Saturday, 7 September 2019

जीभेचे गुलाम


वयाच्या ३३ व्या वर्षी मला ह्याची जाणीव झाली आणि माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली

आमच्या घरी पहिल्यापासूनच व्यायामाची आवड! आई-बाबा दोघेही गिर्यारोहक....

मी १२ १५ वर्ष शाळा कॉलेजमध्ये असतांना जलतरणात नॅशनल्स मध्ये पार्टिसिपेट करुन मेडल्स मिळवली. आणि योग विषयात एम्. एस.सी. करुन जॉब सांभाळून योग पण शिकवत होते. पण जेव्हा, माझी मुल आणि वर्षांची होती तेव्हापासून आम्हाला लक्षात येऊ लागले की काहीतरी बदल केला पाहिजे. वारंवार चालणारी मुलांची आजारपणे, माझे आणि नवऱ्याचे वाढलेले कोलेस्ट्रॉल, घरी आल्यावर दुसरे काहीच करायला उरणारी ताकद ह्या सगळ्यामुळे मग आम्ही आमचा आहार बदलला

आणि आता वर्षानंतर, जेव्हा सगळे आजार दूर झाले, कुठल्याही औषधाशिवाय आणि नुसते तेच नाही तर बघितलेली स्वप्न सत्यात उतरविणे शक्य सुद्धा झाले. वर्षापूर्वी  L3-L4 disc bulgeचे निदान झाल्याने मला बेडरेस्ट होती, तेव्हापासून ते आत्ता आमच्या आयुष्यात खूपच चांगले बदल झाले आहेत. आम्ही दोघ आता दरवर्षी एक हाफ मॅरेथॉन पळतो. स्वतःच्या ऑरगॅनिक भाज्या पिकवतो आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन कामही करु शकतो.
मी माझा आय. टी. मधला जॉब १० वर्षे काम करुन सोडला आणि आता पूर्णवेळ मी क्लीन इटिंग बद्दल अवेअरनेस निर्माण करणे आणि लोकांना हा आहारातील बदल करायला मदत करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे

ह्या सिरीज मधे मी क्लीन इटिंगशी आधारित वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करणार आहे. तर ह्या महिन्याची थीमप्रमाणे आजचा विषय आपण सगळे जीभेचे गुलाम!

जितक्या लवकर हे आपल्या लक्षात येईल आणि जितक्या लवकर आपण त्यावर कृती करु तितक्या लवकर आपण आरोग्यसंपन्न आयुष्य जगू शकू

कसे काय बर आपण सगळे जीभेचे गुलाम बनतोॽ लहान मुलांना अगदी जन्म झाल्यापासून, रडल्यावर, पडल्यावर साखर चाटवण्याची पद्धत आहे. साखरेचे व्यसन हे अगदी तेव्हापासून सुरु होते. आणि मग आला रविवार करा गोड, आला वाढदिवस कापा भरपूर साखर, अनैसर्गिक रंग आणि स्वाद घालून केलेला केक! आणि वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट म्हणून चॉकलेटस्. आणि सध्या तर ऑफिसमध्ये सुद्धा प्रत्येक जेवणानंतर गोड पदार्थ दिल्याशिवाय लोक जेवत नाहीत म्हणे
Norcan नावाचे औषध जे अफू, गांजा अशा व्यसनातून बाहेर येण्यासाठी वापरतात, तेच औषध दिले तर साखरेच्या व्यसनामधून तुमची सुटका होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे काॽ अमली पदार्थाचे सेवन केल्यावर आपल्या मेंदूवर जो परिणाम होतो तोच परिणाम साखरेचे सेवन केल्यावर होतो! आणि अशी अनेक अन्नपदार्थांची व्यसन पण स्वतःला आणि आपल्या मुलांना लावत होतो! चहा, कॉफी, ऑइली जंक फूड ही काही उदाहरणे. आणि ह्याचे दुष्परिणाम फार भयंकर आहेत

एकदा जीभेला ह्या मिट्ट गोड चवीची चटक लागली की मग खजूर, आंबा, कलिंगड अशातून मिळणारी नैसर्गिक साखरेची चव सुद्धा आपल्याला गोड लागत नाही. कशी काय मग मुल आणि आपण सुद्धा आनंदाने फळ खाणारॽ तीच गोष्ट तळलेल्या पदार्थांची! दिवाळीशिवाय दिसणारे चिवडा-लाडू आता खालच्या दुकानात विकत मिळतात. फूड मॉलच्या आयझेलवर रु. च्या पॅकेटस् मध्ये चिप्स, तळलेले दाणे, चिवडे, बिस्किटस् असे बरोबर मोक्याच्या जागी ठेवलेले असते. रुपयात काय सत्त्व मिळणार आहे आपल्यालाॽ

तुम्हाला माहीत आहे का की ह्या विकतचे पदार्थ विकणाऱ्या ब्रॅडेड कंपन्या तयार झालेले पदार्थाचे व्यसन कसे लागेल, किती प्रमाणात तेल, साखर आणि मीठ घालायला हवे जेणेकरुन आपण एक पोटॅटो चिप किंवा एक बिस्किट खाल्यावर थांबू शकणार नाही ह्यावर भरमसाठ खर्च करीत असतातॽ ह्या पदार्थांचे व्यसन लागले की मग कशी बर आपली मुले फुटाणे, चणे, भाजलेले दाणे, भाजलेला मखाणा, खारीक, खजूर, बेदाणे असा खाऊ खातीलॽ

पण सुदैवाने ही गोष्ट लक्षात येऊन त्यावर कृती करण्यासाठी खूप लोक सध्या तयार होत आहेत आणि ते सर्वजण आपापल्या परीने ह्या अन्नाचे बाजारीकरण केलेल्या सिस्टिमशी हर तऱ्हेने लढताहेतमला अशा लोकांपासून खूप उर्जा मिळते आणि अजून मी प्रेरणा घेऊन क्लीन इटिंग ही एक चळवळ कशी होईल आणि त्याला समाजमान्यता कशी मिळेल ह्या दृष्टीने प्रयत्न सुरु ठेवू शकते

मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आमच्याच नाही तर क्लीन इटिंग करणाऱ्या बऱ्याच घरांमधून रिफाइंड शुगर, रिफाइंड ऑइल, कुठलेही विकतचे खाण्याचे पदार्थ गेल्या बऱ्याच वर्षांपासून अजिबात आणले जात नाहीत. आणि त्याचे परिणाम नक्कीच दिसून येत आहेत. डायबेटिसच्या गोळ्या बंद होणे, बी. पी. नॉर्मलला येणे, कोलेस्ट्रॉल कमी होणे, सतत आजारी पडणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आयुष्यात आपले जे ध्येय आहे त्यासाठी पूर्ण ताकदीने आजारी पडता काम करता येणे हे आहेत. 😊

आहात का तुम्ही क्लीन इटिंग पद्धतीचा अवलंब करायला तयारॽ मला ह्यावरचे विचार जरुर कळवा. माझा व्हॉटस्अप नंबर९६३२६७६३४१.

मी सोशल मिडियाच्या माध्यमातून ह्याचा प्रसार करतच आहे. क्लीन रेसिपीज, व्हिडिओज आणि प्रश्नोत्तरे ह्यासाठी माझा यूट्यूब चॅनेल



आणि इन्स्टाग्राम अकाउंटc.e.withsaee   - तुम्ही लाइक आणि सबस्क्राइब करु शकता.

By

Saee Bapat

Bangalore, India



What does independence mean to you?



What does Independence mean to you as an individual or as a society? As India celebrated its 74th independence.

As an individual for me " True Independence and freedom can only exist in doing what's right. From the beginning, I always believe in this. One should not do things or try to be happy or compromising for others. Because Independence can come only with freedom. It's our life and we should lead it as per our terms but keeping in mind that people around us are not getting hurt. When you do right there is no chance of lying to anybody or to be answerable for others nor to hurt others feelings.

Crystal clear thinking which makes life more easy and hassle-free. It helps us to maintain a healthy relationship with everybody around us. At the end of the day, you feel happy realizing that I had a nice lovely day in keeping people happy whomever who came in contact with me. 

I just admire this wonderful quote by Albert Einstein:- "Everything that is really great and inspiring  is created by an individual who can labor in freedom."

Now living in a society how one can expect independence and freedom. This is still a myth. According to me the most unpardonable sin in our society is Independence of thought.  People have stuck to some old ideology and misconceptions so much that they don't believe in freedom of thought. As far as I know "society values cooperation over Independence, obedience over individuality and niceness above all else".

To keep pleasing people all the time. Think and act according to others wish.  Even after attaining Independence for the last 74 years, we are taking tortoise steps in the opening overviews and thoughts. Once someone raises their voice of freedom, equality, and Independency. Society, community, people around you will start becoming judgemental to you.

Though one has become aware of his thoughts views and ideologies it is getting refrain because of few people in society who thinks being Independent in ones own thoughts, actions is a myth. We can't change people's mindset and thinking. But one who is in knowledge is always free from of all this.  Nothing can avoid them in doing what is right.

It is believed that - "If we don't get rid of yesterday by talking about it all the time, at least we can get rid of its effects by moving forward". And try educating people with freedom of thought liberating from old ideologies which are wrong. Encouraging them to look inwards, they will be able to see what they want is real Independence. 

By

Tejaswini Sikka

Bangalore, India

प्रार्थना

काही  वर्षापूर्वी आमच्या ऑफिसतर्फे एक ट्रेनिंग प्रोग्रॅम झाला होता. मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा अशा ट्रेनिंगला लोक जमतात तेव्हा त्यातल्या निम्म्याहून अधिक लोकांना रिक्षा, बस,ट्रेनचा तासादोनतासाचा प्रवास करायला लागलेला असतो. पुन्हा समोर दिसत असतात आजच्या दिवसातली राहलेली कामे जी उद्या कितीही संकट आली तरी पूर्ण करावीच लागणार असतातच. त्यात पुन्हा बायका असतील तर त्यांचा निघण्याआधी तासादोनतासाचा वेळ ओट्याशी उभे राहण्यात गेलेला असतो. कुणाच्या डोक्यात इतर चिंता असतात तर कुणाच्या डोक्यात जाताजाता खरेदी करण्याचे विचार. काही नवं शिकवण्याआधी या सगळ्यांना एका प्लँटफॉर्मवर आणण्यासाठी ' बिरारी 'सरांनी त्यांच्या सत्राची सुरवात प्रार्थनेनी केली. ती प्रार्थना होती 'अंकुश' सिनेमातले 'सुषमा श्रेष्ठ' आणि 'पुष्पा पागधरे' यांनी गायलेले 'इतनी शक्ती हमे देना दाता...' हे गाणे. 

नंतर हळूहळू रोज सकाळी ऑफिसमधे काम सुरू करण्याआधी हे गाणे लावले जावू लागले. मी कायम आस्तिक नास्तिकतेच्या सीमारेषेवर भटकणारी. पण हे गाणे खरतर प्रार्थना सुरू असताना डोळे मिटून नकळत गुणगुणताना डोक्यातील विचारचक्रे सुरू असतात आणि रोज नवा अधिकअधिक खोल असा अर्थ लागत जातो. 

"इतनी शक्ति हमें देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना।"

सर्वशक्तिमान अशा दात्याकडे म्हंजे ईश्वराकडे वा अज्ञात शक्तीकडे आपले हे मागणे. आपण मागतो ते कुणाकडे तर आपल्या अत्यंत जवळच्या माणसाकडे. जिथे काही मागताना आपला अंहभाव मधे येत नाही किंवा आत्मसन्मानाला ठेच पोचत नाही. आणि मागणे तरी काय तर माझ्या क्षमतांवरचा, मी प्रामाणिकपणे अंगिकारलेल्या मार्गावरचा माझा विश्वास नेहमी कायम राहो.

"हम चले नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना॥"

इथे मला कायम तो 'दिवार' मधला शशी कपूरचा रस्ता आठवतो. कच्चा, खाचखळग्यांनी भरलेला लांबचा पण नेकपणाचा. नकळत घडणारी छोटीशी चूक किंवा पडणारा छोटासा मोह वेळ वाईट असेल तर एखाद्या व्यक्तीला कुठून कुठे घेवून जावू शकतो. टिकटिक काही नेहमी प्रेमाचीच वाजली पाहिजे असं नाही. वेळेवर धोक्याची घंटा ही वाजली पाहिजे त्यासाठी ईश्वराचे पाठबळ आणि मनावरच्या संस्काराची ताकद दोन्ही पाहिजे.

"दूर अज्ञान के हो अंधेरे,
तू हमें ज्ञान की रौशनी दे।
हर बुराई से बचते रहें हम,
जितनी भी दे भली ज़िन्दगी दे॥
बैर हो ना किसी का किसी से
भावना मन में बदले की हो ना।"

माझ्या मनातले अज्ञान मग ते माझ्या कामामधल्या एखाद्या गोष्टीबद्दल असेल किंवा कुणाबद्दल समज  गैरसमज असतील तर ते दूर होवोत. आळशीपणा, कामटाळूपणा, अप्रामाणकिपणा सारख्या अनेक वाईट वृत्तींपासून माझे रक्षण व्हावे. दुसऱ्याशी स्पर्धा किंवा बदला यांत माझी शक्ती खर्ची होऊ नये. त्याऐवजी माझ्या शक्तीचा उपयोग व्हावा अधिक अधिक चांगल्या कामासाठी.

"हम ना सोचे हमे क्या मिला है
 हम ये सोचे किया क्या है अर्पन
 फुल खुशिंयो के बॉंटे सभी को
 सबका जीवन ही बन जाये मधुबन
 अपनी करूणा का जल तू बहाके
 करदे पावन हर एक मन का कोना'

आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याच्या बदल्यात आपल्या खूप अपेक्षा असतात. पैसा, नाव, कौतुक अशा अनेक. त्याचा विचार करण्यात आपण बहूमुल्य वेळ वाया घालवतो. तोच वेळ जर का काम अधिक नेटके, लवकर,अचुक करण्यावर घालवला तर. किंवा रूढ पद्धतीत अधिक चांगले बदल कसे करता येतील यावर घालवला तर आपला वेळ तर सत्कारणी लागेलच. पण हे करताना जो आनंद मिळेल त्याने आपल्या सर्वांचेच आयुष्य आनंदमय होईल.

प्राजक्ता कर्वे जोशी