Monday 29 June 2020

डॉक्टर्स आणि नैतिक अनैतिकतेच्या पुसट रेषा

ही गोष्ट आहे एक स्त्रीरोगतज्ज्ञ आणि एका पेशंटची म्हणजे खरंतर पेशंटच्या नवऱ्याची.भारतीय समाजात अजूनही स्त्रीबद्दलचे सगळे निर्णय तिचा नवराच घेतो हेच वास्तव आहे.

या स्त्रीरोगतज्ज्ञ एका शहराच्या थोड्या बाहेरच्या भागात प्रॅक्टिस करत होत्या.एक दिवस टिपिकल राजकारणी दिसणारा एक माणूस त्याच्या बायकोला घेऊन आला त्यांच्याकडे. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती आणि आता परत तिसऱ्यांदा दिवस गेले होते.डॉक्टरांनी तपासलं तर साडेचार महिने झाले होते. नवरा म्हणाला "मी इथं जवळच्याच गावात ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी आहे.आम्हाला नकोय हे मूल ,गर्भपात करायला आलो आहे"
स्त्रीरोगतज्ज्ञ गर्भलिंगनिदान कायदा आल्यापासून तीन महिन्याच्या वरचा गर्भपात करायला साहजिकच खूप कचरतात.तीन महिन्यानंतर बाळ बऱ्यापैकी तयार झालेले असते त्यामुळे ही असा गर्भपात करणे नको वाटते काही डॉक्टरांना.आणि न जाणो हे लोक बाहेरून गर्भलिंगनिदान करून आले असतील तर आपल्यावर खोटा आळ यायचा.माणूस राजकारणी दिसल्यामुळे डॉक्टर अजूनच सावध होते.पापभिरू माणूस कायद्याला कायमच घाबरून असतो.त्यामुळे डॉक्टरांनी गर्भपात करता येणार नाही आणि प्रेग्नन्सी चालू ठेवून डिलिव्हरी झाली की ऑपरेशन करा असा सल्ला दिला .पेशंटचा नवरा खूप वेळ "गर्भपात कराच म्हणून आग्रह करत राहिला पण माझ्या तत्वात हे बसत नाही म्हणून डॉक्टरांनी साफ नकार दिलाच.

यानंतर मध्ये पंधरा वर्षं गेली.एक दिवस हाच माणूस दुसऱ्या एक पेशंटला घेऊन डॉक्टरांकडे आला.आधी ओळखलेच नाही डॉक्टरांनी पण मग त्यानेच ओळख दिली .म्हणाला "मॅडम तुम्ही गर्भपात करायला नकार दिलात,भलतीच पंचाईत झाली माझी.अहो मी लोकप्रतिनिधी आहे गावात.सरकारी नियमानुसार दोनच्या वर मुलं झाली असती तर पद गेलं असतं माझं.विरोधकांना तेच तर हवं असतं गावात..मग शेवटी बायकोला माहेरी पाठवून दिली.पूर्ण दिवस भरून डिलिव्हरी झाली आणि मग ते मूल मी सरळ अनाथाश्रमात देऊन टाकलं!पण मॅडम तिकडे आश्रमात खर्च मात्र आपण करतो बरंका सगळा.

हे ऐकून मात्र डॉक्टरांच्याच पायातले अवसान गळाले!!

" अहो तुम्ही पोटच्या गोळ्याला असं बेवारश्यासारखं अनाथाश्रमात कसं सोडू शकलात?त्या जीवाचा काय दोष होता???"डॉक्टर खरंच कळवळल्या..

"अहो मॅडम अशी पदे सहजासहजी मिळत नसतात, राजकारणात त्याग हे करावेच लागतात..चलतो मी.."
तो माणूस गेला निघून पण डॉक्टरांच्या मनात विचारांचं काहूर उठवूनच..

असं काही होईल हे माहीत असतं तर गर्भपात केला असता तर जास्त बरं झालं नसतं का?त्या जीवाचा काय दोष होता?आईवडील ,भावंड असूनही एक अनाथाचं जिणं नशिबी आलं त्याच्या..आणि मग त्याने दुसरीकडे जाऊन गर्भपात का नाही करून घेतला?की त्याला मुलगी झाली आणि ती नको होती म्हणून देऊन टाकली??आणि ज्या माऊलीचं बाळ काढून या अधमाने अनाथाश्रमात देऊन टाकलं तिची मानसिक अवस्था काय झाली असेल?कशी सहन केली असेल तिनं ही घुसमट?आपलं अजून एक भावंड अनाथाश्रमात आहे याची सर्व सुखसमृद्धीत असलेल्या मुलांना कल्पनाही नाहीये,कधी कळलं तर??

मग चुकले का मी?करायला पाहिजे होता गर्भपात?

हे निर्णय इतके सोपे असतात?

तुम्हाला काय वाटतं??


(डॉ पद्मजा जोशी यांचे आभार!!)
(पूर्णपणे सत्यघटना)


डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ
कोथरूड
पुणे

हिमालयातील पंच पंच पवित्र स्थाने.

भारताच्या उत्तर सीमेवर काश्मीर पासून अरुणाचलपर्यंत २५००∕३००० कि.मी. लांब व ३० ते १५० कि.मी. रुंद असा उंचच उंच उत्तुंग पर्वत पसरलेला आहे. तोच आपला हिमालय होय. भारतीय त्यांना देवभूमी ∕शिवभूमी समजतात. यामध्ये उत्तुंग शिखरे आहेत तशा महाकाय नद्या आहेत व मोठी मोठी ग्लेशियरही आहेत.

अशा देवभूमीमध्ये अनेक मंदीरे व इतर ठिकाणेही अशी आहेत, की आपण ती पवित्र मानतो. त्यातील काही पंच पंच ठिकाणांची आपण माहिती घेऊ.

आता तुम्ही वरील लेखाचे नाव पाहून संभ्रमात पडला असाल की ही पंच पंच काय भानगड आहे. तर सर्वसाधारण हिमालयातील हिल स्टेशन्स सर्वांना माहीत असतात. आंतर हिमालयातील छोटी छोटी गावे अज्ञात असतात. त्यांची थोडीफार ओळख करुन द्यायचा मी प्रयत्न करणार आहे.


1) पंच कैलास – कैलास मानस सरोवर, आदिकैलास, मणी महेश, श्री खंड कैलास, किन्नौर कैलास.


2) पंच केदार – केदारनाथ, मध्यमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर.


3) पंच बद्री – बद्रीनाथ, भविष्य बद्री, योगध्यान बद्री, वृद्ध बद्री, आदिबद्री.


4) पंच प्रयाग – देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग, विष्णुप्रयाग.

हिमालयात मोठमोठ्या नद्या आहेत व त्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो अशी ठिकाणेही पवित्र मानली जातात. त्यांना प्रयाग म्हणतात. वरील पाच प्रमुख प्रयाग आहेत.

मला सांगायला अतिशय आनंद होतो की ईश्वरकृपेने माझे वरील सर्व पंच पंच ठिकाणांचे दर्शन झाले आहे.

या लेखामध्ये मी पंच कैलासांची ओळख करुन देणार आहे. या सर्व कैलासांचे लांबूनच दर्शन घ्यावे लागते.


1) कैलास मानस सरोवर – पवित्र तीर्थक्षेत्र कैलास मानस. येथील अद्भुतरम्य, विस्मयकारक, खडतर, साहसी यात्रा मी भारत सरकारतर्फे २००२ साली यशस्वीरित्या पूर्ण केली. ही खडतर यात्रा सहज करता येण्यासारखी नाही. त्यासाठी लागते तन्दुरुस्त आरोग्य आणि भोलेनाथाचा बुलावा.

हे ठिकाण तिबेटमध्ये चीनच्या हद्दीत आहे. याचा उल्लेख वेदकाळापासून असून रामायण, महाभारतातही आहे. कैलास पर्वत ६६९० मीटर उंचीवर असून त्याचा आकार साक्षात पिंडीसारखा आहे व तो पवित्र असल्यामुळे त्याच्यावर चढाई केली जात नाही. कैलास परिक्रमा ५२ कि. मी. असून ती तीन दिवसात पूर्ण करतात. पायी किंवा घोड्यावरुन परिक्रमा करताना ‘डोल्मापास’ म्हणून पार्वतीचे ठिकाण आहे. उंची १९५०० फूट. इथे पूजा करतात. इथे खाली गौरीकुंड आहे. कैलास पर्वताची अंतरपरिक्रमा पण केली जाते. पण ती अतिशय अवघड आहे.

याच कैलासाच्या पायथ्याशी ४५५० मीटर उंचीवर मानस सरोवर आहे. याचीही परिक्रमा केली जाते. पूर्वी ही परिक्रमा पायी करावयाचे. पण आता ती बसमधून केली जाते. हे ३२० चौ. कि. पसरले असून याचे पाणी गोड आहे. चमचमणारे, नितांत सुंदर, स्फटीकाप्रमाणे स्वच्छ व अतिशय थंड आहे. येथे यक्ष, किन्नर, गंधर्व स्नान करण्यास येतात अशी मान्यता आहे. याच्या जवळच राक्षसताल म्हणून दुसरे सरोवर आहे. ते जरा खालच्या बाजूला आहे त्यामुळे मानस सरोवराचे पाणी येथे वाहून येते. परंतु हे सरोवर पवित्र मानले जात नाही.

कैलास मानस सरोवरासाठी तिबेटमधून ल्हासा येथून, सिक्कीम येथून नथुला पास मार्गे, उत्तराखंडातील लिपूलेख खिंडीतून (भारतीय सरकार, परदेश विभाग) जाता येते.

पंच कैलास पैकी अत्यंत पवित्र मानलेले हे ठिकाण नितांत सुंदर तर आहेच पण मनःशान्ती देणारेही आहे. आपण येथे निसर्गाच्या भव्य दिव्य स्वरुपाशी तादात्म्य पावतो.

जून ते सप्टेंबर या कालावधीतच येथे जाता येते.



2) आदि कैलास – पंच कैलासपैकी हे दुसरे ठिकाण असून पिथोरागड जिल्ह्यात (उत्तरखंड) येते. या ठिकाणी जाण्याचा मार्ग व कैलास मानसला लिपूलेख खिंडीपर्यंत जाण्याचा मार्ग एकच आहे. आपण घारचुला या ठिकाणाहून निघून गाला, बुधी, माल्या, गुंजी कुट्टी, जॉलीकॉंग अशी ७० कि. मी. पदयात्रा करत आदि कैलासला पोहोचतो. गुंजीवरून दुसरा रस्ता कालापानी, नाबिंडांग, ॐ पर्वताला पोहोचतो.

हा रस्ता म्हणजे चारी बाजूला अगदी जवळून वेढणारे हिरवेगार डोंगर, खळाळत वाहणारी भयंकर ‘काली’ नदी. त्या उंचचउंच पर्वतांच्या दूरवर पसरलेल्या रांगा, हे निसर्गाचे रूप पाहून आपण म्हणजे किती छोटे अगदी मुंगीगत वाटतो. या उंचीकडे पाहतांना असे वाटते की माणसाने मनची उंचीही वाढविली पाहिजे. हे निसर्गापासून शिकायचे. गप्प, शांत राहून हे रुप न्याहाळावेसे वाटते. कमाल वाटते या भव्य दिव्य निसर्गाची आणि मानवाची सुद्धा. कारण या कठीणतम निसर्गापर्यंत पोहोचायला आपल्या बुद्धीचे कौशल्य पणाला लावून किती रस्ते, किती सोयी केल्या आहेत आणि अजूनही करीत आहेच. नाबिडांगला समोरच्या पर्वतावर बर्फाचा ॐ चा आकार दिसतो. हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे. सर्व डोंगरांच्या मध्ये ॐ या आकारात बर्फ दिसते. याचे दर्शन होणे निसर्गावर, तेथील वातावरणावर अवलंबून असते. कारण हा बरेच वेळा धुक्याने झाकलेला असतो. पण हाही निसर्गाचा चमत्कार पहायला मिळाला. एकीकडे सूर्य उगवत होता, त्याच्या प्रकाशात सर्व डोंगरावर सोने लखलखल्याचा भास होता, तर दुसऱ्या बाजूने चंद्रमा आपले अस्तित्व दाखवत होता. स्वर्ग स्वर्ग याच्यापेक्षा काही वेगळा असू शकतो काॽ किती तरी वेळ स्तब्ध होऊन निसर्गाचा अविष्कार पहात होतो. हे कधी संपूच नये असे वाटत होते.


3) मणि महेश – मणि महेश हे पंच कैलासचे ठिकाण हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात येते. या ठिकाणी मात्र २ वेळा जाण्याचा योग आला. ऑगस्ट २००७ व जुलै २००८ मध्ये. याची उंची १३५०० फूट आहे. इथेही गौरीकुंड आहे. येथे जाण्यासाठी मुंबई-चक्कीबॅक रेल्वेने प्रवास करावा लागतो. पुढे भारमोर-हडसरपर्यंत जीपने जाता येते. या गावापासून २ दिवसांची ही यात्रा आहे. अंतर २० कि.मी. आहे. सर्वसामान्यपणे गौरीकुंडात स्नान करून पूजापाठ करतात. रात्री मुक्काम करतात. समोर दिसणाऱ्या पर्वतावर एके ठिकाणी नैसर्गिकरित्या खाच आहे. तेथे १२ महिने बर्फ असतो. सकाळी सूर्य उगवल्यावर या खाचेतील बर्फावर सूर्यप्रकाश पडतो व तो मण्याप्रमाणे चमकतो. हे दृश्य अत्यंत मनोहारी दिसते. म्हणूनच या पर्वताला ‘मणि महेश’ म्हणतात. तसेच रात्रीच्या वेळी सुद्धा चंद्रप्रकाशात बर्फ चमकतांना सुंदर दिसते.

मणि महेशचा रस्ता म्हणजे खडा चढ आहे. मध्ये सपाट जागा अजिबात नाही. परंतु या संपूर्ण मार्गात नयनरम्य धबधबे, पुष्पदऱ्या आहेत. ते पाहून आनंद मिळतो. जी मनःशान्ती मिळते ती अवर्णनीयच आहे. ‘मणि-महेश’च्या दर्शनाने सर्व शीण निघून जातो आणि आपण नविन ऊर्जा घेऊन परत येतो. ‘मणि-महेश’च्या पुढे घर बांधले (म्हणजे एकावर एक दगड रचून ठेवायचे) म्हणजे आपली घर बांधायची इच्छा पुरी होते अशी एक भावना आहे. आम्ही अशी रचलेल्या दगडांची खूप घरे पाहिली तेथे.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत ही यात्रा केली जाते.


4) श्री खंड कैलास – हा कैलासही हिमाचल प्रदेशात असून १८५०० फूट उंचीवर आहे. हिमाचलमधील रामपूर या मोठ्या गावातून ‘ज्यांव’ या गावासाठी १५ कि.मी. बस∕जीपने जाऊन तेथून पायी जावे लागते. श्याचडू, भीमबाग, पार्वती बाग, नयन सरोवर, श्री खंड कैलास असा ३५ कि. मी. चा हा मार्ग आहे. या मार्गात प्रचंड ग्लेशियर आहेत. चढाई, उतराई करत बारीक दगड गोटे, मोठे खडक आहेत. हा मार्ग अतिशय कठीण आहे. खडतर आहे. त्यामुळे येथे बहुतांशी स्थानिक लोकच जातात.

येथे राहण्याची सोय नाही. हे ठिकाण कायम बर्फाच्छादित असते. एक ७५ फूट उंच शिला असून त्याला श्री खंड कैलास म्हणतात. त्या शिळेला मधोमध मोठी चीर आहे त्यामुळे त्या शिळेचे दोन भाग दिसतात म्हणून त्याला श्री खंड कैलास असे म्हणतात.

वरील पाच दिवसांचा ट्रेक अतिशय खडतर आहे. त्यामुळे तो आम्हाला झेपणार नाही म्हणून आम्ही श्री खंड कैलासचे दर्शन सरहान गावातून (सिमल्यापासून अंदाजे ७५- ८० कि. मी.) घेतले. साधारण एरिअल अंतर ३५-४० कि.मी. दूर ढगात लपलेल्या श्री खंड कैलासचे दर्शन ऑगस्ट २००७ मध्ये नाही झाले. म्हणून २०१० च्या मार्चमध्ये आम्ही परत सरहानला गेलो व अक्षरशः दिवसभर त्याने प्रसन्न होऊन आम्हाला दर्शन दिले. गुरुपौर्णिमेच्या वेळी याची यात्रा असते.

5) किन्नौर कैलास – उंची ६०५० मीटर. हा पाचवा कैलास पण हिमाचल प्रदेशात असून याची यात्रा पण ७-८ दिवसांत करता येते. ७९ फूट उंच अशी शिला असून मार्ग अतिशय कठीण आहे. या कैलासाला परिक्रमा करायची असल्यास सिमला-सरहान-पौबारी हा बस प्रवास करून नंतर पूर्वनी-रिब्बा-थांगी-लंबर-चरंग-चिटकूल या गावांतून पर्वताच्या सर्व बाजूंनी परिक्रमा करतात. एकूण ७५ कि.मी. पायी यात्रा करावी लागते. ही यात्रा अतिशय अवघड असून विशेष सुविधा कीट घेऊन टेंट, जेवणखाण्याची व्यवस्था, पोर्टर, गाईड घेऊनच करावी लागते. तंदुरुस्त शरीर प्रकृती व धैर्य असणारेच लोक ही यात्रा करतात.

किन्नौर कैलास चे दूरवरुन दर्शन ‘कल्पा’ या गावातून होते. (एरियल अंतर ४०-५०कि.मी.) आम्ही दुरुनच या कैलासाचे दर्शन घेतले. ऑगस्ट २००७, मार्च २०१० असे दोन वेळा दर्शन घ्यायचा योग आला.

कैलास मानस यात्रेत २००२ साली पंचकैलास यात्रा करावयाची इच्छा मार्च २०१० साली सफल संपूर्ण झाली.

॥ॐ नमः शिवाय॥

Meenal Velankar


Friday 26 June 2020

I just called to say I love you

This heart-melting ballad written, produced and performed by the world-famous singer Stevie Wonder, was one of the first few English songs, that I listened to. It must be the year 1983-84. I was a newly married gauche girl in my twenties who lacked the flair for English music. It was my husband, who introduced me to English songs for the first time. We both would spend our Sundays listening to country classics. Sometime during this period he also introduced me to  Stevie Wonder. 


Later on, this song became very close to my heart in more ways than one. But  I shall tell you about that later. First, let me give you a glimpse into my childhood. 


When I was little, there was this strange practice in our house. Our parents or elders in the house would never kiss or hug us kids. It was just not done. Neither would they tell us, how much they loved us. I remember, once day,  I came home from school early and saw my mum standing at the kitchen platform, making some preparations for dinner. Out of some crazy impulse I threw my arms around her. I may be around fourteen at that time. She just shooed me away, admonishing me for being too “filmy”!  I don’t think, she was behaving any differently than the mothers of her generation. 


Telling your loved ones, that you loved them had not yet become commonplace. Parents would selflessly devote their entire lives for the well being of their children, moms would make countless sacrifices, would leave jobs after childbirth and would stay home to take care of their children. I remember, my dad didn’t think twice before foregoing his promotion for me and my brother, because it involved getting transferred to another much smaller city. He did that, just because he didn’t want our education to suffer. My parents never mentioned to us the sacrifices they had made in their careers to give us a near-perfect childhood.  But at the same time, they never told us, how much they loved us either. Parents of that generation were never vocal about their love. 


Similarly, I too never had the guts to tell my parents, how much I loved them, lest they consider me too “filmy”! Today this has become my biggest regret in life. I have understood one thing. Love is the most spectacular, indescribable, deep euphoric feeling, profoundly tender affection for another person. But what’s the point, if that person never knows, how strong these feelings are, unless you tell them. And we most certainly need to tell our loved ones, how we feel. We must make them understand, how important they are in our life. 


In her last illness, my mom went into a coma. When I was sitting with her near her hospital bed, I remembered the song by Stevie Wonder. I JUST CALLED TO SAY, I LOVE YOU. I kissed my mom on her forehead for the first time in my life. I gave her a hug. I have no idea if she heard me, but I told her through my tears, how much I loved her. 


I think, we must tell our people, that we love them.


: Mrs Leena Sohoni

आजीच्या कॉफीतली वडी

हातात पाकीट घेऊन ‘सावित्री’ ‘शिमा’ कंपनीच्या ऑफिससमोर उभी होती, ‘शिमा’ च्या पाटीकडे पाहात. ‘शिमा’ म्हणजे ‘शिरीष’ आणि ‘माधुरी’. शिरीष सावित्रीच्या वाड्यात राहणारा. बालमित्र नाही म्हणता येणार कारण तिच्यापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठा होता पण बालओळखीचा. फारशा गप्पा नसायच्या त्यांच्या. त्याची फॅमिली तशी आब राखून राहणा-यातली होती. वाड्यातले बाकी सगळे कनिष्ठ मध्यमवर्गीय. वेड्यावाकड्या, कशाही बांधलेल्या, जुनाट, अंधा-या खोल्यांच्या त्या वाड्यात शिरीषचं घर मात्र व्यवस्थित रंग दिलेलं, फर्निचर असणारं, पुढच्या बाजूला असल्यामुळे नीट उजेड असलेलं होतं. सावित्री त्यांच्या घरी एक-दोनदाच गेली असेल. पण तिथलं फर्निचर – पुस्तकांचं कपाट, टेबलखुर्ची, पेनस्टँड, डाय-या, पंचिंग, स्टेपलर, डिंक, कागद अशी सगळी स्टेशनरी नीट ठेवलेली, स्वयंपाकघरात सुबक मांडणीत भांडी नीट लावलेली, डायनिंग टेबल, ती सगळं थक्क होऊन बघतच राहिली होती. वास्तविक सावित्रीच्या घरचे त्या वाड्याचे मालक होते. पण त्यांच्या जगण्यात कुठलाही नीटनेटकेपणा नव्हता. कुठल्या खोल्या आपल्याकडे ठेवायच्या, कुठल्या भाडेकरूंना द्यायच्या याविषयी कुठलंही व्यावसायिक गणित नव्हतं. आणि भाडं तरी किती, दहा – दहा, वीस – वीस रू. शिरीषची आई सावित्रीच्या आजीला भाडं द्यायला यायची. सुंदर साडी, सुरेखसा अंबाडा, त्यावर गजरा अशी. आजीनं मांडलेल्या पाटावर नाजूकपणे बसायची. आजी स्टोव्हला पंप मारत त्यावर आदल्या दिवशीचं वरण उकळत बसलेली असायची. वरणासारखा पदार्थ दररोज उकळून उकळून आठ दिवससुद्धा वापरायला तिला काऽही वाटायचं नाही. वरण उतरवून ती शिरीषच्या आईसाठी कॉफी ठेवायची. पाण्यात भरपूर साखर आणि कॉफीच्या वड्या टाकायच्या. त्या वड्या सुट्या होऊन त्यांचे कण एकमेकांपासून सुटे सुटे होईपर्यंत बघत राहायला सावित्रीला फार आवडायचं. सगळे कण विखुरले की घरभर कॉफीचा वास सुटायचा. आजी मग त्यात दोन-तीन चमचे दूध टाकायची. ती काळसर कॉफी गाळून शिरीषच्या आईला द्यायची. कॉफी घेता घेता शिरीषच्या आई, आजी एवढ्या चार मजली वाड्याची देखभाल कशी करते, या वयात किती वेळा जिने चढउतार करते, आजोबांच्या पूजेसाठी किती तयारी करते या सगळ्या गोष्टींचं कौतुक करायची. आजोबांच्या पूजेची वेळ म्हणजे वरणाला स्टोव्हच्या तोंडी द्यायची वेळ. वरण बारीक वातीच्या स्टोव्हवर ठेवून आजी खाली पूजेच्या तयारीला निघून जायची ती देवपूजेची भांडी घासून, देवघरातली फरशी पुसून, पूजेसाठी पाणी, नैवेद्य, दूध वगैरे ठेवून तासाभराने वर यायची. तोवर वरण उकळत पडलेलं असायचं. कधी कधी तर ती अशी दूध पण ठेवून जायची. दोन – तीन लिटर दूध तापायला वेळ लागायचाच पण वर आलं तरी सत्राजण जिन्यावरनं ये – जा करणारे येता - जाताना पाहायचे आणि खुशाल आत जाऊन वर येणारे दूध उतरवून फुंकर मारून स्टोव्ह विझवून टाकायचे. असं झालेलं आजीच्या लक्षात पण यायचं नाही. ती समजायची, आपणच दूध उतरवलं. अशी आजी असूनही शिरीषच्या आई कौतुक करायच्या. हे सगळं सावित्रीच्या लहानपणचं. शिक्षणासाठी आठदहा वर्षं इकडे तिकडे राहून सावित्री गावी परतली तेव्हा तिने शिरीषला ओळखलंच नाही. अर्ध्या चड्डीतल्या शिरीषला आता मिश्या होत्या. ‘‘अरे बापरे, किती मोठा झाला.’’ ‘तू’ म्हणताना तिची जीभ अडखळली. तिने तो शब्द गिळून टाकला. त्यानंतर तिला शिरीषशी कधीच एकेरी बोलता आलं नाही. तो बालओळखीचासुद्धा वाटेना. मात्र तरुण सावित्री शिरीषच्या नजरेत भरली. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तेही तिच्या आजीकडे. आजी फारच खूष झाली. कारण शिरीषचं घर म्हणजे त्यांना आदर्श! शिरीषचं घरचं सगळं चांगलंच होतं. शिरीषने घरबांधणी व्यवसायाला नुकतीच सुरुवात केली होती. ‘पैसे मिळवील नक्की’ हे त्याला पहिल्यांदा भेटणारासुद्धा सांगू शकला असता इतका तो व्यावसायिक वृत्तीचा होता. पण सावित्री नाही म्हणाली. तिचं अरूशी तोवर ठरलंही होतं. झालं! शिरीषचं माधुरीशी लग्न झालं. त्याच्या कंपनीचं नाव ‘शिमा’ झालं. शिरीष आणि सावित्री आपापल्या संसारात सुखी झाले. अधूनमधून शिरीषची भेट व्हायची. अतोनात औपचारिक भेटी सावित्रीला असह्य व्हायच्या. पण तिच्या दृष्टीने तो तिला मागणी घालणारा पुरुष असल्याने आता त्याच्याशी औपचारिक संबंध असणेच इष्ट होते. आज तिच्या काकांनी त्यांचं एक पाकीट शिरीषला द्यायला सांगितलं होतं. तेही ती त्याच भागात जाणार होती म्हणून. तिच्या नव-याला ते फारसं आवडलं नाही पण काकांसमोर आपण काही बोललो तर वाईट दिसेल म्हणून तो गप्प बसला. सावित्रीने शिरीषच्या ऑफिसात प्रवेश केला. तिच्याकडे प्रश्नार्थक चेह-याने पाहणा-या रिसेप्शनिस्टपाशी जाऊन आपलं नाव सांगितलं. शिरीषला भेटायचं असल्याचं सांगितलं. रिसेप्शनिस्ट आत जाऊन सांगून आली. सावित्रीला आत जायची खूण केली. केबिनचं दार ढकलून ती आत गेली. समोरच्या खुर्चीत शिरीष बसला होता. समोर त्याची सेक्रेटरी डिक्टेशन घेत होती. ‘‘ये ये’’ शिरीष म्हणाला. सावित्री समोरच्या खुर्चीत बसली. ‘‘मी जरा हे पत्र पूर्ण करतो हं’’ ‘‘हो हो’’ त्याने वाक्यरचनेला सुरुवात करताक्षणीच त्याला सावित्रीचा अडथळा जाणवला. मग तो म्हणाला, ‘‘जाऊ दे. माझं हे खूप वेळ चालेल. आपण नंतर लिहूया ग.’’ मग सावित्रीला, ‘‘हं, काय म्हणतेस?’’ ‘‘काही नाही. हे काकांचं पाकीट द्यायचं होतं.’’ ‘‘बरं बरं’’ एकाएकी त्याने विचारलं, ‘‘ए, पम्या कुठेय ग सध्या?’’ सावित्री दचकली. पम्या तिचा सख्खा धाकटा भाऊ. आजीच्या लाडामुळे बिघडलेला. लहान वयातच व्यसनं लागलेला. शिरीषला खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं, पम्या कुठेय न कसाय, सावित्रीपेक्षाही जास्त कारण पम्या शिरीषच्या जवळच होता राहायला, सावित्रीपेक्षाही. मग शिरीषने हे का विचारावं? नकार देणा-या सावित्रीला खिंडीत गाठण्याची रणनीती होती का ही? ‘‘पम्या ना? इथेच आहे की’’ स्वतःला सावरत सावित्री म्हणाली. ‘‘बराय का?’’ ‘‘हो’’. अजूनही शिरीषचं समाधान होत नव्हतं. सावित्रीचा पडलेला चेहरा आणखी पडायला हवा होता. ‘‘नाही म्हणजे, चालूच आहे का?’’ हाताने अंगठा तोंडाकडे नेण्याची खूण. ‘‘ते काय बंद होणार?’’ सावित्री संयमाने म्हणाली. ‘‘ते मधे काय, कसलं औषध चालू केलं होतं त्याचा काही नाही ना उपयोग झाला?’’ अतोनात औपचारिकतेत ही कसली मिलावट. हवं तेव्हा औपचारिक, हवं तेव्हा औपचारिक, हवं तेव्हा अनौपचारिक. शिरीषने ना आजीबद्दल काही विचारलं ना जुन्या वाड्याबद्दल. ‘‘तेव्हा कसे ना आपण…’’ असं काही म्हणून ना तो उत्तेजित झाला, ना तो सूचक काहीतरी बोलून ‘जाऊ दे’ म्हणत न बोलताच खूप काही बोलला, ना त्याने तिच्या नव-याबद्दल, मुलांबद्दल विचारलं. ना त्याने स्वतःच्या बायकोमुलांबद्दल सांगितलं. औपचारिकतेतून अनौपचारिकता, अनौपचारिकतेतून जिव्हारी लागणारे प्रश्न असा काहीच प्रवास न करता त्याने एकदम तिस-या टप्प्यावर उडी मारली. कारण, आतापर्यंत जरी वीस-पंचवीस वाक्यंच बोलला असेल तो सावित्रीशी. पण त्याने तिला पुरतं ओळखलं होतं. कुणाशी कधी मान वर करून न बोलणा-या सावित्रीची प्रतिकारशक्ती पम्याने केव्हाच संपवली आहे हे काहीही प्रत्यक्ष न बघताही त्याला ठाऊक होतं. जुन्या नात्याने हे विचारण्याचा आपला अधिकारच आहे, आणि आपल्या विचारण्याचा हेतू वाईट नव्हता असं भासवण्यासाठी त्याने त्याच्या टायपिस्टची साक्ष काढली. ‘‘ऐकलंस का तू सुमे, त्या औषधांचा काही नाही उपयोग होत.’’ मग आपणच खुपसलेला खंजीर बाहेर काढून पुसत ‘काहीच जखम झाली नाही. तुला नाही मारलं, हिला हिला’ असं भासवत तो सावित्रीला म्हणाला, ‘‘अगं, हिची पण बहीण आहे ना अशीच. काही उपयोग नाही औषधांचा.’’ त्याने सुमीवर पण कुठला तरी जुना सूड उगवला. सावित्रीने तिचे शांत डोळे उचलून त्याच्याकडे पाहिलं. ‘चलते’ म्हणत टेबलावरची पर्स उचलली. काकाने दिलेलं पाकीट तिथंच पडू दिलं. …. नळावर पाणी भरताना तिच्याकडे बघून कुत्सितपणे हसत विचारणा-या बायका, ‘‘काय गं, बरीय का पम्याची तब्येत?’’ कॉलेजात फॉर्मवर प्रिन्सिपॉलची सही घ्यायला गेलं की, ‘‘काय म्हणतोय भाऊ, बराय का?’’ बँकेत – ‘‘बराय का भाऊ?’’ भाजी मंडईत – ‘‘बराय का?’’ घराच्या उंब-याजवळ, ‘‘बघ गं बाई, काही लागलं तर सांग.’’ असा कसा हा समाज? तिला कधीच कळलं नाही. पम्याचे प्रश्न काय होते हे जाणून घेण्यासाठी कधीच कुणी पुढे आलं नाही. रोज अनेक कुत्सित चेहरे सावित्रीची पराभूत पाठ पाहात हसत बसले. तिच्याबरोबर कुणीच आलं नाही. आणि आता शिरीषसुद्धा? शिरीषच्या केबिनचा दरवाजा उघडताना सावित्रीला वाटलं आपण आजीच्या कॉफीतली वडी आहोत, एकेक कण सुटा होत विखुरणारी !


सुजाता महाजन 


अवगुण न धरिये उर।

 

अवगुण उर धरिये नही, जो हो वृक्ष बबूल। गुण लीजे तुलसी कहे, नही छाया मे शूल॥

बबूल का वृक्ष कॉंटो भरा है सभी जानते है। किसी कामका नहीहै, धुत्कारते भी है। पर जब कडी धूपमे कहीं कोई वृक्ष या छॉंव नही दिखती तो उसी वृक्षके छॉंवमे खडे होते है। सुकून पाते है। तब वह क्या अपने कॉंटे के साथ चुभोता हैॽ नहीं ना। वह तो अपनी अवहेलना, धुत्कार सब भूलकर छॉंवही देता है। इसी तरह हे मानव तू भी किसीके अवगुण को मत देख! उसके जो शितलता देनेवाले, प्रसन्नता करनेवाले गुण है उन्हींको देख और उन्हे ही अपना! इससे स्वयं का विकास तो होगा ही, पर जो अवगुणी या दुष्ट है उसे अपने किये पर, आचरण पर शर्म महसूस होगी व वह भी अपनी भूलोंका, दुर्गुणोंका पश्चात्ताप करेगा। 

जब आम्रवृक्ष आमसे भरा होता है तो अक्सर उसपर पत्थर मारे जाते है। उसपर वृक्ष अपने फलही पत्थर मारनेवालेको देता है, न की पत्थर। जिसके पास जो होता है, वही तो वह देगा। हमे जो लेना है वो हम ले। जो हमारे कामकी चीज नही है उसे व्यर्थही क्यो लेनाॽ जब हम किसीकी दी गाली गलोच लेंगे ही नही तो हमारा क्या नुकसान होगाॽ जबतक हम लेते नही तबतक तो वह देनेवालेकी पास रहती है। यही सोच हमे अपने जीवनमे उतारनी है। ‘परिग्रह’से परे, संयमी जीवन सुखपूर्वक व्यतीत करना है।

जिसकी जैसी सोच है, उसे वैसेही जग दिखता है और तरीके से देखना, नजरसे देखना उसे आता नही है। तो वह दुसरोंका (औरोंका) विचार कैसे करेॽ

अतः हमे तो अवश्य ही यह सोचना होगा कि मुझे अगर इसतरह का व्यवहार पसंद नही है, तो सामनवालेको कैसे पसंद होताॽ मै किसी बात पर बुरा मानता हूँ तो हमारे करनेसे दुसरा कैसे बुरा नही मानेगाॽ जो चीज मै अपने लिएँ पसंद नही करता, अच्छी नही मानता वह औरोंके लिए कैसी अच्छी होॽ यह अपनोको दुसरेकी जगह रखकर देखनेकी आदत हमारी सोच, सुदृढ करनेका उत्तम उपाय है। हरबार नही तो बीच बीचमे अजमाना चाहिए।

औरोंके दुर्गुण ढूँढनेसे बेहतर है स्वयंमे ढूँढे। दुसरेमे ढूँढनाहै तो उनके गुण ढूँढना और जरुर अपनाना। अपने अवगुण कोई बताता है तो उसपर चिन्तर, विचार कर अपनेमे सुधार लाये। क्योंकी वाहवाही करनेवाले तो बहुत मिलते है। पर सच्चे मित्र तो वही है जो अपने मित्र को सर्वगुण संपन्न देखना चाहते है। इसी सोचसे हमे अपने दर्शाए दोषोंको देखकर उनमे सुधारकर अपने आपको सर्वयोग्य बनाना है और संयमसे जीवन गुजारना है। 

धन्यवाद!

 

निर्मला देविदास जैन. 


हे बंध रेशमाचे

Android Kunjappa Version 5.25 आणि Her ही आहेत दोन नावं.सिनेमा हे माध्यम आहे व्यक्त होण्याचं.एकाची भाषा आहे मल्याळम् तर  दुसऱ्याची इंग्रजी.मांडणी, वातावरण, संस्कृती हे वेगळं असणं मग स्वाभाविकच.असं असलं तरी या दोन्ही चित्रपटांतून मानवी भावभावनांची आंदोलनं उलगडली आहेत.

Android Kunjappa..मध्ये वाढत्या वयाबरोबर हटवादी झालेला, आपलं तेच खरं, योग्य असं मानणारा बाप भास्करन् .इथे आपल्या गुणवत्तेची कदर होत नाही अन् ज्याच्यासाठी आपण दूरची नोकरी घेत नाही त्या बापाला आपली किंमत नाही यात घुसमटलेला सुब्रमण्यम्.शेवटी नाईलाजाने रशियाला नोकरीसाठी निघून जातो खरा. पण मनात वडिलांची काळजी दाटलेली  राहतेच.काही महिन्यांनी वडील पडल्याची बातमी येते.अस्वस्थ  झालेला सुब्रमण्यम्,त्याच्याच कंपनीने तयार केलेला ह्यमनाॅईड रोबो घेऊन घरी येतो.त्याला,म्हणजेच रोबो कुंजप्पाला सर्व प्रकारच्या सूचना देऊन परत जातो.
 
इथून सुरू होतो नात्याचा एक वेगळा प्रवास.भास्करन् आणि कुंजप्पा मधली नोकझोक बघताबघता बट्टीत बदलते.कुंजप्पाशी गप्पा मारायला आलेल्या गावातल्या आज्या त्याला ,' कुंजा, तुझ्या देशात नंगू-पुंगू फिरलं तर चालतं.इथे नाही हो हे चालणार.लोक हसतील ना तुला'.हे ऐकल्यावर भास्करन् आपल्या टेलरकडून त्याच्यासाठी कपडे शिवतो.आता लुंगी घातलेल्या कुंजप्पाचे बोट धरून भास्करन्  त्याला घेऊन गावभर ऐटीत फिरु लागतो. फिरता फिरता  त्याच्या हाताचा,असण्याचा आधार त्याने स्वत:साठी कधी स्वीकारला हे त्याचे त्यालाच उलगडत नाही.त्याच्या गहिऱ्या झालेल्या नात्याची जाणीवच होते यातून.या दोघांचं प्रेमानं, विश्र्वासानं बांधलेलं वेगळं जग तयार होतं.भास्करन् मुलाची घ्यावी तशी कुंजप्पाची काळजी घेतो.पावसात त्याला थंडी वाजेल म्हणून जपतो.देवळात त्याला प्रवेश नाकारल्यावर वाद घालतो.तर कुंजप्पा भास्करन् ला नदीवर डोकं चोळून आंघोळ घालतो, प्रेमात कसली आलीय जातपात.प्रेम हे त्यापलीकडचं एक सुंदर विश्व असतं ,हे झक्कासपणे सांगतो.मग भास्करन् कुंजप्पाच्या मदतीनं आपल्या प्रेयसीचा शोध घेतो.तिला मेसेजेस करतो.कुंजप्पामुळे भास्करन् चं जगणं अर्थपूर्ण होतं.कुंजप्पा हे एक यंत्र आहे हेच तो विसरतो.म्हणूनच सुब्रमण्यम त्याला नेणार म्हटल्यावर बिथरतो.इतका की कुंजप्पाला घेऊन जंगलात पळून जाण्याचा, मुलापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो.
 
आता Her मघला थीडर.
 
ज्यांना आपल्या प्रियजनांना संदेश द्यायचाय,प्रेमभरी पत्र पाठवायची आहेत ; पण एकतर वेळ नाही किंवा लिहीता येत नाही, त्यांच्यासाठी  ऑनलाईन लेखनिकाचं काम करणारी न्यूयॉर्कमधली एक कंपनी. थीडर इथला एक लेखक.भन्नाट भावगर्भ पत्र लिहिण्यात प्रवीण.स्वत:च्या  आयुष्यात अपयशी पण पत्रलेखनातून इतरांची आयुष्य सावरणारा.त्याचं वैवाहिक जीवन संवाद हरवल्यानं घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोचलेलं.दिवसा काम अन् रात्री गेम्स आणि अनोळखी लोकांशी चॅटिंग करताना त्याला Artificial intelligence operating system (A I ) चा शोध लागतो.मग थीडर घेऊनच  टाकतो हे डिव्हाईस.थीडरची A I आहे समंथा.ती त्याला आवडणाऱ्या गोष्टी त्याच्याशी बोलू लागते.ऑफिसच्या कामांची वेळोवेळी आठवण करून देते.इतकंच नाही तर त्याने लिहिलेल्या उत्तम पत्रांचं पुस्तकही छापायला देते. कुणीतरी आपल्याला हवंहवंसं असं बोलतंय,ह्या कल्पनेनंच थीडर सुखावतो.मनानं हल्लक होत जातो.तो ज्या ज्या मानवी भावना तिच्याशी शेअर करतो समंथा त्या सगळ्याच अनुभवते जणू. एका क्षणी दोघंही प्रेमातच पडतात एकमेकांच्या.माणूस आणि A I  यातलं अंतरच नाहीसं होतं. थीडरबरोबर आभासी प्रणय करणं,स्वत:ला शारीरिक अनुभूती मिळावी म्हणून सरोगसी शरीराचा वापर करायला थीडरला विनवणं ही या आगळ्यावेगळ्या प्रेमाची परिसीमाच.

एका क्षणी समंथाचा आवाज थीडरला ऐकू येईनासा होतो.सैरभैर झालेला थीडर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर वेड्यासारखा तिला शोधत फिरतो.कासाविस झालेल्या त्याच्या कानावर समंथाचा आवाज पडतोय..हुश्श !!  पण क्षणिकच..ती एकाच वेळी आपल्याबरोबरच अनेकांशी ही जोडलेली आहे,हे समजल्यावर हादरतोच तो.माझी आणि तिची खास प्रेमाची भाषा आहे असं मानत होतो आपण.. हे सगळं फसवंच होतं तर..ती अनेकांशी असंच असेल का बोलत..अशा विचारांच्या भोवऱ्यात गुदमरलेला थीडर भानावर येतो ते समंथाच्या बोलण्यानं. " मी तुझ्यावर प्रेम करते.. मी एक पुस्तक वाचते आहे आणि हे असं पुस्तक ज्यावर मी खूप प्रेम करते..आता त्यातील शब्द माझ्यापासून दूर चालले आहेत......."

हे कानांवर येणारे शब्द,हे आभासी नातं दोन्ही बाजूंनी किती रुजलं होतं मनात हे लक्षात आणून देतात.

भास्करन् आणि थीडर दोघांच्याही आयुष्यात कमतरता होती ती संवादाची..संवादकाची.दोघांचे प्रश्र्न, परिस्थिती वेगळी पण आलेलं एकाकीपण सारखंच. त्यानेच वाढलेली अस्वस्थता,होणारी चिडचिड.कुंजप्पा आणि समंथा यांच्या मुळे आयुष्यात एक अत्यंत सुखद वळण येतं.एक निश्चितता ,निवांतपण लाभतं.आतापर्यंतचे प्रश्र्न, बेचैनी, अस्वस्थता,उदासी निघून जाते.आयुष्यात एक हवाहवासा , " ठहराव " येतो. तो ज्यांच्यामुळे लाभला तीच हातातून निसटून जाताहेत हे बघून आकांत केला जातो हे स्वाभाविकच नाही का ? त्यांच्यामुळेच परिस्थितीला सामोरे जाण्याचं बळ लाभतं त्यांना. भास्करन् चं मुलाच्या खांद्यावर विश्र्वासानं हात ठेवणं अन् थीडरचं पत्रातून का होईना पत्नीसमोर आपल्या चुका मान्य करणं हे अदभुत घडतं.
 
एरवी संध्याकाळनंतरच भेटणारे घरचे सदस्य सध्या करोनामुळे घरात सतत एकत्र आहेत.यामुळे , ' इतुकें आलो जवळ की या जवळपणाचे झाले बंधन 'अशी परिस्थिती उद्भवली असेलही कदाचित.मग माणसांत राहूनही मन रमविण्यासाठी काॅम्प्युटर,  व्हाॅट्स अॅप, फेसबुक असे अनेक पर्याय स्वीकारले जाताहेत. पण हेही आभासीच जग आहे ना ? जसं भास्करन् आणि थीडर यांना आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण केलेले हे सोबती दीर्घ काळ सोबत नाही करु शकत,माणसांची जागा नाही घेऊ शकत हे समजलं आणि ते आपल्या माणसांकडे परतले.तसंच या आताच्या उलथापालथीच्या काळात आपणही मनोरंजनासाठी या अॅप्सच्या जोडीनं माणसांशीही जोडून घ्यायला हवं. एकमेकांशी  बोलणं, भरभरून सांगणं, आवाजातून  न  बोललेलंही उकलणं हीच नात्याची अन्य जगण्याचीही खरी वीण आहे ना.


संवाद आपुला आपलाशी.

साधारण फेब्रुवारीच्या अखेरीपासून वेगवेगळ्या समस्यांनी संपूर्ण जगालाच खरे तर मानवाने आत्तापर्यंत जे जे साध्य केले आहे त्याने खरेच काय साध्य झाले याचा विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसे तर जेव्हापासून आतंकी कारवाया वाढलेल्या दिसू लागल्या, त्सुनामी, भूजचा भूकंप, विविध ठिकाणी आलेले पूर या आपदा आल्या तेव्हाच खरा इशारा आपल्याला मिळालेला होता. पण ते संकट थेट आपल्याशी येऊन भिडत नव्हते. काही जणांपुरतेच थोड्या थोड्या काळाने आक्रमण करीत होते. आता मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की येणारे संकट कधी आपल्या अंगावर धडकेल याचा कुणालाच अंदाजही करता येत नाही. मग ते करोनाच्या रुपात येईल, अभिनेत्यांना आलेल्या अचानक मृत्यूच्या रुपात येईलॽ महायुद्धाच्या रुपाने की निसर्गासारखा स्वतःचाच स्वतः संहार करुन घेण्याच्या रुपात येईलॽ कोण जाणे!

खरेच अशी अगतिकता येण्याचे कारण आपल्याच मानवाच्या कृतीत आहे. आपल्यालाच आपले वर्तन बदलणे भाग आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला मान्य असो की नसो निसर्गाची जेवढी हानी आपण केली आहे ती भरुन काढण्याचे काम प्राधान्याने करायला हवे आहे. त्यासाठी आपल्या आवडीला मुरड घालावी लागणार आहे. फाजील स्वातंत्र्याचा हव्यास सोडावा लागणार आहे. पुरेसे अन्न वस्त्र तर हवेच. पण अतिरेकी संग्रह करण्याची वृत्ती बाजूला ठेवावी लागणार आहे. फुकट मिळणाऱ्या गोष्टींचा लोभ सोडावा लागणार आहे. कष्टाची तयारी करायला लागणार आहे. 

हो हो हे सगळे खरे आहे पण करणार कसे आणि कोणॽ हाच कळीचा मुद्दा आहे. जनता वाट पहातेय सरकार करेल म्हणून. सरकार म्हणतेय हे जनतेनेच करायला हवेय. काही भाबडी माणसे या आशेवर आहेत की तो जगन्नियंता राम, कृष्णासारखा अवतार घेईल आणि संकटाचे निवारण करील. पण खरेच असे दुसरे कोणीतरी येऊन संकट निवारण करते काॽ विचार केला की कळते नाही आपलाच आपल्याला यातून बाहेर पडायचा मार्ग नुसता शोधायचा नसतो तर त्या मार्गावर चालायचे असते. स्वतःचा धर्म म्हणजे जो जन्म मिळाला आहे त्या ठिकाणी माझे काय कर्तव्य आहे याची जाण असायला हवी. त्याचबरोबर ज्या समाजात आहोत त्या समाजाबद्दलची आस्था हवी आणि ज्या राष्ट्राचे, धर्माचे आहोत त्याची संस्कृती ज्ञात व्हायला हवी. 

सध्याच्या काळात इतक्या निराशाजनक, उद्वेगजनक घटना कानावर येतात की अभ्यासाने समजलेल्या वरील गोष्टींवरचा विश्वास टिकत नाही. अशा वेळी जेव्हा मैसूरची एकादी कमलम्मा आपल्या परिसरात रोटरीतर्फे अनेकांना अन्नदान करीत असलेले पाहून आपल्याला संजय निराधार योजनेतली ६०० रु मिळाल्यापैकी ५०० रु. त्यांना आग्रहपूर्वक देते. एकादा आपल्या गावात शहरातून येणाऱ्या लोकांना कोरोनामुळे अलगीकरणासाठी गावकऱ्यांच्या सहाय्याने गावाबाहेर एकादी कुटी बनवतो. दोन नागरिक आपल्या गावात अलगीकरणामुळे शाळेत रहावे लागल्यानंतर त्या शाळेची पूर्ण स्वच्छता करतात. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदून ठेवतात. कुणी एकादा शेणमातीत बिया मिसळून त्यांचे (सीडबॉल्सचे) वाटप करतो तेव्हा खरेच दिलासा वाटतो. अशांची संख्या जसजशी वाढेल तसतशी ईश्वरी शक्त्ती प्रकट होईलच होईल. 

वटपौर्णिमेनंतर खरे तर पंढरीच्या वाटेवर लाखो वारकरी चालू लागले असते. पण आजच्या परिस्थितीत त्यावर निर्बंध आल्यानंतर काय आणि कसे स्वरुप घेतील ही मंडळी असे वाटत होते. पण आज मात्र खात्री पटली की एकही त्या वाटेने पायाने चालत निघाला नाही. मात्र त्यांची वारीची परंपरा त्यांनी  ‘ठायीच बैसोनि करावा विचार’ यानुसार अंमलात आणली आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या जागी नित्यक्रम करीत असतांना मनाने मात्र ती वाट चालत आहे. त्या प्रत्येक वारकऱ्याला विठ्ठल यंदा त्याच्याच स्थानी नक्की दर्शन देणार. 

आपल्या प्रत्येकालाच आपली जबाबदारी समजून उचित ते कार्य समर्थपणे करण्याची बुद्धी मिळो. त्या मार्गावर चालण्याची दृढ श्रद्धा असो आणि त्यासाठी आवश्यक ते बळ प्राप्त होवो. 

Padma Dabke

देव बना

काही वेळापूर्वी एक WhatsApp forward वाचलं.  ज्यात म्हंटलंय की कुणासाठी तरी देव बना.  कोरोनाच्या खडतर काळात उसने दिलेले पैसे परत मागू नका.  सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती आता बरी नाहीये वगैरे वगैरे.  पुढे म्हंटलंय की आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं पाप करू नका, देवदूत बना वगैरे वगैरे.  वाचताना खरंच खूप उदात्त विचार वाटले.  पण आचरण खरोखर कठीण आहे नाही का? 

मी जर कोणाला पैसे उसने दिलेत ते माझ्या अडचणीच्या काळात मी परत मागणार की दुस-याकडे हात पसरणार? बरं कोरोना आत्ता आलाय चार महिन्यांपूर्वी.  इथे लोकं पैसे उसने मागताना लोकांच्या भावनेला हात घालतात.  आठ दिवसात पैसे परत करतो म्हणतात.  मग जे जातात ते आठ दिवस काय आठ महिने झाले तरी तोंड दाखवत नाहीत. 

ही मंडळी नात्यातली असली तर पैसे मागायची अधिकच पंचाईत.  माझ्या मैत्रीणीचा नवरा त्याच्या एका भावाला अक्षरशः दर महिन्याला पैसे देतो.  आणि तो भाऊ सोंड्या बसून खातो.  एखाद महिना उशीर झाला की त्या भावाचे वडील मैत्रीणीच्या नव-याला फोन करतात "पगार झाला नाही वाटतं?" अरे काय चाललंय काय? किती गृहीत धरायचं? त्याला त्याची बायका मुलं, आजारपणं, कमी आवक, खर्चात कमी नाही अशी स्थिती नाही? 

माझ्या बाबतीतही दोन तीन गोष्टी या प्रकारच्या झाल्या आहेत.  बायको आजारी आहे. उपचाराला पैसे नाहीत.  एका कामाचे पैसे मिळणार आहेत पण आत्ता अर्जन्सी आहे असं काकुळतीने सांगून, हवं तर हा पन्नास साठ हजाराचा सिंथेसायझर ठेवा पण मला पैसे द्या असं सांगून पैसे घेऊन गेलेला माणूस तीन वर्ष झाली तरी पैसे परत देतोय.  सिंथेसायझर ठेवून घ्यायलाच हवा होता असं मनात आलं माझ्या तर तो माझा दुष्टपणा आहे? 

मला आठवतं आई दादा, सासू सासरे नेहेमी सांगायचे कुणासमोरही हात पसरायची पाळी येईल असं वागू नका.  दहा रूपये मिळाले तरी पाच रूपयेच मिळालेत समजून त्यातला रूपया तरी वाचवा.  आपण काटकसरीने वागावं.  

माझा बुवा (नवरा) मला नेहेमी सांगतो उसने पैसे परत येणार नाहीत हे गृहीत धरूनच पैसे दे कोणाला.  अन्यथा वाईटपणा आला तरी चालेल पैसे द्यायचे नाहीत.  पण असं सांगुनही मी माती खाल्लीच.  दिले एका रड्याला पैसे 2019 च्या ऑगस्टमधे.  लावल्या त्याने शेंड्या डिसेंबरपर्यंत.  मग तगादा लावल्यावर मला चेक दिला तोही पोस्टडेटेड.   चेकवर लिहिलेल्या तारखेला भरला मी बॅन्केत पण महाशय खंकच ना! कसा वठणार चेक.  झाला डिसाॅनर.  आता ठरवलं कोरोना फिरोना असला तरी आपण देवदूत बिवदूत बनायचं नाहीये.  पोलीसात फसवणुकीची तक्रार दाखल करायचीच.  

लोकांचा गैरफायदा घेताना कोरोना वगैरे अडचणी आठवतात हे बरोबर नाही.  आपलेच पैसे मागताना 'ह्याला डिप्रेशन तर येणार नाही ना? हा स्वतःला संपवणार तर नाही ना?" हा विचार करून गप्प बसायचं आणि स्वतःला देवदूत म्हणवून घ्यायचं? नको रे बाबा असं देवदूतपण.

Anagha Joshi

वादळे

दिशांच्या गर्भातली

तुमच्या माझ्या मनातली,

दृष्य- अदृष्य

घोंगावती वादळे.

भुगर्भाला भेदिती

दिशांची वादळे,

झुंजती स्वतःशी

मन-अंतर्मनाची वादळे.

उडालेल्या फोफाट्यातूनी

वाट आशेची दिसे

दुभंगलेल्या भावनांना

किनारे लाभती कसे?

थांग लाव स्वतःचं तू

मनातील वादळांचा,

तुझाच घे शोध तू

विखुरलेल्या भावनांचा.

पानगळ जाहली जरी

सोसुनी वादळवारा,

घे आकाश भरारी

शोधण्या नव्या दिशा.

तटस्थ होऊनि पहावा

कल्लोळ भावनांचा,

काळोखाच्या गर्देतही

शोध घ्यावा सुखांचा.

ना थांबतील भावना

शमतील ना ही वादळे,

जीवनाचे सोबती हे

असती बंध आगळे.

दृश्य -अदृश्य

घोंगावती वादळे,

दिशांच्या गर्भातली

तुमच्या -माझ्या अंतर्मनातली!

 

सौ. सुगंधा पंकज रागळवार

जर्मनी

 

Hindi Kavita

एक मौन है
जिसको घेरा हुआ है शब्दों ने
एक अनुभूति
जो घिरी हुई है अनुभवों से
एक निर्वात है
जिसके चारों और घूमते हुए
जन्मों के असंख्य रूप
कैसे भेदा जा सकता है ये चक्रव्यूह
जब कि शत्रु की हर सूरत
अपनी ही सूरत हो।
----

मैं चली जाऊँ कहीं भी
किसी भी नाम से हो चाहे पहचान मेरी
मेरी सूरत खूबसूरत हो
या घृणित हो मेरा व्यक्तित्व
पर वो एक तो ऐसा है
जो मेरी नींदों में पुकारता रहा है
जो मेरी नींदों में पुकारता रहेगा
जब तक कि उस तक मैं पहुंच न जाऊँ
बाकी दुनिया में सब कुछ झूठ है मेरे लिए।
----

वो जो बीत गया पल
जिस में तुम मेरे हुआ करते थे
वह पल बीता नहीं है
उसे क़ैद कर लिया है मेरी नींदों ने
ख़्वाबों की काल कोठरी में
मैं दुनिया के उजालों से भाग कर अक्सर
बैठती हूँ उस कोठरी के अनछुए कौने में
और देखती हूँ तुम्हें
प्रेम में... मेरी प्रतीक्षा करते हुए।
---

मुझे प्रेम में
हीर-रांझा... सोहनी-महिवाल
लैला-मजनू... रोमियो जूलिएट
बनने की चाह रही

मैं प्रेम को
राधा-कृष्ण... सीता-राम
यशोधरा-गौतम की ही तरह
चाहती थी जीना

मैं प्रेम से
बस इतना चाहती थी
कि जब कभी हो
उसका और मेरा आमना सामना
तो हम बिना किसी संशय के
जान-पहचान सकें
अपनी जन्मों की यात्रा

परन्तु प्रेम से
इतना भी हो सका
प्रेम... मेरी अपेक्षाओं पर
कभी ख़रा उतरा!!!

 

प्रज्ञा