २० वर्ष राहिले आनंदाने, समाधानाने. ह्याच घराच्या पायर्‍यांवर मुल माझी ऑफिसमधून येण्याची वाट बघत बसायची. आमच्या घरात ७४/७५ ला T.V. आला तेव्हा सबंध झीरो नं. मध्ये कोणाकडेच T.V. नव्हता. तब्बसुमच 'फूल खिले है गुलशन गुलशन' पहायला अख्खी गल्ली जमायची दर बुधवारी, आम्हांलाच जागा नसायची. पण मजा होती ! 

हे घर सोडून दुसरीकडे गेल्यालाही २० वर्ष होऊन गेली, पण अजूनही ते घर सारखं आठवत ! 

लग्नानंतर वीस वर्षांनी हा बंगला सोडून आम्ही ३ बेडरूमच्या फ्लॅट संस्कृतीत राहायला गेलो. आज पुण्याच व कल्याणच दोन्हीही घर नाहीत. पण माझ्या आयुष्याच्या उमेदीच्या काळात ह्या दोन्हीही घरांनी एक वेगळच समाधान मला दिलं, त्यांच्या आठवणी आजही माझ्या स्मृतीच्या दिवाणखान्यात ताज्या आहेत....

By

Medha Sule

            

नाच रे मोरा..



नाच रे मोरा..


- सुजाता महाजन


सकाळी सकाळी ‘विपाशा’ची कडकड सुरू झाली. ‘‘आई, बघ हं, पुन्हा सुरू झालं या मठचं. मठ कसला मठ्ठय्‌ तो. मी आता त्याच्या घरी जाऊन ‘भ’ पासूनच सुरू करते.’’

‘पद्मा’पण वैतागलीच होती. त्यांच्या पलीकडच्या बिल्डिंगमध्ये राहणारा ‘मठ’. रोज प्रचंड आवाजात गाणी लावायचा. आधी तर इथल्या विचित्र आर्किटेक्चरमुळे बरेच दिवस हा एवढा आवाज कुठून येतो हे शोधायला बराच वेळ लागला. दर वर्षी परीक्षेच्या दिवसात एका तरी घरी जाऊन दार ठोठवावं लागायचं. त्यासाठी आधी घर शोधण्याचा कार्यक्रम. मग अनोळखी घराचं दार ठोठावणं. अनपेक्षित चेहरा समोर आला, की बहुधा हिंदीत बोलावं लागायचं. ‘तुम्ही तुमच्यापुरतं काय ऐकायचं ते ऐका’. हे सारखं कुणाला तरी सांगावं लागायचं. मागच्या वर्षी एक जण होता, त्याने पहिल्यांदा सांगितलं तेव्हा मुद्दाम आवाज आणखी मोठा केला होता. विपाशा त्यानंतर पुन्हा पाच वेळा गेली त्याच्याकडे. मग कंटाळून त्याने आवाज कमी केला. यावर्षी हा मठ. मठ माहितीचा होता. कारण सोसायटीचा चेअरमनच होता, विपाशा रोज खिडकीतून ओरडून सांगायची, ‘‘मठकाका, आवाज बारीक करा.’’ पण तिथल्या गदारोळात त्याला काय आवाज ऐकू येणार.

गेले चार दिवस त्याने नवीन धोरण धरलं होतं, ते म्हंजे ‘नाच रे मोरा’ हे गाणं एकापाठोपाठ किमान बावीस वेळा लावायचं. आज चौथ्या दिवशी ऐंशीव्यांदा ते गाणं ऐकून झाल्यावर विपाशाचा संयम सुटला. ‘‘आई, आता मला हे सहन होत नाही. आधी तर इकॉनॉमिक्सवर कॉन्सन्ट्रेट करणं अवघड त्यात या मोरापासनं सुटका होईना. चल, आपण त्याला जाऊन सांगू या.’’ पद्माला भांडणांचा कंटाळा. ती म्हणाली, ‘‘जाऊ दे ग, अजून फक्त आठ वेळा ऐकायचंय. आठ त्रिक चोवीस मि. काढ कशीतरी. तोवर आंघोळीला जा बरं. मग संध्याकाळी जाऊ वाटलं तर त्याच्याकडे.’’

विपाशाला अशावेळी आईचा राग येतो. नेहमी भांडणांना घाबरून पडतं घ्यायचं ! कशासाठी? त्यांच्यावरती केंकरे राहतात. श्रीमंत आहेत. त्यांच्या फ्लॅटएवढं केंकरेंचं टेरेस आहे. त्या टेरेसमध्ये भरपूर कुंड्या ठेवून त्यांनी सुंदर वातावरण निर्माण केलंय. सुविधेसाठी टेरेसमध्ये त्यांनी एक बेसीन बसवलं. भांडीवाल्या बाईला भांडी घासण्यासाठी छोटीशी मोरी केली. त्यानंतर त्याच्याखाली असलेल्या विपाशाच्या बाथरूममध्ये भिंतीला ओल येऊन फोडांनी भरल्यासारखी भिंत दिसायला लागली. एका वॉटरप्रूफिंगवाल्याला आणलं. वरच्या टेरेसवरून झुल्याने उतरून क्रॅक्स भरावे लागतील असं म्हटल्यावर केंकरेबाईंची कचकच सुरू झाली ‘‘म्हंजे, माझ्या कुंड्या हलवाव्या लागतील.’’

पद्माने सांगून पाहिलं, ‘‘अहो, एकच दिवस आम्ही हलवू, पुन्हा नीट ठेवू.’’

‘‘नाही, नाही, फुटल्या म्हंजे’’

विपाशा हे पाहिल्यावर खूप चिडली. ‘‘अगं आई, त्यांच्या कुंड्या एक दिवस खाली ठेवल्याने कुणी मरत नाही. इथे या बाथरूममध्ये इन्फेक्शन होऊन आपण मरू. त्यांचं चुकीचंच आहे. वर टेरेस त्यांनी केलंय. आपली काय चूक. त्यांच्या मोरीमुळे इथं ओल आलीय. आपल्याजागी दुसरं कुणी असतं तर वाजवून पैसे घेतले असते. खर्च आपण करतोय. कोऑपरेट तरी करा कमीतकमी. तू काय मुळमुळीत समजावत बसते त्यांना.’’

दुपारी पद्मा आणि विपाशाला जेवायला बोलावलं होतं शेजारच्या ‘मंदाकिनी’कडे. मंदाकिनीच्या मुलाची मुंज होती. मुंजीला अजून अवकाश होता. पुन्हा मुंज त्यांच्या गावी होती. इथल्या कुणाला तिथं येणं शक्य नाही म्हणून तिने ‘ग्रहमक’ ठेवलं होतं आणि जवळच्या काही लोकांना जेवायला बोलावलं होतं. पद्मा तिच्या जवळच्यांपैकी होती.

पद्माची आणि तिची जेव्हा ओळख झाली तेव्हा पद्माचा भोळा चेहरा तिच्या लक्षात आला. तिने पद्माला सांगायला सुरुवात केली. ‘‘मी न खोटे दागिने तयार करते. फार छान दिसतात आणि अगदी स्वस्त. हल्ली सोन्याचे दागिने म्हंजे टेन्शनच असतं ना...’’

पद्माला कुणी स्त्री स्वतः मिळवण्यासाठी धडपड करतेय म्हटल्यावर फार आदर वाटायचा आणि ती काही करून त्या स्त्रीला मदत करायला धडपडायची. ती दागिने अजिबात घालत नव्हती. तरी तिने मंदाकिनीकडनं ते घेतले, नुस्ते घेतले नाही तर घातले सुद्धा. मंदाची, तिच्या दागिन्यांची, तिच्या कष्टांची माऊथ पब्लिसिटीपण केली.

पुढचं एक वर्ष मग –

‘‘पद्मा, अग मी नवीन कानातले केलेत खूप छान दिसतायत. बघ ना एकदा येऊन.’’..

‘‘पद्मा, अग मी ते हे केलंय, पोळ्या ओल्या होऊ नये त्यांच्याखाली डब्यात ठेवायचं कुशन.’’

‘‘पद्मा, आता मी शिवणकाम शिकतेय. तुला काही टाकायचं असलं तर टाक माझ्याकडे.’’

‘‘पद्मा, मी आता झेरॉक्स मशीन आणलंय. तुझं काही काम असलं तर टाक.’’

‘‘माझा नवरा मोबाईलवरचं व्हिडिओ शूटिंग सीडीवर करून देतो. तुला हवं असलं तर बघ करून.’’

हे सगळं सगळं पद्माने केलं. मंदाकिनीने केलेले दागिने एका वापरात तुटले, झेरॉक्स करताना तिने काही पानं हरवली, तिने केलेल्या बॅगेचा पट्टा तुटला, तिने शिवलेल्या कपड्यांचे शेप फारच वाईट होते म्हणून टाकून द्यावे लागले... अशा सगळ्या गोष्टी होत राहिल्या. एवढंच काय, तिच्या नव-याने तयार केलेली सीडी घरी आणून लावल्यावर काहीही त्यावर आलेलं नाही कळलं.

विपाशा चिडचिडून जायची ‘‘आई, अग तू तिला का मदत करायला धडपडतेस. चांगली भांड तिच्याशी एकदा. सगळे पैसे वाया गेलेत.’’

पण पद्मा सोसत राहिली, काही बोलली नाही.

आज त्यांना जेवायला बोलावलं होतं. मुंजीची पत्रिका घरी आली त्यावर निगेटिव्ह भाषेत लिहिलं होतं, ‘‘कुठल्याही प्रकारचा आहेर स्वीकारला जाणार नाही.’’

तरी पद्माने पाकीट बरोबर घेतलं होतं. ती जेवायला गेली तेव्हा शेवटची पंगत चालू होती. मंदाच्या घरातले सगळे, तिच्यासह बसले होते. पद्माला पाहून ती जागची हलली पण नाही. तिने तिला आतल्या खोलीत बसायला सांगितलं. जेवणाची पंगत ओलांडून पद्मा आणि विपाशा आतल्या खोलीत गेल्या. इथून सगळ्यांच्या जेवणा-या पाठी दिसत होत्या.

त्या खोलीत एक १ वर्षाची मुलगी आणि एक विपाशाएवढी मोठी मुलगी होती. मोठी मुलगी त्या बाळाला सांभाळत होती. म्हंजे काय करत होती तर रंगीत मणी खाली घरंगळून एका डबीत पडतात असं एक खेळणं होतं. ते मणी पाडून ती डबीतनं गोळा करायची पुन्हा वरून सोडायची. छोटी मुलगी त्या पुनरावृत्तीला फार कंटाळली होती. तिने आवाज काढला की मोठी मुलगी ‘‘हे बघ काय’’ म्हणायची. छोट्या मुलीबरोबर पद्मा आणि विपाशाही उत्सुकतेने पहायच्या की आता ही काय नवीन दाखवणार. तर ती तेच मणी पुन्हा नव्याने घरंगळवायला सुरुवात करायची.

विपाशा संतापून त्या मुलीकडे पाहत होती. तशी ती मंदावर चिडलेलीच होती. शेवटी, तिचा चेहरा पाहून पद्मा बाहेर आली आणि मंदाला म्हणाली, ‘‘मंदा, मी परत येते अग, हिचे बाबा यायचेत घरी. किल्ली माझ्याजवळ आहे.’’

‘‘अग थांब ना, आत्ता संपेल ही पंगत.’’

‘‘नको, मी परत येते.’’

‘‘बरं, मग नक्की येणार का?’’

‘‘नक्की येते.’’

‘‘नाही तं म्हटलं थांब थोडं’’

पद्माला आता तिथून कधी जाऊ असं व्हायला लागलं. सगळी माणसं जेवून झाल्यावर दोघींनीच त्या हॉलमध्ये जेवायला बसायचं, काय उपयोग?

पद्मा आणि विपाशा खाली आल्या तेव्हा तिच्या नव-याची गाडी येतच होती. विपाशा म्हणाली, ‘‘आता पुन्हा जाऊ नको बरं का?’’

‘‘अग, ती जाताना काय म्हणाली तू ऐकलं नाहीस, असं चांगलं नसतं न जेवता जाणं. उगीच तिला वाटायचं आपण अपशकुन केला. ती म्हणेल तसं सारखं.’’

‘‘तुला असं वाटतंय का की, तू पुन्हा यायलाच पाहिजे असं तिला तीव्रतेने वाटतंय?’’

‘‘नाही. तरीपण...’’

‘‘मग जा तू. मी नाही येणार. माणसं तुझं किती शोषण करतात तुला कळत पण नाही. एक वाक्य फेकलं की झकत तू येणार. नाही आलीस तरी तिचाच चष्मा वर. काय हे!’’

संध्याकाळी ‘त्या’ एका वाक्याच्या भीतीनं पद्मा गेली. मंदाने तिला स्वयंपाकघरात बसवलं. पुरणाची पोळी गरम केली आणि नुसती पोळी एका ताटात वाढून दिली. एकीकडे बडबड, ‘‘त्या इथेच एक बाई आहेत, त्यांच्याकडनं सगळा स्वैपाक मी करून घेतला म्हंजे ऑर्डरच दिली. पण टेन्शन होतंच पुरतं की नाही. पण सगळं पुरलं व्यवस्थित. म्हंजे मी पोळ्या जास्त करून घेतल्या होत्या ऐनवेळेस एखादं माणूस वाढतं न ग. अग, तुला पोळीबरोबर काहीच नाही. अंऽ काय देऊ बरं. ही भाजी घेतेस का?’’

एका खाऊच्या वाटीत थोडीशी बटाट्याची भाजी होती. पद्माची एक पोळी खाऊन संपल्यावर ‘‘बघ, ना थोडासा नमुना,’’ म्हणत तिने त्या बटाट्याच्या भाजीतली अर्धी तिला वाढली.

पद्माने पोळी संपवलीच होती. भाजी खाऊन टाकली. मंदाचा नवराही घरात होता. सकाळी मण्यांना कंटाळलेली मुलगीपण होती. पद्माला पाहिल्यावर तिने ओळखीचे हात उंचावले. तेवढंच एक स्वाभाविक, माणसासारखं घडलं.

पोळी खाताना पद्माने चौकशी केली, ‘‘अग तुम्ही जर्मनीला गेला होता ना तिथे तुम्ही काय काय पाहिलं? माझा नवरा जाणारे, तर त्याला सांगीन.’’

मंदाला उत्साहाचं भरतं आलं. तिने सगळं सांगितलं. नव-याला बोलावून सांगायला लावलं. तिच्या मनातला अपराधभाव जाण्यासाठी पद्माने ते केलं होतं आणि तो गेला. दोघेही एकदम रिलॅक्स झाले.

पद्माने बरोबर आणलेलं पाकीट तिच्या मुलाच्या हातात दिलं. मंदा खोटं खोटं रागावून म्हणाली, ‘‘काय हे, आहेर काही द्यायचा नाही सांगितलं होतं ना,’’

पद्मा हसून म्हणाली, ‘‘अग, हे बाळाला, तुला थोडीच’’

घरी आल्यावर विपाशा चिडवायला लागली ‘‘आई शंभर रु. ची एक पुरणपोळी खाऊन आली.’’

थोड्या वेळाने ‘नाच रे मोरा’ सुरू झालं.

पद्माच्या मनात मंदाकिनीची वागणूक सलत होती. ती एकदम चिडून म्हणाली, ‘‘चल जाऊ मठाकडे.’’

दोघी पलीकडच्या बिल्डिंगपाशी आल्या. लिफ्ट चालू होईना म्हणून जिन्याकडे वळल्या. वळता वळता विपाशाचं लक्ष कशाकडे तरी गेलं. ती पुन्हा लिफ्टपाशी आली, लिफ्टच्या शेजारी त्या विंगमधल्या रहिवाशांसाठी सूचना लिहिलेल्या होत्या.

घरातून निघताना नळ बंद आहे की नाही ते तपासणे.

लिफ्टचे दार उघडे ठेऊ नये.

लिफ्टमध्ये घाण करू नये.

आपल्या घरातील रेडिओ, टेप, टी.व्ही.च्या आवाजाचा दुस-याला त्रास होऊ देऊ नये.

या सर्व सूचना पेंट केलेल्या होत्या. विपाशा थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिली.

दोघी वर गेल्या. दार वाजवलं. मठिणीने दार उघडलं. ‘या’ म्हणाली.

‘‘आम्ही अहो, आवाज कमी करा सांगायला आलोय. विपाशाची परीक्षा आहे ना.’’ आवाजातला अपराधभाव पद्माला झाकता येत नव्हता.

बाई म्हणाली ‘‘हेच फार मोठ्यांनी लावतात. तुम्हीच सांगा.’’

मठ संडासाच्या दारापाशी आतल्या चड्डीवर उभा होता. बायकोने त्याला टॉवेल नेऊन दिल्यावर तो बाहेर आला. चेह-यावर चंदन किंवा कसलासा पूर्ण लेप होता.

पद्माकडे पाहून म्हणाला, ‘‘काय?’’

‘‘नाही, ते आवाज कमी करा सांगायला आलोय. विपाशाची परीक्षा आहे ना.’’

‘‘कधीय परीक्षा?’’

‘‘चालूच आहे.’’ थोडं थांबून विचारपूर्वक पद्मा बोलली, ‘‘परीक्षा असो, नसो. आवाजाचा नेहमीच त्रास होतो. तुम्हाला मोठ्याने लावायचं तर या साईडच्या खिडक्या बंद करत जा. घरात काही सुचत नाही अक्षरक्षः आणि ते नाचे रे मोरा तुम्ही पाठोपाठ का लावता?’’

मठीण पुन्हा म्हणाली, ‘‘हेच, हेच लावतात.’’

विपाशाला तिने बाहेर थांबवलं होतं पण ती ऐकत होती. बाहेर आल्यावर खुश होऊन ती म्हणाली, ‘‘आई, आज तू माणसासारखं वागलीस. तुझ्या संतासारख्या वागण्याचा फार त्रास होतो बघ.’’

पद्माला याचं समाधान वाटत नाही. माणसाला शहाणपण का येत नाही? हा तिचा कळीचा प्रश्न. अपेक्षा, हट्ट, दुखावणं, भांडण, चिडचिड, कटकट हे सगळ घडतं ते का?

पद्मा थकून विपाशाला म्हणाली, ‘‘कुणाकुणाशी कशाकशासाठी भांडशील तू? रिक्षावाले स्टॅन्डपाशी उभे असले, बरोबर म्हातारं, थकलेलं माणूस असलं तरी त्यांना ज्या दिशेला यायचं नाही तिकडे येत नाहीत; त्यांच्याशी भांडायचं; सिग्नल मोडून आपल्याला रिस्क निर्माण करणा-यांशी भांडायचं; एक्सापयरी डेट झालेल्या वस्तू विकण्याबद्दल दुकानदाराशी भांडायचं, लहान मुलामुलात भांडण झाली तरी, आपल्या मुलाला ‘‘तू त्याच्या डोक्यात एक दगड का घातला नाहीस पुढचं मी पाहून घेतलं असतं’’, असं म्हणणा-यांशी भांडायचं. मला भांडण नकोयत ग. आपलं आपण शहाणं का होत नाहीये माणूस हा प्रश्न आहे.’’

तिला थोड्या वेळापूर्वीचा एक साधासा प्रसंग आठवला. रोज संध्याकाळी ती कॉलनीत थोडंसं चालते वीस मि. तरी. आज तिच्याबरोबर नवरापण होता. तोही कुणावर तरी चिडलेल्या मनःस्थितीतच होता. रस्त्यात पटकन्‌ दिसणार नाही अशा जागी एक कुत्रं बसलं होतं. पद्माला रोजच ते तिथं बसतं हे माहीत होतं. बाजूने चालणं तिला जमून गेलं होतं. नव-याचा त्याच्यावर पाय पडता पडता राहिला, त्याने एक शिवी हासडून कुत्र्याला तिथून हाकललं. दोघं पुढे गेले. येताना दुरूनच दिसलं कुत्रं पुन्हा त्या जागी येऊन बसलंय. ‘‘च्यायला’’ म्हणत नव-याने पुन्हा त्याला हाकललं. दोघं त्या एन्डपर्यंत चालत गेले. वळले. कुत्रं पुन्हा तिथं. नवरा आणखी चिडला. जास्त रागाने हाकललं. वळताना पाहिलं कुत्रं पुन्हा जागेवर.

नवरा चिडचिडून म्हणाला, ‘‘किती बेअक्कल आहे ग हे. आपण किती वेळा हाकललं तरी पुन्हा त्याच जागेवर येऊन बसतंय. अनुभवजन्य ज्ञान काही नाही.’’

आणि माणसाला? अनुभवजन्य ज्ञानाचा अॅक्सेस आहे; तरी तो त्याचं काय करतो? त्या ज्ञानाची व्यवस्था कशी लावतो? बावीस वेळा ‘नाच रे मोरा’ ऐकताना त्याच्या आत काहीच उरत नाही. सगळ्या बारीक सारीक अनुभवांच्या तुकड्यातनं स्फुरणारं शहाणपण उमलण्याची प्रक्रिया सुरूच होत नाहीये किंवा सगळे विसरून गेलेत ती. मग उरतं काय? नुसते ध्वनी. नाच रे मोरा, नाच रे मोरा.


OLDEST SACRED TEXTS VEDAS

 OLDEST SACRED TEXTS VEDAS

In Hinduism vedas are very important. The Vedas are among the oldest sacred texts. The Sanskrit term veda as a common noun means "knowledge". It is said that vedas are “apauruṣeya,”; meaning, not of a man or impersonal and also not belonging to a particular author.

When sages are in deep meditation state(Samadhi avastha) they hear these sholka or knowledge from universe. These sages composed hymns and verses of vedas and transferred this knowledge to their disciple who then handed down through generations by word of mouth. . Vedas are also called śruti ("what is heard") literature,

Initialy vedas were vast collection of hymns and verses. Maharshi Vyasa devided these veda in to 4 parts
  • Rigveda .
  • Yajurveda
  • Samveda
  • Atharvaveda

Each Veda has been sub classified into four major text types

1.Samhitas (mantras and benedictions).

2. Aranyakas (text on rituals, ceremonies such as newborn baby's rites of passage, coming of age, marriages, retirement and cremation, sacrifices and symbolic sacrifices),

3.Brahmanas (commentaries on rituals, ceremonies and sacrifices)

4. Upanishads (text discussing meditation, philosophy and spiritual knowledge).

Maharshi vyas gave education of of these 4 vedas to his 4 disciples

1.Rigved to rishi Pail

2. Yajurveda to rishi Vaishampayan

3. Samved to rishi Jaimini

4. Atharvaved to rishi sumantu.

Further these Vedas handed down through generations by word of mouth

Each veda is devided in to number of branches ex.


Several shakhas ("branches") of Rig Veda are known to have existed in the past. Of these, Śākala Shākha is the only one to have survived in its entirety.

In yajurveda there are mainly 2 branches
1. Krishna Yjurveda
2. Shukla Yajurveda

Vedanga

. The Vedangas were sciences that focused on helping understand and interpret the Vedas that had been composed many centuries earlier.

The six subjects of Vedanga are
  1. Śikṣā….phonetics .
  2.  Chandas…..poetic meter
  3.  Vyākaraṇa…grammar
  4.  Nirukta…etymology and linguistics
  5. Kalpa…rituals and rites of passage
  6. Jyotiṣa..time keeping and astronomy
Upaveda
The term upaveda ("applied knowledge") is used in traditional literature to designate the subjects of certain technical work . Lists of what subjects are included in this class differ among sources. The Charanavyuha mentions four Upavedas:
  • Archery (Dhanurveda), associated with the Yajurveda
  • Architecture (Sthapatyaveda), associated with the RigVeda.
  • Music and sacred dance (Gāndharvaveda), associated with the Samaveda
  • Medicine (Āyurveda), associated with the Atharvaveda.
Vedant

Last part of Veda is called vedant. The word Vedanta literally means the end of the Vedas and originally referred to the Upanishads . each Veda has different upanishada.

Vedanta reflects ideas that emerged from the speculations and philosophies contained in the Upanishads. Vedant contains many subtraditions like dualism, non-dualism etc.

Vedanta philosophy acknowledges the Prasthanatrayi as its three authoritative primary sources. The texts comprising the Prasthanatrayi are the

  • Upanishads,
  • The Bhagavad gita
  • The Brahma Sutra.

All these ancient sacred text are ocean of knowledge, which guide us how to live our life meaningfully. We should try to experience some drops from this vast ocean of knowledge

ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै। तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै।।

(कठोपनिषद -कृष्ण यजुर्वेद)

Shilpa Pandit -Nasik

Wednesday 29 April 2020

डोळे

डोळे हा मनाचा आरसा आहे.
मनातले सर्व डोळ्यांतच दिसते.
काय काय दिसते डोळ्यांतॽ वाचू या.
डोळ्यांत भाव आहे, डोळ्यांत हाव आहे।
डोळ्यांत घाव आहे, डोळ्यांत धाव आहे।
डोळ्यांत साज आहे, डोळ्यांत बाज आहे।
डोळ्यांत लाज आहे, डोळ्यांत माज आहे।
डोळ्यांत आग आहे, डोळ्यांत राग आहे।
डोळ्यांत जाग आहे, डोळ्यांत बाग आहे।
डोळ्यांत क्रौर्य आहे, डोळ्यांत शौर्य आहे।
डोळ्यांत धैर्य आहे, डोळ्यांत वैर आहे।
वेदना डोळ्यांत आहे, करुणा डोळ्यांत आहे।
वासना डोळ्यांत आहे, तृष्णा डोळ्यांत आहे।
ममता डोळ्यांत आहे, नम्रता डोळ्यांत आहे।
गूढता डोळ्यांत आहे, भक्त्ती डोळ्यांत आहे।
लबाडी डोळ्यांत आहे, खोडी डोळ्यांत आहे।
प्रौढी डोळ्यांत आहे, गोडी डोळ्यांत आहे।
भावभावना साऱ्या या कळण्याची दृष्टी हवी।
दिसणारे जे जे सारे समजण्याची सृष्टी नवी।
डोळ्यांत रुप आहे, दिठीत स्वरुप आहे।
डोळ्यांत सौंदर्य आहे, दिठीत पावित्र्य आहे।
डोळे दिले देवाने, संतांनी दिली दृष्टी।
उतराई व्हावे कसेॽ ऋणातच रहावे असे।
ऋणातच रहावे असे.

सौ. शितल शशीकांत जोशी.

डोंबिवली.

क्षण पारिजात

प्रत्येक क्षण पारिजात!
पारिजात हळुवार टिपावा तसा, पारिजात हळुवार जपावा असा!

पारिजात जसा नकळत बोटांवर आपला ठसा उमटवतो तसा प्रत्येक क्षण, 
तुझ्या सहवासातला प्रत्येक क्षण मनाला हळुवारपणे स्पर्शून जाणारा, 
मनावर नकळतच तुझी मोहोर उमटवणारा!

तुझ्यासाठी एक तास म्हणजे एक दिवस, 
पण तुझ्या सहवासातला माझा प्रत्येक क्षण म्हणजे एक नवीन फुलणारा, 
मला उलगडणारा दिवस!

प्रत्येक क्षण नाजूक, मोहरून, भुरळ टाकणारा, 
क्षणात ताजा, क्षणात कोमेजणारा...
पारिजातसारखा, हळुवार टिपावा तसा, हळुवार जपावा असा!

By

K. Vrishali

पाळीव प्राणी

आपल्याला जी गोष्ट आवडत नाही तीच नेमकी आपल्या पुढ्यात येते.  मग घरच्यांसाठी चालवून घ्यावी लागते मनात नसलं तरी.  काय करणार! तडजोड करण्याचा स्वभाव असल्यावर दुसरं काय होणार! 😛😜😝

मला कधीच पाळीव प्राणी, पक्षी आवडलेच नाहीत.  पण कधीच आवडले नाही म्हणत वर्ष दीड वर्ष लव्ह बर्डस आणि स्पिन्झ पाळून झाले.  त्यांच्या घरट्यांसाठी म्हणून मडकी बांधा, त्यांच्यासाठी राळ्यांबरोबर कॅल्शियमचे क्यूब्ज खायला ठेवा.  स्वच्छ पाणी पिण्यासाठी ठेवा.  पिंजरे साफ करा.  सगळं केलं. कोणासाठी? तर परिधी आणि तिचे अनिल आबा यांच्यासाठी.  नाव परीचं.  हौस माझ्याच बुवाची.   कामं करायला मी आहेच.  आधी 6च पक्षी होते.  बघता बघता प्रजा वाढू लागली. किलकिलाट वाढला तसा शिकारा, कावळे यांच्या घिरट्या सुरू झाल्या.  सर्पमहाराज पण येऊ लागले.  पक्षी होते त्या दोन अडीच वर्षात जवळ जवळ 8-10 सर्पांना  सर्पमित्र येऊन पकडून घेऊन गेले.  

शेवटी ह्यांना म्हणाले अहो हे काही मला पटत नाहीये हो.  शेवटी बुवाने सगळे पक्षी देऊन टाकले.  मी हुश्श झाले.  आता काहीही हौस नकोय हे बजावलं.  नाही म्हणून वदवून घेतलं. पण कसचं काय! काही दिवसांनी एक भटकं मांजर येऊ लागलं. 

"ए त्याला वाटीभर दुध आण" मला सकाळच ऑर्डर सुरू झाली.  न देऊन करते काय! पण एक बरं होतं की मांजर काही रहात नव्हतं.  घेणेकरी असल्यासारखं रोज येतं दुध प्यायलं की थोडं रेंगाळून निघून जातं.  हे पण गेले सहा सात महिने सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी एक गंमतच झाली.  एक काळं कुळकुळीत कुत्र्याचं पिलू गेटच्या बाहेर उभं राहून आत बघत होतं.  मला आम्ही रत्नागिरीला रहात असताना अनाहुत आलेल्या मुधोळ हाऊंड कुत्र्याची आठवण आली.  ज्याला मी नंतर थिबा म्हणू लागले होते. तर तसंच हे पिलूही बघत होतं.  

ह्यांना फक्त सांगितलं हं पिलू आलंय तर बुवा अगदी लहान मुलगा होऊन त्या पिलाला  "ए तू कशाला आलाय इकडे? भुकू लागलीय का तुला?" म्हणू लागले.  पिलू पण शेपटी हलवून ऊं ऊं आवाज करू लागलं.  झालं.  गेट उघडून पिलाला घरात घेतलं.  

 ठेवणीतल्या 'प्रेमळ' आवाजात मला ऑर्डर.  " पोळी घेऊन ये" आणली बिचारीनी पोळी.  बुवाने अगदी प्रेमाने पिलाला भरवली.  झालं.  पिलू बागेत बागडू लागलं. मधे मधे गायब होत होतं मांजरासारखंच. 

पण आज अजून एक गंमत झाली.  दोन्ही घेणेकरी एकाच वेळी हजर.  मांजर पण आणि कुत्र्याचं पिलू. दोघांचं प्रेमाने आदरातिथ्य करून झालं.  पण आता दोघं जायचं नाव काही घेत नाहीत.  उलट हे आवार आपलंच आहे अशी दोघांची समजूत झालीय आणि दोघं एकमेकांवर गुरगुरून ते सिद्धही करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. 

आणि ह्या न आवडणा-या गोष्टी आता मला आवडून घ्याव्या लागणार आहेत.  बुवाच्या आवडीपुढे माझा आवाज बंदच ठेवावा लागणार.  न ठेवून सांगते कुणाला?

By

Anagha Joshi