Tuesday 1 December 2020

पतझड़ में

धुआ धुआ सा समा

एक अंधेरा सा छाया हुआ

गुफतगू कर रहा हैं

जाने किसके साथ ये आस्मा


ये उदासी क्यूँ है छाई 

ये किसकी है परछाई

है किसकी ये आहट

है किसने मुझे आवाज लगायी 


गुमसुम सी बैठी हूँ, अकेली ही  

किसके इंतज़ार में

पतझड़ में कर रही हूँ

सावन का इंतज़ार मैं  



मृणालिनी  दाबके

     

विचार करालॽ

आपल्या घरात वडिलधारी माणसे आहेत हे खरे तर भाग्याचे लक्षण समजले जाते. पण हीच वडिलधारी वृद्ध झाली, त्यांची गात्रे थकली की त्यांनी एका जागी बसावे, काही करु नये अशी मानसिकता दिसू लागते. त्यांना त्याच पद्धतीने वागवले जाते आणि मग अशी दृश्ये दिसू लागतात. दिवाळीपूर्वी दहा बारा दिवस आणि दिवाळीनंतर आठवडाभराने दोन कुटुंबात भेट देण्याचा योग आला. घरात असलेल्या वृद्धांचे बोलणे ऐकून, त्यांना मिळत असलेली वागणूक पाहून अत्यंत विषाद वाटला.

असे करणारे त्यांचेच सगेसोयरे आहेत खरे तर. मला दिसलेली दृश्य मी आपणांसमोर सादर करायचा प्रयत्न करतेय. सध्या तर प्रत्येक घरात टी. व्ही. असतोच. त्यामुळे मग अशी वृद्ध माणसे त्या टी. व्ही. समोर बसून आपली करमणूक करुन घेण्याचा प्रयत्न करतात. कधी आपल्याला हवे ते कार्यक्रम, कधी घरातल्या इतरांनी लावलेले कार्यक्रम बघत ते तिथे बसून असतात. त्यांचे जेवणखाणही तेथेच चालते. अशावेळी त्या वृद्ध व्यक्त्तीला एकटेच जेवायला ताट वाढून द्यायचे नि पुनश्च काय हवे नको ते विचारायचेच नाही असे झाले तर काय होत असेल बरे! एकतर ती व्यक्त्ती अन्न चिवडत बसते किंवा टाकून देण्याचा संस्कार नसेल तर बळेच खाऊन घेते.

मग त्याचे जे विपरित परिणाम असतात ते होतात. त्यापेक्षा चार वेळा थोडे थोडे ते खाऊ शकतील असे देणे खरेच करता येत नाहीॽ त्यांना आता वयोमानानुसार आंघोळीनंतर कपडे घालणे अतिशय अवघड होते. हात थरथरतात, बटणे लावता येत नाहीत. फार काळ उभे रहाता येत नाही. अशावेळी त्यांचे कपडे व्यवस्थित आहेत, फाटलेले, बटण तुटलेले असणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे की नाहीॽ त्यांचे स्नान होऊन कपडे घालून होईतोवर लक्ष ठेवले नाही तर ती बाथरुममध्ये, बाहेर ओल्या झालेल्या जागेवरून घसरुन पडणारच निश्चितपणे.

त्यांच्या हालचाली शिथिल झालेल्या असतांना त्यांना कुठेतरी लागते, सूज येते, त्वचेवर काही जागा दडस होतात. याची दखल घरातल्या इतर सदस्यांनी घ्यायला हवी न! अन्यथा हेच विपरित रुप धारण करु शकतात. त्यासाठी त्यांना कुठे बाहेरही न नेणे हा त्यावरचा उपाय असू शकत नाही. थोडा वेळ काढून त्यांना आपल्या सोबतीने अर्धा एक कि.मी. चालवणे अशक्य असत नाही.

आम्हीही आता पन्नाशी, साठीला आलो असे म्हणणारे महाभाग हे लक्षात घेत नाहीत की ही वृद्ध मंडळी आपल्यापेक्षा २५, ३० वर्षांनी अधिक आहेत तेव्हा त्यांची अवस्था आणखी कठीण असणार आहे त्यांना या गोष्टी जाणवत नाहीत खरेच की दुर्लक्ष करण्याचा, फक्त्त स्वतःपुरताच विचार करण्याचा स्थायीभाव झालाय आताॽ की खरेच इतके अवघड असते का त्या वृद्धांकडे लक्ष देणेॽ काय अपेक्षा असते त्या वृद्ध जीवांचीॽ त्यांची गात्रे थकलेली असतात. साध्या साध्या गोष्टी ते सहजपणे करु शकत नाहीत हे आपण समजू शकत नाहीॽ आपण लहान मुलांचे आवडीने आणि प्रेमाने करतो मग या पुनश्च लहानपणाच्या स्थितीला आलेल्या वृद्धांचे करतांना का अवघड वाटतेॽ मला खरेच कळत नाही.

Padma Dabke

कोरोनाबाबा

 

२०२० साल ऊजाडता ऊजाडता आला कोरोनाबाबा,
म्हणता म्हणता त्याने काही दिवसातच घेतला जगाचा ताबा|
अविरत फिरणारे जग जागीच झाले ठप्प,
दिनरात फिरणारा माणुस झाला भेटी विना गप्प|

कोरोना फिरवतोय जगभर गोफण गुंडा |
 मास्क, सॕनिटायझर, सोशल डिस्टन्स हा नवा फंडा|
 साध्या साध्या आजाराला करा कोरोना टेस्ट,
 नव्या फंड्याचे नवे नियम आहेत भलतेच बेस्ट|
करा ॲडमिट करा क्वारंटाइन व्हा आयसोलेटेड,
सामान्य माणसाचे तन मन धन सारे काही वेस्ट |
कामावरुन घरी परतताच आधि घ्या शाॕवर,
कंटाळला जीव या सा-याला झालाय भलताच कहर !
 
कशी अन् कुठून आली ही जागतिक लाट,
सर्व जगच जणू होते की काय भुईसपाट !
सुरळीत होईल का ही सर्व अस्थिरता |
सगळे जण झालेत मात्र भेटीस आतूर आता |
अंत नका पाहू हो मानवाच्या सहनशिलतेचा |
देवा दाखव रे आता चमत्कार तुझ्या शक्तिचा |
 
Neha Pethe 

kavita

 

चंद्राचं चांदणं आणि माझं तुझ्यात लपणं.
चंद्राची शितलता आणि तुझी सरलता,
चंद्र तर मैलो न मैल दूर आहे,
तू दूर असूनही सावलीसारखा बिलगुन आहे.
चंद्राच्या विविध कला आणि तुझ्या क्षणात बदलणाऱ्या नवनवीन छटा,
कधी जीव जाळणाऱ्या तर कधी जीव ओवाळून टाकावा जशा.
चंद्र तुझं प्रतिबिंब.
कधी ढगाआड तर कधी पानांआड, लपाछुपीचा खेळ सारा, कळत नकळत फुलला प्रेमाचा पिसारा.

K. Vrishali

kavita

 हा लाल्या, अन मी पिवळ्या,

दोघेही बहरतो, उलगडत अलगद, पानातून पाकळ्या!
वसंताच्या आगमनाची दवंडी, अचूकपणे देतो कोकीळस्वर,
मीही, मग त्वरेने माझा पिवळा शेला लपेटतो अंगभर!
माझ्या पिवळ्या शेल्यावर असते, माझी प्रिय हिरवी, पल्लव-नक्षी,
अवीट अशी ही रंगसंगती, अभिमानाने मिरवतो मी, निजवक्षी!
लाल्याचा मात्र, नूरच काही वेगळा,
त्याला भारी प्रिय, ग्रीष्माच्या असह्य झळा,
तावून, सुलाखून निघाल्यागत, हा डवरतो, लेवून लालबुंद बहर,
पण बहरा-बहरावरून ताडता येतं की काही लाले असतात कट्टर,
सर्वांगाने बहरताना, त्यांना पानांचाही वाटतो अडसर!
मवाळ लाल्यांना पटतच नाही, की का दाखवावा इतका माज?!
म्हणतात ते, मायबाप पानांसोबत बहरण्यात कसली आलीय लाज?
लाल्याच्या बहरण्याने, मलाही येते, नव्याने थोडी स्फूर्ती,
पहिल्या बहराचा जोम नव्हे, तरी दिसून देते बंधु-प्रीती!
तर मित्रांनो, असे आम्ही चुलतभाऊ, निसर्गचित्रांवर उठवत असतो आपापली मोहर,
टोपण नावं आमची आम्हांला, तुम्हाला परिचित आम्ही, गुलमोहर अन सोनमोहर!

आकांक्षा Phadke

English Winglish

 

English Winglish 


Each one of us has a few socially embarrassing memories of ourselves that make us cringe even today. I also have my share of such mortifying moments.

I still remember the day, when I was standing in front of the whole school. It was the birth anniversary celebration of great scholar, mathematician, philosopher, and ardent nationalist

Lokmanya Bal Gangadhar Tilak. I was midway through my speech and all of a sudden words just failed me. I stood there frozen, looking like a complete fool. I was a mere third grader and I am sure, none of my classmates would have minded. They were not listening to my speech any way, so they didn’t give a damn. And nobody makes fun of an eight year old, who has forgotten her speech. I just hung my head in shame and stood on the dias, on the verge of tears,unable to utter a word. About three minutes later a kind teacher came forward and rescued me from my predicament. But this scene from my distant past still haunts me. I am now well past my middle age, and yet, I have not forgotten the horror I felt at such a tender age. Later on I overcame my fear of public speaking with the help of some benevolent teachers, who encouraged me to try harder.


In school I was always a bright student, extrovert and an all- rounder, teacher’s pet and I too revelled in that adulation. Soon the fear of public speaking was a thing of the past and I even bagged a few prizes that everybody coveted.


I went to a school where the medium of instruction was Marathi, the regional language of Maharashtra, which means I learned my English alphabet when I was in fifth grade. Opportunity to speak in English never presented itself. When I joined my first year of college, again there was only Marathi medium if you were an Arts faculty student.

After finishing first year of college, I decided to attend a German course at Max Mueller Bhavan during summer break. The institute was situated in the posh locality of Pune; namely Koregaon Park. On the first day itself I received a cultural shock. Max Muller Bhavan was a happening place at that time, busy, lively and vibrant. It was like a center stage for a fashion show. As I entered the premises in my unflattering modest cotton salwar kameej , two long braids and pliable old slippers, I felt totally out of place. As I was waiting near my classroom door to find someone more approachable to talk to, a guy appeared out of the blue and stood beside me. He was much senior to me in age. He turned towards me and said “Hello!” I was too dumbfounded to speak. Then he started asking me series of rapid questions in English, mundane questions like, where did I come from and which course I was supposed to be taking and so on. And I just stood there, motionless as if frozen, without uttering a word.

I was afraid of speaking in English and I guess I even might have had some sort of a panic attack. My mind went blank, I was all shaky. My mouth went dry at the thought of speaking to that formidable looking person in English. His face became red, I could see, he had certainly taken umbrage to my strange behavior, which he must have thought very rude. He hurled some insults at me, most of which I didn’t get. But I heard the last word that he uttered and it hurt, it hurt bad. He called me dumb and then he left. For the remainder of the course he didn’t talk to me. Little did he know, that he had incited a riot within me with his harsh words. My total lack of social skills must have made me appear quite uncouth in his eyes! I did not recover very soon after facing dejection on the very first day and became lackadaisical throughout the course.
 

One thing was certain though. I was anything but dumb. I was infact the opposite. I was the university topper. So I looked at myself from a whole new perspective and devised an action plan for the next few years.

I have this inane quality in me that sometimes makes me take up daunting challanges. Especially if someone would challange my ability, I don’t take it lightly.

That day I had an epiphany, that in order for people to consider me a smart girl, I needed to have good social skills and an ability to articulate my thoughts in English in front of total strangers. So I met this challenge squarely and studied English with a vengeance for the next few years. So much so, that it became the love of my life.

After a few years, like a gymnast who is able to stretch deeper after each training, I began to broaden my horizons, expand my knowledge, discover new things, familiarize myself with a broader range of conceptions. I purposely studied the language, its finer nuances, collocations, phrasal verbs and so on diligently and untiringly. Thus my love affair with the English language started much later in life.

After all writing is a craft, a hefting of ideas, phrases, images into shape; a weaving of words into beautiful thoughts. And writers know this.

I guess, along with luck, you also need a little chutzpah on the side to be successful at what you do. To cut a long story short, this newfound love for the English language put me on the path to become a translator. I certainly did not set out to become a translator, but perhaps like the best things in life, I stumbled uopn it while looking for something else. But I shall tell you all about it some other day....




By: Mrs Leena Sohoni



लिहिते व्हा

 दिसामाजी काहीतरी ते लिहावे|*


 *प्रसंगी अखंडित वाचीत जावे||*

   समर्थ रामदासांनी नेहेमीसारखेच,  अत्यंत सोप्या भाषेत काय करावे ते सांगितले आहे. आपण यातील दुसरा भाग तर नेहेमीच करतअसतो.  पुस्तकं , वर्तमानपत्रं , अगदी गेला बाजार व्हाट्सएपचे मेसेज तर वाचतच असतो की. 'वाचणे 'ही तशी म्हटली तर सोपी क्रिया, उपमाच द्यायची तर समोर वाढून आलेले जेवणाचे ताट संपविण्यासारखेच. आवडेल तेवढेच , हव्या त्या प्रमाणात, हवे तसे खाणे. आवडले नाही तर करणाऱ्यांनी घेतलेले कष्ट वगैरेचा विचार सुध्दा मनात न आणता बिनधास्त टीका करण्याची पूर्ण मुभा असणारे . 

    "लिहिणे " ही  प्रक्रिया स्वयंपाक करण्यासारखीच नाही का ? आधी विषय शोधायचा, त्याची नीट मांडणी करायची, योग्य ते शब्द निवडायचे आणि त्या विचारांना मूर्त स्वरूप द्यायचे .सर्वात महत्वाचे म्हणजे मेहनतीने तयार करून , सजवून तो दुसऱ्यासमोर मांडायचा. खरं पहायला गेलं तर अवघड अशी ही गोष्ट. लिहिणे म्हणजे मनात उमटणारे तरंग कागदावर प्रत्यक्षात उतरवणे. जसा एखादा चित्रकार त्याच्या मनातील चित्र  कागदावर उतरवतो तसं  किंवा एखादा मूर्तिकार पाषाणातून मूर्ती घडवतो तसंच.  प्रक्रिया तीच.त्यासाठी आपल्याला नक्की काय  म्हणायचं आहे , सांगायचं आहे याची आपली आपल्याच स्पष्ट कल्पना असावी लागते. एका प्रयत्नात हे जमणे सोपे नाही.  माझा एक मित्र  नामवंत लेखक आहे, तो म्हणतो की , ' मी माझ्या लेखनावर कमीत कमी पाच सहा वेळा तरी हात फिरवतो'. अपार कष्ट घेतल्यानंतरच  फायनल प्रॉडक्ट आपल्यासमोर येतं. (एकाच प्रयत्नात लिहिणारे सिद्धहस्त लेखक असतीलच) पण छापण्यासाठीच लिहायला हवं असा कुठे नियम आहे ? किंबहुना आपल्या भावनांचं, विचाराचं प्रकटीकरण आहे हे . मग त्याची भाषा कशीही असो. आपल्याला जे म्हणायचं आहे तेच समोरच्यापर्यंत पोहोचतं  की नाही हा महत्वाचा मुद्दा.
  खरं म्हणायचं झालं तर,  'लिहिणे  ही एक कला आहे,  सगळ्यांनाच ही अवगत असतेच असं नाही',  असा समज आपण करून घेतो आणि लेखन प्रपंच आपण स्वतःच कठीण करून ठेवतो. म्हणजे असं बघा, की आपण काहीतरी खरडलं की आपण ते कोणाच्यातरी, आपल्या दृष्टीने ,  'आदर्श'अशा लिखाणाशी ताडून पाहतो, आणि मग ते आपल्यालाच   निकृष्ट वाटायला लागतं, मग काय सोडून देतो आपण प्रयत्न.  पण अशी तुलना करायचीच कशासाठी ? व्यक्ती तितक्या प्रकृती  हा न्याय इथे पण लावता येईलच की. प्रत्येकाची अभिव्यक्तीची रीत निराळी. अगदी एकाच साहित्यातून  वेगवेगळ्या चवीचे पदार्थ बनविण्यासारखेच . एकच पदार्थ दहा जणांनी बनाविला तर दहा वेगळ्या चवी. लिखाणाचंही तसंच नाही का ? शाळेतील निबंध आठवून बघा.के लिहिलं आहे त्यापेक्षा त्यात सुसूत्रता आहे की नाही हे महत्वाचे. दिलेल्या मोजक्या वेळात सांगितलेल्या वेळात विचार करून लिहिणे ही काही सोपी गोष्ट नाही.  माझ्या मते सर्वांनाच दहा पैकी दहा मार्कच द्यायला हवेत.😀
        
रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे , सर्वांनीच लिहिणे ही सवय आत्मसात करायला हवी. त्यामुळे निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कष्टांचीही जाणीव होईल. आपले विचार आपल्यालाच स्वच्छ दिसायला लागतील. ही विचारांची स्पष्टता आपल्याला खूप बाबतीत फायद्याची ठरु शकेल. आपले नातेसंबंध जपण्यासही याचा  उपयोग होईल  असं मला वाटतं. 
         कोणताही कलाकार एका दिवसात प्रसिद्ध पावत नाही, अपार मेहनत घेतलेली असते त्यांनी त्यासाठी. स्वतः थोडेसे प्रयत्न केले तरच आपल्याला त्या कष्टांची जाणीव होऊ शकेल. सध्या या कोविदग्रस्त परिस्थितीत नवनवीन लिहिते  उदयास येऊ लागले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी माध्यमे आहेतच अभिव्यक्तीसाठी. त्याचा फायदा करून घेऊया . 
  विषयांची कमतरता तर अजिबातच नाहीये. जरा  प्रयत्न करून बघितलं तर अनेक विषय दिसतील. छापण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणासाठी नव्हे तर  स्वतःसाठीच लिहिते होऊया. कोणी कौतुक केले तर आनंदच आहे, टीका केली तर सुधारणेला वाव आहे. चला तर मग घेऊया लेखणी हातात.

पुन्हा एकदा रामदासस्वामींनी म्हटल्याप्रमाणेच, 
*"केल्याने होत आहे रे |*
 *आधी केलेची पाहिजे ||* 
 याला अनुसरुन वागून बघूया .

*शामा छाजेड*

"Rendezvous with Antarang"-Malathi T. Krishnaswamy

 Malathi T. Krishnaswamy


 

 


About Malathi

Hi, I am Malathi T. Krishnaswamy. I am an Engineer Entrepreneur, a Motivational Speaker & Podcaster. I am married and have 2 grown up children.  I studied Engineering at the University of Madras and started my professional career as a Technical Marketing Engineer. After working for a couple of years, I took a break from active professional work to take care of my children. I also started my Entrepreneurial journey when my first child was about a year and a half. After I moved to Germany in 2002, I took a long break and in 2009, started freelancing for a couple of years as an English Language Trainer. It was in 2013 that I founded my own Firm in Germany and have been working as the Managing Director.  I provide Technology and Engineering Services to small and micro companies.

Last year, I started another venture - bhogya.online - which brings Indian art, culture, heritage, tradition, etc. to the Expat Indians in Europe.  I also run a Leadership Talk Show titled The Impressive Empress, where I talk to Impactful Indian Women Leaders about their Inner Journey. I have always given my family the topmost priority and I find being an Entrepreneur gives me the best of both worlds - personal & professional.

 

I enjoy cooking, reading about Indian Religion & Philosophy and collecting tidbits of information related to anything & everything. As a speaker, I like to talk about all aspects of a woman’s life and would always focus on positive personal growth. 

I believe that Life is beautiful and bountiful in giving us many wonderful experiences and leaving us with many valuable lessons, all the while providing answers to our questions, provided we listen. 

My heartfelt thanks to "Team Antarang" for providing this opportunity to share a few aspects of me with you all.

Interview :

What makes you smile the most?
I love old couples walking holding each others’ hands.
 
What little thing makes you the most grateful to be alive?
I am grateful for many things in life. I start my day with a small prayer and thank 3 things or 3 people. This would be different every day. This gratitude routine has helped me appreciate people and all the things in life.
 
On hard days, what motivates you to get up and start your day?
I am a very religious person and derive inner strength from my Mantra meditation.  On days that are difficult, I push myself to get up to do my prayer routine.
 
 How do you find strength when you are going through hardships?
I am quite a positive person and believe that life gives us tough times so we can grow. But this knowledge actually doesn’t help one much when faced with hardships. Brooding over the hardship for a while gets me bored and then I get going with my work.

 What family member do you call when you have good news to share?
My husband.
 
 Who inspires you to live your best life?
There are so many role models out there and I like to take good lessons from the people I meet.
 
When you have to confront someone do you choose to stand strong, or to not say anything at all?
I don't like confrontations, so I would keep quiet until the other person has finished his/her point of view and then I would speak my mind. It’s up to the person to take or leave what I say. When I am thoroughly convinced of my stand, I would keep reiterating my point of view, as and when we confront.
 
 What person made you believe in love?
My family and my extended family of aunts and uncles.
 
 Do you believe in fate and that everything happens for a reason?
I do believe that everything happens for a reason and would like to rationalise that internally. Of late, I have come to accept whatever life dishes out for me, which is not easy though. But I am not fatalistic. I believe we can change our course with our intellect.
 
 What makes you most proud of yourself?
My patience & perseverance, my commitment to myself & my words, my affable attitude, my ability to communicate well, good listening skills - these qualities do not make me feel proud of myself actually, but I am happy to be blessed with these qualities and skills. These help me help others.
 
 When in a crisis, do you act calmly, or do you automatically freak out?
I prefer to stay calm and think of ways to get out of the crisis situation. Sometimes, I do talk a lot about it or vent it out and this helps me calm down in a while.
 
What keeps you up at night?
My commitment to my work or if my presence would help someone in need.
 
 If there was one charity you could donate to, which would you choose?
Educating girl children.
 
What is the one quality you need in a significant other?
Empathy and a good sense of humor.
 
 On your best days, who do you want standing next to you?
My family
 
 On your hardest days, who do you want standing next to you?
My husband.
 
 What is the one word that perfectly explains who you are?
A pleasant woman
 
 Where do you envision yourself in five years?
I would like to grow my newest venture - bhogya.online - to help the Expat Indians stay connected to their roots. I would also be working with Global Mothers, a new initiative that would empower mothers to make this world a better place.
 
What is your message to our Antarang women readers?
At some point in time, please do an introspection to understand who you truly are and what you are blessed with.  That would truly help you actualize your inner potential and help you lead a life with contentment.


 

Tea cake / Cake Rusks


Tea cake / Cake Rusks 

 


 

Ingredients:
All-purpose flour, sifted - 350 grams or around 2 3/4 Cups
Baking powder - 2.5 teaspoons
Powdered sugar - 350 grams or 13/4 Cups
Butter - 190 grams or 3/4 Cup
Eggs - 4 large or 5 Small
Milk - ½ to 3/4 cup
Vanilla extract - 2 1/2 teaspoons
Pineapple Extract - ½ teaspoon
Caraway Seeds - 1 teaspoon
Tuti Fruti & Orange peel - ½ cup
Cranberries dried - ½ cup
Instructions:
Ensure all the ingredients are at room temperature. It is better to keep the butter and eggs needed for the recipe outside the refrigerator for an hour before you begin the mixing process.
Preheat your oven to 180 degrees C. Prepare a 10 or 12 x 5 Inches loaf tin by greasing and flouring /adding parchment to the bottom of the pan.
Sieve together flour, baking powder and salt a few times. To this add the dry fruits and caraway seeds, keep aside.
In a mixing bowl, add the measured softened butter and powdered sugar. Start creaming the butter and sugar mixture with a mixer or with a spatula. Continue creaming it until it is soft and fluffy.
Start adding the eggs one at a time, and continue with the creaming process. Continue until all the eggs have been added. Scrape down the side of the mixing bowl in between and mix until all the eggs are totally incorporated and the mixture is very soft and fluffy.
Add the vanilla essence and mix well.
Start adding the flour mixture, alternating with the milk mix, little at a time ( roughly in 4 turns). Do not over mix. Instead, just keep folding gently.
In case you find the batter too thick, add 1 tablespoon extra milk at a time and fold the mixture. The desired batter should be quiet thick & not the flowy ribbony consistency, else the dry fruits will sink. Scrape the bowl and blend an additional one minute on low to medium speed. Scrape the bowl one last time to be sure all ingredients are thoroughly blended.
Pour the batter into the pan and at 180°C for 40 to 45 minutes or until a wooden skewer inserted in the center comes out clean and dry.
Remove the cake from the oven and let it rest for 5 to 10 minutes.
Gently tap the bottom of the baking tin. If required, run a knife along the outer edges. Unmould the cake from the baking tin and let it cool completely on a wire rack. Slice the cake with a serrated bread knife.
If you are not continuing immediately, you can wrap the cake with baking paper and seal it in cling foil and store at room temperature for a week. It can also be refrigerated in an air tight container.
Slice the cake into evenly thick in pieces. Place the slices on a baking tray lined with parchment paper. Leave little gap between each.
Keep them in a cold oven and set your oven temperature after putting the cake pieces in oven at 160 C, bake for 25 to 35 minutes.
To get a perfectly crispy cake, invert the cake pieces after 20 minutes and continue baking.
Once done, remove it and cool it on a wire rack.
I got 40 plus pieces form this recipe.
Store it in an air tight tin after complete cooling down.
Serve it with hot tea/coffee for breakfast or evening tea, or even as lunch boxes snacks for young and old alike.
Note:
You can Use 1:1 APF and Wheat flour mix.
 
Prachi Karekar-Stuttgart

Kavita

 

तू आणि मी,
भिन्न रूपी  दोघीजणी।
एकाच घरात राहून ही
एकमेकींना अनोळखी।।

मी अवखळ झऱ्यासारखी,
बिनधास्त कड्यावरून कोसळणारी।
तू शांत नदी सारखी,
संथगतीने वाहणारी।।

माझा अवखळ मुक्त भाव,
तुला कधीच रुचला नाही।
तुझा संथगती संयम,
मला कधीच कळला नाही।।

कळत नकळत मी तरीही,
तुझ्याच पाण्यात मिसळणार आहे।
आज अनोळखी भासले तरीही,
तुझेच 'पुरवणी पान' आहे।।
©रसिका काकतकर

The Heart that Knew

 

The Heart that Knew





There he sat, 

In a smart olive green, 

With his head held high

And chest puffed with pride. 


The face looked calm, 

Adorned with a soft smile. 

His hand held a rifle, 

That stood tall and bright. 


He seemed lost in thoughts,

Probably of his country. 

Or, was it more personal? 

As, he too had a family. 


He opened his fist

That had a crumpled photo, 

Of his twins, whom he

Yearned to hold close. 


Moist were his eyes

From all these thoughts. 

But he gathered himself

At the sound of the tanks. 


As he stood up

To take the guard, 

He placed his hand over his heart, 

That bore the national flag. 


Two shots, from no where, 

Brought the mighty warrior down, 

With his hand over his, 

Bleeding, yet contended heart. 


A heart which knew that

Stronger hands in olive green, 

Would take care of his

Motherland and the crumpled photo. 


Kirti V

Hindi Kavita

 

मोक्ष मृगजल मात्र है, यातनाओं की सीमा के परे और नईं सीमाएं खींची जाएंगी... 

अभी हो, अभी नहीं हो
तुम भी , जैसे कोई जादू हो

फ़र्ज़ करो, 

सर्द रात हो,
कांगड़ी में चटकता कोयला
और गर्म साँसों की सरसराहट.. 

इसी बीच
गर
तुम्हें जी भर के देख लूँ
तो कहो..इश्क़ कैसे न हो !

प्रज्ञा,,,,
 
 

यादें....

समय की चरखी की डोर का भीतरी सिरा

मिलने और खुद को खो देने की बीच की कश्मकश 

वर्तमान की व्याकुलता के ख़िलाफ़ उठता स्वर

अतीत के सुकून की बचे खुचे अवशेष

चाहूँ क्या जानू ना की दबी कसक

हसरतों के रस का निचोड़
 
 

यादें .......

प्रज्ञा,,

शाम के धुंधलके में
ओस की कुछ बूदें
पत्तों पर मोती-सी चहककर कह रही हैं
तुम यहीं तो हो
यहीं कहीं शायद मेरे आसपास
नहीं शायद मेरे करीब
ओह, नहीं सिर्फ यादों में
दूर कहीं किसी कोने में छुपे जुगनू से
जल बुझ, जल बुझ
भटका देते हो मेरे ख्यालों को
और भवरें-सा मन
जा बैठता है कभी किसी तो
कभी किसी पल के अहसास में
और तब तुम
दिल में उठती एक टीस की तरह
घर कर जाते हो दिलों दिमाग में......

प्रज्ञा,,,


पक्षिणी

 

पक्षिणी

- सुजाता महाजन

    गोदूला स्टॅण्डवर सोडायला घरातले सगळे आले होते. आई, बाबा, भाऊ, वैनी… त्यांच्याशी बोलायला ती खालीसुद्धा थांबली नाही. कुठूनही कुणी येईल अशी भीती वाटत होती.

    गाडी एकदाची लवकर सुटावी आणि दुःखांनी, यातनांनी भरलेलं हे शहर दूर दूर जावं असं तिला वाटत होतं.

    कंडक्टर जवळ आला तशी आई रडायला लागली. गलबलून म्हणाली, ‘‘नीट –हावा. घराची काही काळजी करू नकोस. कुणी न कुणी जाऊन पाहत जाईल अधनं मधनं. मामाला कळवलंय. तो पाहील सगळं. तू स्वतःला आणि पोरांना सांभाळ फक्त.’’

    भाऊ तांबारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाला, ‘‘भावजींना हिकडं बोलाव.’’

    ती डोळ्यांनी ‘नको, नको’ खुणा करायला लागली. तो दरडावून म्हणाला, ‘‘बोलाव म्हणतो ना !’’

    तिने आत वळून शेजारी बसलेल्या नव-याला सांगितलं, ‘‘सका बोलावू राहिला.’’

    नव-याने तिच्या अंगावरूनच वाकून खिडकीतनं पाहिलं.

    खालून सखाराम दरडावणा-या आवाजात म्हणाला, ‘‘आता तरी नीट –हावा. तुमच्यापायी समदं वाटुळं झालं. आता तरी नीट –हावा.’’

    गोदूच्या नव-याने कसानुसा चेहरा करून आजूबाजूला पाहिलं आणि हळूच म्हणाला, ‘‘हां, हां, तू काळजी करू नगं.’’

    ‘‘काळजी तर जल्माचीच हाय. पर माज्या ताईच्या अंगाला हात लावला तर पगा. आता माज्याशी गाठ हाये.’’ सखारामची बायको आणि आई दोन्ही बाजूंनी त्याला ‘बोलू नको’ म्हणून ढोसत होत्या तरी तो बोललाच.

    गोदूच्या नव-याचा चेहरा लालबुंद झाला, ‘‘गप बस. मला नगं श्यानपना शिकवूस.’’

    ‘‘हात्तिच्यायला, मादरचोद, अजून तुजा माज नाय कमी झाला व्हय’’

    गोदूचा नवरा उठूनच उभा राहिला. आडमाप उंची असल्याने त्याचं डोकं वर जोरानं आपटलं. ‘‘अयाई ग’’ करत डोकं धरून खाली बसला.

    ही संधी साधून गोदूने खिडकीतनं डोकं बाहेर काढलं. ‘‘ए सक्या, गप की रं. पुन्ना सगळं कश्यापायी उगाळत बसलायस निगताना? पुन्हा हेच करत बसायचं का? तुमच्या मारामा-या आणि नंतर त्यानी मला मारायचं. तुजा भाव असं बोल्ला म्हणून. गप बस. जा घरी आता. ए आये, घेऊन जा त्याला. सगळ्यांची मेल्यांची डोकी भडक.’’

    आई आणि वहिनी सख्याला ओढायला लागल्या. वहिनीला जोरात ढकलून सख्याने आपला राग तिच्यावर काढला. मग हलक्या आवाजात आरडाओरड करत, ढकलाढकली करत एकदाचे ते सगळे जाताना दिसले. सख्याला बाहेर काढायच्या नादात असलेल्या आईने वळताना मागे पाहिलं आणि हात केला.

    आणि गोदूच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. पोरं कावरीबावरी होऊन पुढच्या सीटवर बसली होती. आपापसात त्यांच्या एक-दोनदा मारामा-या झाल्या होत्या. पण मोठ्या माणसांचं सुरू झाल्यावर त्यांनी आवरतं घेतलं होतं. डोकं दाबून धरायचं थांबवून नवरा शांत बसला होता. डोळ्यातनं पाणी वहातंय तोवर गोदू खिडकीतून बाहेरच पहात राहिली.

    नवरा पुढे मोठ्या मुलाजवळ बसायला गेला. धाकटा सीटवरून चढून मागे आला तिच्याजवळ. नवरा पुढे गेल्यावर गोदूला फार बरं वाटलं. लांबचा प्रवा. दहा बारा तासांचा. स्वतःबरोबर शांत रहायचं. विचार करायचा, पुढे काय करायचं?

    पोरगं मागे आलं. ते सारखं ‘‘आये, ते बघ ना!’’, ‘‘आये, म्हस बघ.’’, ‘‘आये, ते बघ विमान. वर, वर बघ’’ करत सुचू देत नव्हतं.

    शेवटी कंटाळून निघताना आईने दिलेला बिस्किटपुडा तिने त्याच्या हातात दिला. पोराची बडबड थांबली.

    गोदूने डोळे मिटून आत अंधार आणि एकांत निर्माण केला. आतल्या एकांतात ती सगळं विसरायला धडपडू लागली.

    गोदी सातवीपर्यंत शिकली होती. लहानपणापासूनच ती आईबरोबर कामाला जायची. लहान वयात लग्न झालं. परशू उंचापुरा, धट्टाकट्टा होता. त्याच्या काळ्या चेह-यावर वण होते. गोदूही चांगली उंच, शिडशिडीत, गोरी, मोठ्ठ्या डोळ्यांची, रुंद जबड्याची होती. वयापेक्षा प्रौढ दिसायची. परशू आणि गोदीची जोडी चांगली दिसते असं सगळे म्हणायचे. 

    अतोनात कष्टांची गोदूला सवय होती. दुस-या एका गोष्टीची सवय तिला लहानपणापासूनच होती. घरातल्या (त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्याही) पुरुषांनी नीट कामंधामं न करणे आणि बायकांनी राब-राबून संसार चालवणे.

    वडील मनात आलं तर पेरूच्या सीझनमध्ये पेरू विकायचे. एरव्ही घरी. दारू प्यायची, बडबड करायची. आईला मारझोड.

    भाऊ कधीकधी गवंडीकाम करायचा. एरव्ही घरी. दारू प्यायची. बडबड करायची. वहिनीला मारझोड.

    त्यामुळे पुरुषाची जात यापेक्षा काही वेगळं वागते हे गोदूच्या गावीही नव्हतं. परशूनेही तिचा अपेक्षाभंग केला नाही.

    लग्न झालं तेव्हा तो रंगाचं काम करायचा. पेंटरच्या हाताखाली दिवसभर तोंडाला फडकं बांधून भिंती साफ करायच्या. चरे बुजवायचे. मग पहिला हात, दुसरा हात चालू रहायचं. संध्याकाळी थकला भागला घरी आला की बाटली असायचीच. मारहाणीला त्याने एकदम नाही सुरवात केली. गोदूने, ‘‘जरा कमी पीत जा’’ वगैरे सांगिल्यावर सुरू केली.

    दोन मुलं झाल्यावर गोदूचा संसार चांगला स्थिरावला. गोदू हिंमतवान बाई होती. मुलांना चांगलं शिकावायचं. हे असं कंत्राटी काम त्यांनी नाही केलं पाहिजे. काम नसलं की या लोकांना वाईट सवयी लागतात, हे तिनं ओळखलं होतं. तिने जिद्द धरली. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. मरमर मरायची पण मुलांच्या फिया, शिकवण्या, वह्यापुस्तकं कश्शाला तिनं कधी कमी पडू दिलं नाही.

    काम नसलं की परशाचं तेच दारू पिणं, शिव्या, मारझोड. पण हे सगळं अंगवळणी पडलं होतं.

    मग एक मोठं संकट त्यांच्यावर कोसळलं.

    गोदू जिथं काम करायची ती एकही खाडा न करता! कामचुकारपणा, भांडण, लावालाव्या, उचलेपणा, खोटारडेपणा, उठवळपणा असं काहीच तिच्यात नव्हतं. त्यामुळे तिला भराभर कामं मिळत गेली. नवीन मिळणा-या कामांबद्दल नव-याला न सांगता ती पैसे साठवत राहिली. मुलांच्या सगळ्या गरजा भागवणं, संसारातल्या वस्तू एकेक करून घेणं हे ती हळूहळू करत राहिली. अखेरीस तिने स्वतःसाठी मंगळसूत्रपण केलं. दागिने तिला नव्हतेच. तिचं मंगळसूत्र पाहिल्यावर परशूचं डोकं फिरलं. कामं संपलेली होती. महिनाभर घरीच होता. मग डोक्यात किडे वळवळायला लागले. ही एवढ्या उशीरा का घरी येते? मंगळसूत्र करायला हिच्याजवळ एवढा पैसा कुठून आला? ही करतीय तरी काय?

    एक दिवस त्याच्या अंगात भूत शिरलं. तिच्या कामाच्या ठिकाणी गेला. ‘‘गोदूला पाठवा’’ म्हणाला. गोदू बाहेर आली. ‘‘माझ्याबरोबर चल’’ करड्या स्वरात म्हणाला. ‘‘पन कामं?’’

    ‘‘चल म्हणतोय ना?’’

    गोदू बिचारी बाईंना सांगून त्याच्याबरोबर निघाली. रस्त्यात तिला विचारलं, ‘‘मंगळसूत्र कुणी केलं?’’

    ‘‘कुणी केलं? मला कोन करणार? माझ्या सोत्ताच्या पैशांनी मीच केलंय.’’

    ‘‘कसली कामं करतीस एवढी लोकांची. इतका पैसा कुठून आला?’’

    एका क्षणात गोदूला त्याच्या मनात काय चाललंय त्याचा अंदाज आला. ती परशाकडे अवाक्‌ होऊन पहात राहिली. ‘याला काय चपलेनं बडवावं की एखादा धोंडा घालावा डोक्यात’ असा विचार करत ती मोठमोठे भरून आलेले डोळे त्याच्यावर रोखून पाहात राहिली. 

    सटकन्‌ परशा म्हणाला, ‘‘डोळे काढतीस माझ्यावर? लईच माज आलाय वाटतं’’ आणि त्याने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र इतक्या जोरात हिसकलं की ते तुलं. रस्त्यात मणी विखुरले.

    गोदूने रडत रडत मंगळसूत्र उचललं. मणी गोळा केले. स्वतःच्या कष्टाने केलेले मंगळसूत्र घालून जेव्हा पहिल्यांदा ती कामाला गेली होती- दहा कामं होती तिची- कामावरच्या प्रत्येक बाईने तिला मंगळसूत्राबद्दल विचारलं होतं. जवळ येऊन नीट निरखून पाहिलं होतं. तिच्यासारख्या धुणंभांडी करणा-या इतर बायकांनी रस्त्यात थांबवून विचारलं होतं. गोदूच्या दृष्टीने तो दिवस अविस्मरणीय होता. रात्री झोपली तेव्हाही तिला बायकांचे चेहरे, असूयामिश्रित कौतुकाच्या प्रतिक्रिया आठवत होत्या आणि हा तिचा आनंद परशाने आता एका क्षणात अक्षरशः धुळीला मिळवला होता.

    परशा तिला फरफटत घरी घेऊन गेला. ज्या बायकांनी परवा तिच्याकडे कौतुकाने पाहिलं त्यांच्या नजरेत कीव दिसल्यावर गोदूला फार मोठी मानहानी वाटली.

    ‘आपण कष्ट करतो, कुणालाही त्रास देत नाही. तरी जगायचं जमू देत नाही जग. आपलं काय चुकतं? पुरुषाची जातच हरामी, तर आपण कुठवर पुरे पडणार?’

    गोदू तिथे राहिली नाही. इतका चांगला जम बसलेला असूनही ती शहराच्या दुस-या टोकाला रहायला गेली तिथे मिल्ट्रीच्या क्वार्टर्स होत्या. परशाला तिथे रखवालदारीचं काम मिळालं आणि हिला धुण्याभांड्याचं. एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत ते रहायला लागले. पुन्हा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आला. मुलांना तिथल्याच शाळेत घातलं.

    वर्ष होतंय ना होतंय तोच परशा रखवालदारीच्या कामाला कंटाळला. त्याला पेंटिंगच्या, जास्त पैसे देणा-या कामाच्या ऑफर्स यायला लागल्या. काय करावं? परत जावं की काय तिकडेच?

    एक दिवस त्याने गोदूपाशी गोष्ट काढली.

    ‘‘चांगलं चाललंय की. कशापायी सोडायचं?’’ ती. 

    ‘‘अगं, हितं काय जास्त पैसा नाही. वाडवणार बी नाहीत आन किती जबाबदारीचं काम आस्तंय. जरा झोप लागली अन्‌ कायतरी गडबड झाली तर काय भावात पडायचं ते. अन्‌ हितं हे मिल्ट्रीचे लोक त्यांचं सगळं येगळंच अस्तंय. सगळं भरून घेतील चोरीबिरी झाली तर.’’

    ‘‘पन पोरांच्या शाळा?’’

    ‘‘अगं, शाळेत काय तिकडं पन घालता येतंय की’’

    ‘‘आता कुटलं वं. आता फेपूरवारी चालू. एप्रिलमधी परीक्षा अस्ती. ती झाल्याबिगर काय जाता येतंय!’’

    ‘‘काय शिकून मोठं करनारेत तुजे लेक. जाऊ दे गेली परीक्षा तर!’’

    ते वाक्य गोदूच्या मनावर चरचरलं.

    ‘‘कायतरी बोलू नका. माजे लेक चांगले शिकून चांगली मोठ्ठी नोकरी करणारेत. हे असलं हातावरचं पोट काय कामाचं?’’

    ‘‘मग बस मुलांना घेऊन हितं. मी चाललो. माझी हातातली कामं सुटली, पेंटरला दुसरं कुणी मिळालं तर मला पुन्हा काम नाही मिळायचं.’’

    गोदूही मग थांबली नाही. जुन्या चाळीत तिला पुन्हा खोली मिळाली. बायका तिच्या मानहानीचा प्रसंग विसरल्या. तिने आपल्या जुन्या कामांच्या ठिकाणी भराभर निरोप पाठवले. लोक जणू तिचीच वाट पहात होते. पुन्हा कामं मिळाली. परशालाही पेंटिंगची चांगली कामं दोन महिने पुरतील इतकी मिळाली.

    परशा खुशीत होता. गोदूनेही काहीतरी मनाशी जुळवलं होतं. ‘‘आता आपण स्वतःच्या दोन खोल्या बांधू. जागा घ्यायला फक्त पैसे लागतील. पुढचं बाबा, सका, तुमी, मी सगळे मिळून आपलं घर बांधून घेऊ. सामानाला पैसे लागतील. माझ्या कामाच्या बायकांकडनं घेईन. पण आता घर बांधायचंच. नाही तर आलेला पैसा आसा तसा खर्च होऊन जाईल. पोरांच्या डोक्यावर छप्पर पायजेच.’’

    परशाही कधी नव्हत ‘बरं बरं’ म्हणाला.

    झालं ! गोदू नव्या स्वप्नाने भारावून गेली. चार ठिकाणी विचारपूस करून, कर्जाची चौकशी करून तिनं अखेर जागा घेतली. थोडे दिवस पुन्हा पैसे जमेपर्यंत थांबली. मग भाऊ, वडील, अळंटळं करणारा नवरा, मुलं सगळ्यांना कामाला लावून तिने दोन खोल्यांचं छोटंसं घर उभारलं. हा सगळा काळ कामाच्या गर्दीचा; जीव खाऊन मेहनत करताना देहभान विसरून जाण्याचा होता. रात्री कष्टानं शिणलेलं शरीर झोपेच्या हवाली करताना शिवट्याबरोबर खोल समाधान तिच्या अंगात झिरपत जायचं. तिला दिसायचं, तिचा मोठा लेक ‘बाबू’ शिकून चांगल्या नोकरीला लागलाय. कसली व्यसनं नाहीत. काही नाही. घरात मदत करतोय. बाहेरच्या जगात लोक त्याला ‘बाबूराव, बाबूराव’ म्हणून मान देतायत. आजूबाजूचे लोक म्हणतायत, ‘गोदीचं लई चांगलं झालं. बिचारीने एवढे कष्ट केले. त्याचं सोनं झालं. लेकरं गुणी निघाली.’ 

    तिच्या स्वप्नात परशा कुठेच धरलेला नव्हता. एक दिवस मोठ्या बाईच्या घरी, त्यांची मुलगी टीव्ही पहात बसली होती. जंगलावरचा कार्यक्रम होता. प्राण्यांचं जगणं दाखवत होते. सिंह फक्त पिल्लांना जन्माला घालण्यापुरता. बाकी कुटुंबाशी त्याला काही देणं घेणं नाही. सिंहिणीनी मिळवायचं. मग हा आयता येऊन खाणार. फरशी पुरसा पुसता गोदू ते पहात राहिली. तिच्या मनात विचार आला, हे तर आपल्यासारखंच आहे. मग माणसात माणूसपणा कुठला? की पुरुषाला नकोच असतं घर? घर हवं बाईला. एका जागी रोज तेच तेच आवडीने जगते बाई. याला पक्ष्यासारखं भटकायला हवं आकाशात. मनात येईल तेव्हा उडून जायचं.’

    आपला बाबूराव पण या पक्ष्यांच्या जमातीतला आहे असं मात्र तिच्या मनातही आलं नाही.

    घराचं कर्ज फिटत आलं. मग तिने परशूसाठी गाडी घेतली. सेकंडहॅन्ड मोटरसायकल. खूप लांबून ती कामावर चालत यायची. परशू आपल्याला सकाळच्या घाईत गाडीवरून सोडेल तर घरात मुलांचं आणखी थोडं बघता येईल असं तिला वाटलं होतं. परशूने एक दिवस उत्साहाने सोडलं. पुन्हा कधीच नाही.

    पेंटिंगच्या जोडीला परशू आता गवंडीकामालाही जात होता. 

    एक दिवस तो रात्री घरीच आला नाही. काळजीने गोदू बेजार झाली. शोध तरी कुठे घेणार? लांबलांबची कामं. दोन दिवसांपूर्वीच तो पिऊन घरी आला होता आणि काही चमचमीत खायला का नाही केलं म्हणून गोदूला वळ उठेपर्यंत मारलं होतं.

    दुस-या दिवशीही तो आला नाही तेव्हा गोदूला फारच काळजी वाटायला लागली. आपण त्याच्याशी बांधलेले आहोत हे तिला फार जाणवलं. त्याचं मारणं, आक्रस्ताळेपणा, संशयीपणा, कामचुकारपणा, अंथरुणातली बळजबरी….. होतं ते सगळं वाईटच होतं. तरीही आपला जीव का कासावीस होतोय तिला कळत नव्हतं.

    दोन दिवसांनी तो आला. त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडला. पण कुठे गेला होता त्याने काहीच सांगितलं नाही. तो अतिशय मऊपणे वागत होता. एकदाही ओरडला नाही. पोरांशीही छान वागला. तिला राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं. एक दोनदा तिच्याकडे पाहून हसला पण. गोदू चक्क लाजली.

    रात्री त्याने तिच्यापुढे एक कागद ठेवला. ‘सही कर’ 

    ‘काय आहे हे?’

    ‘तुला काय करायचंय. सही कर’

    ‘काय आहे पण हे? मी नाही उगाच सही करणार’ त्याने दात-ओठ खात तिच्याकडे पाहिलं.

    ‘काडीमोड हवाय मला. तुला सोडून देणार आहे मी. दुसरी करणार आहे.’

    गोदूने कपाळाला हात लावला. एवढंच राहिलं होतं. ‘असं काय झालं पण एकाएकी. मी करुन घालील तुमाला चमचमीत. मध्यरात्रीसुद्धा घालील. पण असं नका करू. मी आणि पोरं काय करू? कुठे जाऊ?’

    ‘तुमाला राह्यचं तर रहा. पण मी दुसरी करुन आणणार आहे. मी वचन दिलंय तसं.’

    गोदू पोटतिडकीने म्हणाली, ‘‘कोण हाये ती सटवी? भलत्या नादी लागू नका. आजवर तुमचं दारुचं खूप सहन केलंय मी. पण आता असलं काही कराल तर घरादाराला मातीत घालाल. यात काही कुनाचं भलं नाही. ती बाजिंदी बया दोन दिवस राहील आणि जाईल सोडून.’

    ‘चूप. बडबड करू नकोस. सही करणारेस की नाही?’

    ‘नाही.’

    तो रागारागाने निघून गेला.

    पण प्रकरण एवढ्यावर संपलं नाही. नंतर खूप चिघळलं. गवंडीकाम करताना तिथंच काम करणा-या एका पोरीवर परशा फिदा झाला. हळूहळू त्याने तिला जाळ्यात ओढलं आणि तिनेही त्याला. त्याने तिच्यासाठी गंठण केलं, अंगठी, पैंजण केले. तिला रहायला रूम घेऊन दिली. जेव्हा तिच्या घरच्यांना हे कळलं तेव्हा ते परशाला भेटायला आले. ‘आमच्या पोरीला फशी पाडलंस. लग्न कर. बायकोला काडीमोड दे. तिच्याशी लग्न कर.’ पण गोदू काडीमोडाला तयार नाही म्हटल्यावर ते सगळे चिडले आणि म्हणायला लागले, ‘तुझं घर आमच्या मुलीच्या नावावर कर. गाडी आमच्या नावावर कर.’

    दरम्यान गळ्याशी आलं म्हटल्यावर गोदूने आई-वडील-भावाकडे धाव घेतली. ते आले. भाऊ आणि वडिलांनी परशाला चोपून काढलं. ‘हे घर गोदीचंय तूच चालता हो’ म्हणाले.

    परशा सगळीकडूनच अडचणीत आला. थोड्या दिवसांची मजा इतकी अंगाशी येईल असं त्याला वाटलं नव्हतं.

    लोक रोज येऊन धमक्या देतच होते. शेवटी धीर करून तिचे वडील, भाऊ पोलिसांकडे गेले. हकीत ऐकल्यावर पोलीस म्हणाले, ‘त्यांनी येऊन कायतरी मारझोड, दगडफेक वगैरे केल्याशिवाय आम्ही तरी काय करणार?’

    हे ऐकल्यावर ते सगळे गुपचूप परतले.

    दुस-या दिवशी खरोखरच ‘ते’ आले. त्यांनी परशाला मारझोड केली. घरातल्या वस्तूंची फेकाफेक केली. शिवीगाळ केली. सर्वात शेवटी सर्वांना त्यांच्याच घरातून हाकलून दिलं. ‘आमच्या पोरीचा फैसला नीट होत नाही तोपर्यंत आम्ही हितं कुणाला फिरकू देणार नाही’ म्हणाले.

    गोदू नव-याला, मुलांना घेऊन माहेरी आली. तिच्या घरावर त्या लोकांनी पहारा ठेवला. कुणालाच तिकडे फिरकता येईना.

    चार दिवस आई-वडलांकडे येऊन राहिल्यावर मानहानीने चूरचूर झालेली गोदू खात नव्हती, पीत नव्हती, झोपत नव्हती. नुसती टक्क भिंतीकडे पाहत बसलेली असायची. परशा तर तोंड लपवूनच बसला होता. घराबाहेरही पडला नाही. घरातही कुणाच्या नजरेला नजर देत नव्हता.

    आयुष्याने दिलेली ही थप्पड गोदूला पेलली नव्हती. वडील, भाऊ चुळबुळत होते, तळमळत होते. गोदू आणि परशाचं काय करावं कुणालाच समजत नव्हतं.

    शेवटी गोदूच्या आईने मार्ग सुचवला, ‘तुम्ही थोडे दिवस मामाकडे नागपूरला जाऊन रहा. तिकडं सगळं शांत झालं की मगच या. मामा सांभाळेल तिथं थोडे दिवस. जमलं तर काम करा. सगळं ठीक होईल.’

    पक्षिणीच्या जातीची गोदू पुन्हा जगण्याच्या भानावर आली. मोडून टाकलेलं घरटं तिला पुन्हा उभारायचं होते. पिल्लं तर तिची होतीच ना. त्यांच्यासाठी जगावं लागणारच होतं. तिचा बाबू ‘बाबूराव’ होणार होता.

    तिने पुन्हा उभारी धरली. मामाला कळवलं. मामा पाठवून द्या म्हणाला आणि ते नागपूरच्या गाडीत बसले. जो तिचा नव्हता त्या पुरुषाला ती का बांधून नेत होती स्वतःबरोबर?

    तिचं घर भावनांनी बांधलेलं नव्हतं. तिच्या कष्टांनी बांधलेलं होतं. माणसात गुंतून रहाणा-च्या या भावनांपेक्षाही तिला अर्थकारणाचा विचार करणं भाग होतं. स्वतः बांधलेलं घर हातचं जाऊ द्यायचं नव्हतं तिला. मुलं मोठी होताना त्यांच्या सगळ्या गरजा भागवायला आपण एकट्या पुऱ्या पडणार नाही हे तिला ठाऊक होतं म्हणूनच परशा कसाही असला तरी स्वतःबरोबरच बांधून ठेवायला हवा होता.

    गाडीत मिळालेल्या पुरेशा एकांतात पडझड झालेल्या मनाला तिने पुन्हा बांधून घेतलं. घरटं मोडून टाकलं तरी पुन्हा पुन्हा न कंटाळता बांधायला घेणा-या पक्षिणीसारखी ती पुन्हा जगायला सिद्ध झाली.


***